Skip to main content

सोनिया गांधी : एक चरित्र

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 22/05/2010 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात अनेक व्यक्तींबद्द्ल लोकांना आकर्षण आहे, उत्सुकता आहे, पण जर याची क्रमवारी लावायची ठरवली तर सोनिया गांधींचा क्रमांक फार वरचा ठरावा. सोनिया स्वतः मिडीयासमोर फारच कमी येतात. त्यांनी दिलेल्या मुलाखतीही मोजक्या. जनतेला त्या दिसतात, त्यांचे विचार कळतात ते फक्त जाहीर सभांतून अथवा त्यांच्या निर्णयातून. अश्यावेळी देशातील एका प्रमुख पक्षाच्या अध्यक्षा व त्यांच्या मर्जीनूसार पंतप्रधानपदही ठरविण्याची ताकद असलेल्या महिलेविषयी कुतुहल नसेल तरच नवल. अश्या वेळी जेव्हा वाचनालयात "सोनिया" हे सोनिया गांधींचे चरित्र दिसल्यावर ते घेतल्याशिवाय रहावलं नाहि.

विचारू नका..! (नवीन)

लेखक निरन्जन वहालेकर यांनी शनिवार, 22/05/2010 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
विडंबनाचा प्रथमच प्रयत्न. प्रेरणा श्री. विशाल कुलकर्णी यांची अतिशय सुंदर "विचारू नका " ही कविता.श्री. कुलकर्णी साहेबांची मनापासून माफी मागून विचारू नका..!
काव्यरस

कवी ग्रेस यांना प्रतिष्ठेचा नागभूषण पुरस्कार

लेखक बेसनलाडू यांनी शनिवार, 22/05/2010 02:49 या दिवशी प्रकाशित केले.
सविस्तर वृत्त येथे वाचता येईल. कवी ग्रेस यांच्या अनेक कविता त्यांच्यातील गूढार्थासाठी अनेकांना प्रिय वाटतात. अनेकांचा असा अनुभव आहे, की जेव्हा त्यांची कविता वाचल्यावर "अच्छा, असे आहे होय!" या कविता कळल्याच्या समाधानापाशी आपण येऊन पोचतो, तेव्हाच त्याच कवितेतील अशी एखादी ओळ किंवा शब्द तुम्हाला पुनर्विचार करण्यास उद्युक्त करतो - आणि परिणामी कविता "कळल्याचे" समाधान हिरावून घेतो.

(अगाध प्रतिभा???)

लेखक मनिष यांनी शनिवार, 22/05/2010 01:36 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या माहितीप्रमाणे आपल्या राष्ट्रपतींचे (महिला असल्या तरी राष्ट्रपतीच म्हणतात ना रे? तसे "पती" चा स्त्रीलिंगी शब्द माहित आहे, पण....असो) नाव "प्रतिभा पाटील" किंवा "पाटील प्रतिभा" (शासकिय फॉर्म प्रमाणे आडनाव आधी) आहे ना? आता कुठेतरी "अगाध प्रतिभा" असे काहितरी वाचले. कोण बरं ह्या? काही माहिती असल्यास कृपया इथेच कळवावे. मला नीटसे आठवत नाही (मी खूप लहान होतो तेंव्हा, कदाचित १२वीत असेन), पण मला वाटते की "अगाध प्रतिभा" ह्या माझ्या जवळच्या नातलग आहेत. त्या गेल्यापासून मला फार मानसिक धक्का बसलाय...काही धड लिहिता येत नाही.

सुधारक

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 21/05/2010 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
हल्लीचे पुरोगामी व पुर्विचे सुधारक यांच्या भुमिका एकच आहेत कि त्यात फरक आहे..कुणी जाणकार समजावुन सांगु शकेल का?

विश्वास

लेखक बाबुराव यांनी शुक्रवार, 21/05/2010 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
गोड शब्द, गोड वचनं आणि निरागस चेह-यावर कधीच विश्वास टाकू नकोस असं तु म्हणायचीस. मुखवट्यांच्या चेह-यात तुझाच एक चेहरा खरा वाटायचा, पण कालांतरानं कळलं तोही फसवाच. आता तुझे स्पर्श बोलतात आणि पाणवतात डोळे. तेव्हा मात्र धैर्य होत नाही तुझ्यावर,तुझ्या शब्दांवर विश्वास ठेवायला.
काव्यरस

शिवाजी महाराजांवर ई-बुक

लेखक अस्मी यांनी शुक्रवार, 21/05/2010 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
सारंग माडगुळकर यांनी शिवाजी महाराजांवर King Shivaji -the spiritual quest म्हणून एक ई-बुक मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांत लिहिले आहे... शिवइतिहासामध्ये 'मिर्झाराजांची मोहीम' व 'आग्रा भेंट' ही दोन प्रकरणे चुकीची लिहिली गेली आहेत, असं त्यांच मत आहे. भाग १ मिर्झाराजे जयसिंह प्रकरणाचे सत्य स्वरूप ! ...

(चित्र)

लेखक केशवसुमार यांनी शुक्रवार, 21/05/2010 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
मिलिंद फणसे यांची अप्रतिम गझल चित्र वाचली आणि काही दिवसापुर्वी इथे आलेल्या वादळाच्या आठवणी जाग्या झाल्या. उघडी पडली अर्थव्यवस्था, नवे प्रशासक झाले नि धाग्यातून झाली गणती, किती कफल्लक झाले! कशी, कधी या स्थळाची मंडई बनवली सांगा? असे, कसे हे सुजाण सगळे मुर्ख गिर्‍हाइक झाले? पाहा, पाहा पोतडीतले किती आयडी आले आणिबाणी उठली आणीक, किती विधायक झाले फरार झाला आहे मालक अशी वदंता होती अन पुर्वीचेपूजक त्याचे, सगळे मारक झाले नव्या पहाटेच्या गप्पाही शिळ्या कधीच्या झाल्या जुनेच सारे कंपू जमले, किती सुधारक झाले तुझ्या विडंबन चित्रा कैसे छान म्हणावे "केश्

एक चांगली बातमी ~~ नव्हे आदर्शवत बातमी म्हणू या !!

लेखक इन्द्र्राज पवार यांनी शुक्रवार, 21/05/2010 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
आपण आपल्या या संस्थळावर विविध विषयावर वेगवेगळ्या बाजूनी विचार मांडीत असतो, त्यांची देवाणघेवाण करीत असतो. अशाच प्रसंगी समाजात कित्येक चालिरीतीबाबतही मत व्यक्त करतो. "लग्न" हा असाच एक महत्वाचा आणि प्रत्येक कुटुंबाचा जिव्हाळ्याचा विषय. वर्षानुवर्षे "विवाह समारंभ" म्हटले, की भोजनावळ, जोरदार स्वागत समारंभ, वाद्यांचा दणदणाट असे समीकरण झाले आहे; आहेर देणे, घेणे, रुसवे फुगवे काढणे, फोटो, व्हिडिओ, आदीची रेलचेल. यात बदल तरी काय असणार? आपणदेखील वैयक्तिक पातळीवर यातील काही प्रथांना दूर केले तरी बहुतांशी लग्नात हेच दृश्य दिसत असते. अशावेळी काहीतरी "आगळे वेगळे" घडले तर मनाला फार हर्ष होतो.