Skip to main content

(म्हणजे)

लेखक बेसनलाडू यांनी मंगळवार, 03/02/2009 01:00 या दिवशी प्रकाशित केले.
"ओढ" म्हणजे काय ते जोर लावल्याशिवाय समजत नाही. "विरह" म्हणजे काय ते माहेरी गेल्याशिवाय समजत नाही. "गेम" म्हणजे काय ते स्वत: केल्याशिवाय समजत नाही "पराजय" म्हणजे काय ते सासरी आल्याशिवाय समजत नाही "दु:ख" म्हणजे काय ते दिवटी झाल्याशिवाय समजत नाही. “सुख" म्हणजे काय ते विडंबन केल्याशिवाय समजत नाही. आधारीतः म्हणजे
Taxonomy upgrade extras

(फुकट सकाळ)

लेखक बेसनलाडू यांनी मंगळवार, 03/02/2009 00:50 या दिवशी प्रकाशित केले.
(आमच्या घरात दर शुक्रवारच्या मित्रमंडळी आयोजित 'पोकर नाईट' नंतर शनिवारी सकाळी सगळे काही/सगळे जण ठप्प होते/होतात. अशा एका शनिवार सकाळचे हे चित्र) फुकट सकाळ *** कुठे कोण पडले पहाटे बघितले कि वातावरण स्तब्ध नि:शब्द होते सुटीच्या सकाळी असावे तसे हे पहा फक्त पेले रिकामे रिकामे *** नि ओट्यावरी आकृत्या बाटल्यांच्या (नि सोफ्यावरी मित्रही सांडलेले!) अकल्पित जशी गूढ पिशाच्चे असावीत निघाले धुराचे किती लोट होते फुप्फुसातुनी? घाबरा जाहलो मी *** आधारीतः धुकट सकाळ

थोडे काही जुनेपुराणे, ठेवणीतले..! (१)

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 03/02/2009 00:37 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, भारतीय अभिजात संगीताची गेल्या २५ वर्षांहून अधिक श्रवणभक्ति केली, आजही करतो आहे, जमेल तसं शिकतो आहे. अनेक दिग्गजांना अगदी कान तृप्त होईस्तोवर ऐकलं, अनेकांचा सहवास लाभला. आणि या सगळ्या श्रवणयात्रेत अनेक अश्या अनमोल ध्वनिमुद्रणांचा एक लहानसा खजिना गोळा केला, जो कितीही पैसे ओतले तरी बाजारात विकत मिळणार नाही. त्यापैकीच काही ध्वनिमुद्रणांची झलक आपल्याकरता उपलब्ध करणार आहे, त्यावर दोन शब्द बोलणार आहे.. पं गोविंदराव पटवर्धन! बोटात विलक्षण जादू असलेला कलाकार!

म्हणजे...

लेखक शितल यांनी सोमवार, 02/02/2009 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
"ओढ" म्हणजे काय ते  जीव लावल्याशिवाय समजत नाही.  "विरह" म्हणजे काय ते  प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही.  "प्रेम" म्हणजे काय ते  स्वत: केल्याशिवाय समजत नाही "पराजय" म्हणजे काय ते शत्रु कडुन हारल्याशिवाय समजत नाही "दु:ख" म्हणजे काय ते अपेक्षाभंग झाल्याशिवाय समजत नाही. “सुख" म्हणजे काय ते स्वत: मध्ये शोधल्या शिवाय मिळत नाही.
Taxonomy upgrade extras

स्वप्नपरी

लेखक पुष्कराज यांनी सोमवार, 02/02/2009 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
घालीत साद फुलवित रात स्वप्नात सखी ती येते लाजून जरा हासून जरा देहात मिसळुनी जाते ती स्वप्नपरी ती ती धुंद कळी ती ती रातराणी ती माझी ती मुग्ध बासरी मंद हासरी प्रिया सखी फुलराणी श्वासात गंध ओठात चंद्र मग रात धुंद ही होते प्रणयास रंग रेशमी संग मग कळी फुलुनि येते ती स्वप्नपरी ती --- जागती रात धुंदीत गात कसली पहाट मग होते जुळवीत सूर नादात चूर स्वप्नात रोज ती येते ती स्वप्नपरी ती ---
Taxonomy upgrade extras

२१ वे शतक आणि भारतीय संस्कृती- भाग २

लेखक त्रास यांनी सोमवार, 02/02/2009 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय आहाराला चौरस आहार मानले जाते. तुम्ही जर आपला आहार खोलवर जाउन पाहिला तर तुम्हाला असे दिसेल की, त्यात कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे, ई. ह्याचे योग्य मिश्रण आहे. त्याबरोबरच आयुर्वेदात वर्णन केलेले व सणवाराला खाण्याचे पदार्थ पाहिले असता, त्या त्या ऋतूत मानवाला आरोग्यास मदत होइल असे पदार्थ सुचवलेले आहेत. इतका बारीक अभ्यास कोणत्या संस्कृतीत आहे? विचार करा, जेव्हा "अग्री"कल्चर" हे एक कल्चर नव्हते, तेव्हाचा मानव खाद्यपदार्थ कोणते असावेत, कोणते नसावेत ह्याचा कसा निर्णय घेत असेल? अर्थातच प्रयोगातून आणि वेळ्प्रसंगी जीवाची किंमत मोजून तो ते शिकला असेल.

अहिंसावादी - म्हणजे काय ? (गांधीवाद नाही )

लेखक दशानन यांनी सोमवार, 02/02/2009 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
मी जैन ! त्यामुळे लहानपणापासूनच मी अहिंसा अहिंसा चा जाप करताना घरापासून बस्ती (जैन मंदिर) पर्यंत लोकांना / मुनींना पाहीले आहे त्यात मला काहीच नाविन्य नाही पण भटांच्या एकाला चित्रकलेला (डिजिटल कला) एका मिपाकरांने प्रतिसाद दिला की मला पहिले आवडले व दुसरे नाही कारण ते अहिंसावादी आहेत म्हणून. आता मला एक गोष्ट नेहमीच भेडसावत असते... ती गोष्ट त्यांच्या त्या वाक्याने एकदम मनात परत आली व त्यासाठी हा काथ्याकुट ! जगदिश चंन्द्र बोस ह्यांनी १९३७ पुर्वीच हा शोध लावला होता की वनस्पती व झाडं ह्यांना जाणीव असते म्हणजे त्यांच्या पण जीव असतो ते सजीव आहेत, आता हिंसा म्हणजे काय ?

कोल्हापूरचं घर मेणाचं!

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 02/02/2009 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
ढकलपत्रातून आलेल्या काही छायाचित्रांनी माझी उत्सुकता चाळवली. कोल्हापूरजवळ हे मेणाच्या पुतळ्यांचं एवढं सम्रुद्ध विश्व? आहे कुठे बुवा हे नेमकं? बरं, ढकलपत्रं तयार करणार्‍या आणि तशीच पुढे पाठवणार्‍यांना या मूळ संकल्पनेचे जनक कोण, याचं कुणालाच सोयरसुतक नसतं. हे कुणाल विचारावं, याचा विचार करताना `मिपा'ची आठवण आली. तुम्ही कुणी पाहिलंय का हे ठिकाण?