गोड शब्द, गोड वचनं
आणि निरागस चेह-यावर
कधीच विश्वास टाकू नकोस
असं तु म्हणायचीस.
मुखवट्यांच्या चेह-यात
तुझाच एक चेहरा खरा वाटायचा,
पण कालांतरानं कळलं
तोही फसवाच.
आता तुझे स्पर्श बोलतात
आणि पाणवतात डोळे.
तेव्हा मात्र धैर्य होत नाही
तुझ्यावर,तुझ्या शब्दांवर
विश्वास ठेवायला.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1455
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
बरी वाटली
छान आहे...
बाबूराव,