Skip to main content

आई ... मिटलेला श्वास.. ८ (मनपक्षी माखले सारे)

लेखक गणेशा यांनी सोमवार, 22/11/2010 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ७ : http://www.misalpav.com/node/15457 पार्श्वभुमी : लहानपणी आई बरोबर शेता मध्ये येणारा नायक, बांधावर बसुन हरबरा खाताना समोरच्या पाखरांना आवाज देवुन उडवुन लावतानाचा नायक आणि नंतर आई नसताना पुन्हा शेतात आल्यावर व्याकुळणारा नायक .. बस्स शेतात बसलो असता बांधावर भासांची टोळी आठवणींच्या दाण्यांची फाटकी माझी झोळी मन होउन पाखरु मायेचा शोधते घास नभी थकलेला चांद केविलवाणा विराण प्रवास आठवांच्या धुळसर वाटेवर मनपक्षी माखले सारे शेतात बसता आठवे मायेचे तुटलेले धागेदोरे -------- शब्दमेघ
काव्यरस

"आठवणीतली ढासू दिवाळी "

लेखक पियुशा यांनी सोमवार, 22/11/2010 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
हाय पियुशा सदर लेख आमची दिवाळीतली आठवण नुकतीच दिवाळी झाली आहे म्हटले चला दिवाळीबद्दलच खरडू या थोडेसे ................ "आठवणीतली ढासू दिवाळी " दिवाळीसण,रंगीबिरेंगी रांगोळ्या ,चांदण्यासारख्या टीम-टीमनारया पणत्या, आकाशदिवे ,फुलांची तोरणे , नवीन कपडे गोड - चमचमीत फराळ, सुवासिक फुले ,अत्तरे आणि अजून काय काय काय .......

What the hell is this!!! गांधीजी व गोडसेंचा फोटो?

लेखक शानबा५१२ यांनी सोमवार, 22/11/2010 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
सॉरी पण पाहील्यावर धक्का बसला म्हणुन असे उद्गार निघाले.कृपया ह्या फोटो व त्याच्या सत्यतेबाबत माहीती असल्यास ती पुरवावी. सौजन्य : :-) http://duniyadari.tumblr.com/Marathi%20section

अनंत शुभेच्छा !!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 22/11/2010 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
तुझा वाढदिवस नि माझा हात फक्त आशीर्वादासाठी अगदी मनापासून . आतून मनाच्या गाभार्यातून कारण तुझ्या आठवणीने माझ्या झाडना फुटतो मोहर नि फुले फुलतात सुवासाची तुझ्या आठवणींचा गंध पसारतो दूरवर त्याने धुंदावून जाते माझेच मन मी नसलो जरी जवळ तरी असतो सतत जवळ आठवणीच्या मोह्ळाला झोंबून असतात मधमाश्या तसाच मी देखील तुमच्या आठवणीत असतो हरवलेला तुझे बालपण ....!, तुझे तरुणपण ...!! तुझा तो विमान प्रवास तू निघताना माझे भरून आलेले डोळे .. तू आल्यावर आपण एकमेकाला मारलेली मिठी अमेरिकेहून तू आल्यावर केवढा वाटलास मला गोरा तुझा वाढदिवस नि माझा हात फक्त आशीर्वादासाठी मनापासून आतून ....!
काव्यरस

महा भारत

लेखक तिमा यांनी सोमवार, 22/11/2010 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
सन २०५१. नोव्हेंबरचा महिना. भारताची अभूतपूर्व प्रगती करुन दाखवणार्‍या महानेत्याचा सत्कार व प्रगट मुलाखत होती. वार्ताहरांचे थवे व्यासपीठाभोवती जमले होते. त्यांच्यामागे अफाट जनसागर पसरला होता. तो ट्रकने आणला नव्हता, तर उस्फूर्तपणे आला होता. प्रारंभी दोन चार नेत्यांची भाषणे झाली. त्यानंतर प्रमुख विरोधी नेत्यातर्फे महानेत्याला नोटांचा हार घालण्यात आला. महानेत्याने सत्काराचा स्वीकार केला आणि तो भाषण द्यायला उभा राहिला. मित्रहो, तुमच्या प्रेमाने मला भरुन आले आहे. अल्पवर्षात या देशाची झालेली प्रगती पाहून मला देखील आश्चर्य वाटत आहे. पण या सर्वाचे श्रेय आमच्या गुरुंचे आहे.

आपणच नालायक आहोत!!

