Skip to main content

प्रवासी

लेखक आर्णव यांनी रविवार, 21/02/2021 06:09 या दिवशी प्रकाशित केले.
ती पहाट निरागस होती, क्षितिजावर होती लाली नादातुन निर्मित झाली, अनंत अगम्य भूपाळी भोवताल न्याहळत होतो, अमृत प्राशन करताना अमरत्व ओढुनी आलो, होतो मी कोणे काळी असंख्य मनोहर स्वप्ने, ते लांब गहिरे श्वास अतर्क्य, अबाधित होता, विचार-कृती सहवास आनंद सोहळ्यामध्ये, मी भिजलो अनंत काळी अद्वैत भोगले होते, मी काही वेळ सकाळी दिवसा चित्र पालटले, मयसभा संपली आता सत्य उलगडत गेले, मज प्रारब्धाची गाथा जीव तोडून जोडून पळलो, दिवसा मी रानोमाळी दिवसाचा जोशच न्यारा, दिवसाची नशा निराळी ती चाहुल नश्वरतेची, नाशाचे गूढ इशारे ते रणरणते निखारे, भयाण वादळी वारे मिरवले मुखवटे खोटे, रमताना माया जाळी धुक्यात

आपलेच दात.....

लेखक मका म्हणे यांनी शनिवार, 20/02/2021 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी दुधाचे दात पडून त्या जागी नवीन यायचे. वाईट वाटायचं एखादा दात पडून गेला की काही वेळ कधी कधी तर, असा पडलेला दात, आठवण म्हणून जपून ठेवायचो दिवसेंदिवस सवयीने जीभ तिथं जायची आणि मग आता तिथे काहीच नाही हे लक्षात आल्यावर परत यायची काही दिवस तर तो एक चाळाच होऊन बसला होता मनाला मग पुन्हा त्या जागी एक नवीन दात दिसायला लागायचा हळुहळु.. हा दात इतर आधीच असलेल्या दातांमध्ये स्वतःला सामावून घ्यायचा याचा आकार, ठेवण निराळी असायची हा अधिक तजेलदार, बळकट आणि सशक्त असायचा, इतरांच्या तुलनेत आरशात स्वतःला पाहताना या नवीन दातामुळे चेहऱ्याला आलेल्या वेगळेपणाकडे लक्ष जायचं... काही नवे, काही जुनेच असे घेऊ

थोडासा रुह-ओमानी हो जाय...

लेखक किल्लेदार यांनी शनिवार, 20/02/2021 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
थोडासा रुह-ओमानी हो जाय... "मरू"स्थळ हे नाव सार्थ ठरवणारे "वाळ"वंटी प्रदेश अजिबात आवडत नसल्यामुळे प्रत्यक्षात तर दूरच पण नकाशात देखील त्या प्रदेशात मी कधी फिरकत नाही. मनुष्य "जगू" शकेल अश्या सर्व साधनांचा अभाव असलेल्या जगातल्या सगळ्यात मोठ्या "मरु"भूमीला कसल्या आधारावर "सहारा" नाव दिले असावे याचा विचार करताना गम्मत वाटते. शाळेत असताना भूगोलाचे शिक्षक आणि त्यांची शैली इतकी रुक्ष होती की त्यापुढे अशी मरुस्थळेदेखील हिरवी-गार वाटावीत.

मराठेशाहीचे अखेरचे सेनापती - बापू गोखले

लेखक kvponkshe यांनी शुक्रवार, 19/02/2021 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर नजीक तळेखाजण येथे पिरंदवणे (तळेखाजण वाडी) येथे गोखले घराणे वसले होते. लष्करी पेश्याची कोणतीही परंपरा असण्याची शक्यता नसलेल्या या घराण्यात १७७१ मधे नरहर उर्फ बापू गोखले याचा जन्म झाला. बापुंचे वडील गणेशपंत, चुलते मोरोपंत व लक्ष्मणपंत हे शेतकरीच असावेत. बापूंच्या आई विषयी माहिती मिळत नाही.पितृसहवास बापुना किती लाभला&nbsp

प्रवास (भाग 8) (शेवटचा)

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 19/02/2021 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवास भाग 8 पोलीस स्टेशनमध्ये शिरताच राठींनी भिकुला लॉक अप मध्ये टाकले आणि अनघा-मनाली-मंदार-नवीन यांना घेऊन ते त्यांच्या केबिनमध्ये आले. त्यांनी एका हवालदाराला या मुलांसाठी पाणी आणायला संगितले आणि त्यांना समोर बसवत म्हणाले;"तुम्हाला जे माहीत आहे ते सगळं सांगा आता." नवीन बोलायला सुरवात करणार होता; इतक्यात अनघाने इन्स्पेक्टर राठींना विचारलं;"इन्स्पेक्टर, आनंद कुठे आहे? मला एकदा त्याला बघायचं आहे." राठी शांतपणे म्हणाले;"तुम्ही अनघा न? आनंद...." राठींना बोलू न देता मनाली एकदम म्हणाली;"इन्स्पेक्टर, त्यानेच तुम्हाला पाठवलं नं आमच्यासाठी. मला वाटलंच.

अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांचे सादरीकरण अ २ पान १ ते २

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 19/02/2021 00:40 या दिवशी प्रकाशित केले.

अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांचे सादरीकरण अ २ पान १ ते २

1 2

जेव्हा अदम्य ऐसी

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 18/02/2021 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा अदम्य ऐसी निद्रा कवेत घेते आकाशभाषितांना ध्वनिचित्ररूप येते अंधार भिनत जाता भवताल स्तब्ध होते संवेदनांस अवघ्या व्यापून साक्षी उरते दिग्बंध सैल होती तर्कास काम नुरते कालौघ थांबतो अन् आभास सत्य होते अज्ञातशा स्वरांचा अनुनाद ऐकू येतो एकेक जाणिवेचा अस्पष्ट बिंदू होतो निद्रा अशी कृृृृपाळू अंकी तिच्या मी क्लांत मी शून्य एरवी, पण निद्रेत मी अनंत
काव्यरस