Skip to main content

रोमांचक भूल !

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 14/02/2020 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
.. चकित किंचित चिंतित उभी तू उभी आहेस जणू चितारलेले चित्र तु मदिर मकरंद सदृश सौंदर्य कळी कोवळी नव उन्मीलित तू पयोधर पीन किन्तु कटि क्षीण विधात्या ची रोमांचक भूल ! बाहे आहेत कि चन्द्रिका पुंज चेहरा कि पौर्णीमाचा चन्द्र. कवी रचित सुरस श्रृंगारतू

देशस्थ व कोकणस्थ

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 14/02/2020 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
परवा सावंत नावाचा मित्र भेटला... प्रोपर सावंत वाडीचा .. गप्पा मारताना त्याला म्हणलो माझे पण ३-४ सावंत आडनावाचे दोस्त आहेत.. काहि फेसबुकावर पण आहेत.. त्यावर तो म्हणाला ते सावंत अन आम्हि निराळे/... म्ह्णजे?? ते देशस्थ मराठा आम्हि कोकणस्थ मराठा..आमचे मसाले खाद्य पदार्थ निराळे त्यांचे निराळे..ामचा मालवणी मसाला त्यांचा कोल्हापुरी मसाला... काका तुम्ही "काहे दिया परदेस "सिरियल बघता का? बघतो ना.... त्यातली गौरीची आज्जी जी कोकणी मिश्रित मराठी बोलते तसे आम्हि घरी एकमेकाशी बोलतो... देशस्थ व कोकणस्थ हा प्रकार ब्राह्मणात असतो..तसाच तो मराठा समा््जात पण आहे हे ऐकुन मजा वाटली.. किति विविधता आहे..

प्रेम दिवस

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 14/02/2020 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
उधळून दे तुफान सारं काळजामध्ये साचलेलं. ओठात त्याची गीते,देहात मदन वारे तोड बंधने सारी, चुकव सारे पहारे व्यक्त होऊ देत सारे मनात साचलेले टाक उधळून सारे त्याच्यावर त्याच्या साठी राखलेले उधळून दे तुफान सारं काळजामध्ये साचलेलं हो व्यक्त -आज प्रेम दिवस सर्व मित्र मैत्रिणी ना ह्याप्पी व्ह्यालेनटाइन

लयीत एका झुलवीत

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी शुक्रवार, 14/02/2020 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
लयीत एका झुलवीत -------------------------------- लयीत एका झुलवीत केसांची महिरप काळी गुलाब पांघरुन अंगावरती जाशी कुठे गं सकाळी ? तारुण्याने नव्या तुझ्या झालीस तू बावरी किती जपावं तुला कळेना झाली नजरही भिरभिरी तुझ्या कटाक्षांनी आम्हा वेड लागायची गं पाळी पाहताना तू आमच्याकडे करू नको अनमान तुझ्या नजरेसाठी आम्ही जीव करू कुर्बान गोड अति रूप तुझं फुलांनी भरली डहाळी तुला जायचं तर जा जशी तुझी मर्जी तुझ्या कोमल पायांपाशी आमची एक अर्जी पुन्हा न दिसण्याची शिक्षा लिहू नको ह्या भाळी -------------------------- वॅलेंटाईन डे साठी - बिपीन -----------

सोशल नेटवर्किंग साईट्स सुरक्षा - काळाची गरज

लेखक Rohit Samudra यांनी गुरुवार, 13/02/2020 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
© रोहित समुद्र पूर्वी एका कॉम्प्युटर वरून दुसरी कडे संदेश पाठवणे म्हणजे एक महा कर्मकठीण काम होते म्हणजे असे पूर्वी किस्से मी ऐकलेले आहेत की दोन कॉम्प्युटर्स मधे संदेश पाठवायचा असेल तर ते दोन कॉम्प्युटर्स हे अंतर्गत जोडलेले असणे हे महत्वाचे होते आणि ते करण्याकरता लोक एका गच्ची वरून दुसरी कडे फायबर केबल टाकून घामाघूम होत आणि नुकतेच इंटरनेट आल्यामुळे सगळ्यांच्या खिशाला तसं परवडत नवते आणि कॉम्प्युटर ही एका ठराविक समाज समूहाची मक्तेदारी आहे अस लोक मानत असल्यामुळे जास्त लोकांचा ओढा हा कॉम्प्युटर खरेदी करण्याकडे नव्हता .

पाच दिवसांचा आठवडा!

लेखक दिनेश५७ यांनी गुरुवार, 13/02/2020 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यातील पाच दिवस कामकाजाचे करण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयामुळे तमाम कर्मचारीवर्ग कमालीचा खुश झालाही असेल, पण सर्वसामान्य माणसावर मात्र धास्तावण्याचीच वेळ येणार आहे. सध्या दुसरा व चौथा शनिवार-रविवार पूर्ण सुट्टीचा असतो, त्यामुळे अन्य रविवार वगळता आठवड्यातील इतर दिवस पूर्ण कामकाजाचे असतात अशी जनतेची एक अंधश्रद्धा असल्याने कामकाजाच्या दिवशी सरकारी कार्यालयांत खेटे घालणाऱ्यांना सरकारी कामाच्या गतिमानतेची पूरण कल्पना अगोदरपासूनच आहे.

युती ची माती

लेखक चौकस२१२ यांनी गुरुवार, 13/02/2020 07:46 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच एका धाग्यात असे म्हणले गेलं कि " ..जसे ५६ या संख्येंवरुन उद्धव यांनी मुख्यमंत्री पद मागणे चुकीचे वाटत असले.." एक उदाहरण देतो ( क्षमा, यात भारतावर टीका होत असेल कदाचित पण कधी कधी "आपल्या तो बाल्यआ" ऐवजी "आपलं ते कार्ट" असू शकत एवढं मान्य करण्याचा मोठेपणा असावा .." हे उदाहरण म्हणजे भारतात केंद्र आणि राज्य अशी ब्रिटिश संसदीय लोकशाही आहे तशीच ऑस्ट्रेलिया पण आहे .. फरक थोडा असा कि राज्य पातळीवर स्थानिक पक्ष त्यामानाने खूप कमी आणि सर्वसाधारण पाने धर्म आणि राजय याची फारकत बऱ्यापैकी आहे.

ऊर्जा नावाचा बहुरुपी कलाकार (Law of conservation of energy)

लेखक अनिकेत कवठेकर यांनी बुधवार, 12/02/2020 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
विक्रमाच्या हेरांच्या ताफ्यात अनेक प्रकारचे हेर होते, काही राज्यात सतत फिरून बातम्या काढणारे तर काही बाहेरच्या राज्यात, शत्रूंच्या राज्यात फिरून, जीवावरचा धोका पत्करून देशनिष्ठा बाळगून देशाशी इमान राखणारे, देशाच्या सुरक्षिततेची काळजी वाहणारे, देशाच्या शत्रूंवर नजर ठेवणारे. पण या हेरांचा समान गुण काय असेल तर त्यांची वेष, भाषा, रूप, रंग, कला, वागणं सारंच पूर्ण बदलायची त्यांची क्षमता.. एका ठिकाणी साधुबैराग्याच्या वेषात जाऊन अलख निरंजन म्हणतील.. दुसरीकडे गारुडी म्हणून जाऊन जीवंत नाग पुंगीच्या तालावर नाचवतील.. एका जागी नाटकातले नट होतील.. कुठे लोहार काम करणारे कारागीर होतील..