लेखक दिनेश५७ यांनी सोमवार, 22/11/2010 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
’होऊन जाईल तुमचं काम... साडेआठ हजारात. पण कॅश द्या. चेक नको. परवाची वेळ घेऊन टाकतो. तासाभरात काम होऊन तुम्ही मोकळे’... त्या ’एजंटा’नं समोर बसलेल्या जोडप्याला सांगितलं, आणि त्यातल्या नवर्‍याचा चेहेरा खुलला. ’म्हणजे रजा घ्यायला नको’... तो आनंदानं पुटपुटला. दोघंही उठले, आणि बाहेर पडले. एजंटानं ड्रावर उघडून फ़ाईल बाहेर काढली आणि कॅलक्युलेटर काढून भरभरा काहीतरी आकडेमोड केली. दोन मिनिटांनी फाईल पुन्हा ठेवताना त्याच्या डोळ्यात समाधान साचले होते... दोन दिवसांनंतर ठरल्याप्रमाणे ते जोडपं सकाळीच त्या ऒफिसात येऊन हजर झालं.

घाण्या वरचा बैल

लेखक रणजित चितळे यांनी सोमवार, 22/11/2010 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
(ईयत्ता सहावीच्या कवीतेवर आधारीत) गोष्ट एका गावातली. तेलाची घाणी अन् त्यात कोलुवर फिरणारा बैल. बैलाच्या गळ्यातली वाजणारी घंटा म्हातोबाला दिलासा द्यायची. म्हातोबा शेजारच्या खोपट्यात आडवा पडलेला. त्याला त्या घंटेचा आराम. जो पर्यंत ती घंटा किणकिणायची तो पर्यंत सगळे व्यवस्थित चालले आहे ह्याची त्याला खात्री. मग तो खुशाल झोप काढायचा. जेव्हा बैलाला तहान भुक लागायची तेव्हा घंटा वाजायची थांबायची. ती थांबली की लागलीच एक बादली आंबोण त्याच्या पुढे तो घालायचा. त्याच वेळेस सुकं खोबरे घाणीच्या तोटीत आहे का पाहुन लागेल तसा नवा घाणा तयार करायचा. हे असे संध्याकाळ पर्यंत चालायचे.

ब्लॉग माझा - ३ : विजेत्यांचे अभिनंदन

लेखक छोटा डॉन यांनी सोमवार, 22/11/2010 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
सालाबादप्रमाणे ह्या ही वर्षी स्टार माझा आयोजीत 'ब्लॉग माझा' ह्या मराठी आंतरजालावर मुक्तपणाने आणि उत्साहाने भरभरुन लिखाण करुन आपल्या मायबोली मराठीच्या सेवेत असलेल्या मराठी जालनिशीकारांची ( मराठीत ब्लॉगर्सची ) स्पर्धा मोठ्ठ्या उत्साहात आणि जोशात पार पडली. नेहमीसारखाच ह्या ही वर्षी स्पर्धेला स्पर्धकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला असेल ह्याची खात्री आहे. लोक लिहीतच असतात, प्रतिसाद मिळाले तरी लिहतात आणि नाही मिळाले तरी जास्तच पेटुन लिहतात.

तुला ना कळे लोचनांची कहाणी..

लेखक राघव यांनी सोमवार, 22/11/2010 07:30 या दिवशी प्रकाशित केले.
जरी व्यक्त होती मनी आर्त गाणी.. तुला ना कळे लोचनांची कहाणी.. नदी-सागराची घडे भेट साधी.. तरी, अंतरी, छेडते सूर आधी! शब्दांविना बोलते मूकवाणी.. तुला ना कळे लोचनांची कहाणी.. कधी भासती, भास झाले खरे हे! कधी श्वास माझा उगा अडखळे रे!! सुखाची दरी, ही अशी जीवघेणी.. तुला ना कळे लोचनांची कहाणी.. नको रे असा दूर जाऊ सख्या तू.. सुगंधाविना मोगरा पोरका तू.. सांगू कसे, का फुले - रातराणी!! तुला ना कळे लोचनांची कहाणी.. शुभम्

चित्ताकर्षक गोष्टी -१

लेखक शरद यांनी सोमवार, 22/11/2010 07:25 या दिवशी प्रकाशित केले.
दर्शनांवरील लेखमालेने डोके गरगरत असणारच; त्यावर उतारा म्हणून दोन तीन सुरस व चमत्कारिक गोष्टी सांगणार आहे सुरवात माधवीपासून. गालव हा विश्वामित्रांचा शिष्य.अनेक वर्षे गुरूची सेवा केल्यानंतर त्यांनी गालवाला प्रेमाने निरोप दिला.गालव गुरूदक्षिणा घ्याच असा आग्रह करू लागला. आग्रहाचा हट्टाग्रह झाल्यावर विश्वामित्र चिडले व म्हणाले " श्वेत वर्णाचे व एक कान काळा असलेले ८०० घोडे मला दक्षिणा म्हणून दे." गालव हताश झाला. आपल्याकडे पैसे नाहीत, कोणी मित्र नाही, आता काय करावयाचे ? ही अट कशी पुरी करावयाची ?