काही खाजगी कंपन्यांना म्हणे बाबा आमट्यांच्या आनंदवनाखाली कोळश्याच्या खाणी असल्याचा शोध लागला आहे. त्यांनी भ्रष्टाचाराने बरबटलेल्या राज्य सरकारशी संधान साधून आता तिथे कोळश्याच्या खाणी खणण्याचा पाताळयंत्री बेत आखला आहे..!
कालच ई-मराठी, की स्टार माझा यापैकी कुठल्याश्या वाहिनीवर ही संतापजनक बातमी पाहण्यात आली!
आमटे परिवाराचा या योजनेला अर्थातच ठाम विरोध आहे हेही दाखवण्यात आले!
६०-७० वर्षांपूर्वी एका ओसाड माळरानावर एक महामानव पोहोचला आणि त्याने तिथे नंदनवन उभं केलं, तेव्हा हे शोध लावणारे लोक कुठे गेले होते भोसडीचे??
पण आमच्या सरकारला त्याचे काही सोयरसुतक नाही! कोण बाबा आमटे?