Skip to main content

एक नवा घोर

लेखक सन्जोप राव यांनी मंगळवार, 14/12/2010 05:50 या दिवशी प्रकाशित केले.
पार्श्वभूमी - हातकणंगले तालुक्यातल्या मौजे रांजणवाडी बुद्रुक मध्ये घडलेली ही सत्य घटना आहे. म्हणजे घटनाच आहे, पण सत्य आहे. किंवा सत्यच आहे, पण घटना आहे. ______ काही दिवसांपूर्वी रांजणवाडी बुद्रुकमध्ये ग्रामसभा होती. या सभेमध्ये सकाळच्या पारी गावाबाहेर 'बसायला' जाणार्‍या ग्रामस्थांना आणि त्यांच्या मुलांना सरपंचानी आमंत्रित केले होते. हेतू हा होता की सरकारच्या नव्या नियमांची या लोकांना माहिती द्यावी आणि लोकांना घरोघरी बांधकामासाठी प्रोत्साहित करावे. पण झाले भलतेच. या सरपंचांनी सुरुवातीलाच भलताच सूर लावला.

भिजल्या डोळ्यासही ना काही वाटले

लेखक गणेशा यांनी सोमवार, 13/12/2010 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : http://www.misalpav.com/node/15843#comment-267071 बरेच दिवस लिखन बंद आहे, येथील अनेक कविंच्या कविता वाचुन मन प्रसन्न होते.. त्यांचे पाहुनच जुन्या कविता देत होतो.. स्पुर्ती ती त्यांचीच, विशेष करुन प्रकाशजींच्या कविता आणि प्रतिसाद कायम लिखानाला खुणावत होत्या. आज "ज्ञानराम" यांच्या कवितेमुळे खुप दिवसानी काही तरी लिहिले आहे .. आपल्याला आवडल्यास आनंद द्विगुनीत होयील्च ..
काव्यरस

पालक भात !

लेखक संजयशिवाजीरावगडगे यांनी सोमवार, 13/12/2010 21:21 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : दोन वाटी तांदूळ, ४ वाट्या बारीक चिरलेला पालक, थोडेसे मसाला व कच्चे शेंगदाणे, ३-४ लाल मिरच्या, पाणी, १ चमचा धने-जिरेपूड, ४ चमचे तेल, पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, पाव चमचा हिंग, ३-४ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी ओले खोबरे, २ चमचे टोमॅटो सॉस , मीठ चवीपुरते. कृती : हिरव्या मिरच्या उभ्या चिराव्या . तांदूळ धुवून ठेवावे. पालक पाण्यात ठेवावा , त्यात अर्धा चमचा हळद घालावी. १५- ते २० मिनिटांनी पालक चाळणीवर हाताने काढून ठेवावा. म्हणजे माती पाण्यात खाली बसेल . नंतर चाळणीतला पालक धुवावा. अलगद पाणी पिळून काढावे.

आदाब अर्ज है !

लेखक अश्फाक यांनी सोमवार, 13/12/2010 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वं मिपाकरांना सलाम. सहा महिन्यांपुर्वी एक प्रयत्न केला होता . (http://www.misalpav.com/node/11661) पन सभासदांची सम्पादनाची सोय काढ्ण्यात आली आणि आमची गोची झाली . आता नविन सुरुवात करत आहे फरक फक्त इतकाच कि रोज प्रतिसाद मधे गजल टाकत जाइल. आजची ग़जल तशी जुनिच पन अप्रतिम आहे म्हणुन देन्याचा मोह आवरत नाही. आपल्या सुचना आणि प्रतिक्रिया आमच्यासाठी अमुल्य आहेत, प्रतिक्षेत ......... मुहाजिर हैं मगर हम एक दुनिया छोड़ आए हैं !

एक नवी काळजी

लेखक शुचि यांनी सोमवार, 13/12/2010 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
पार्श्वभूमी - माझी मुलगी पुढील वर्षी मिडल स्कूल मध्ये जाणार आहे. म्हणजे आताची शाळा बदलून मोठ्या शाळेत प्रवेश करणार आहे. ______ काही दिवसांपूर्वी मुलीच्या शाळेमध्ये पालकांची सभा होती. या सभेमध्ये ही मुलं ज्या "मिडल स्कूल" मध्ये जाणार , त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना आमंत्रीत केले होते. हेतू हा होता की मुख्याध्यापकांनी "मिडल स्कूल" ची माहिती द्यावी आणि पालकांना प्रोत्साहित करावे. पण झाले भलतेच. या मुख्याध्यापकांनी सुरुवातीलाच भलताच सूर लावला. त्यांनी भाषणात सांगितले की - आमच्या शाळेत चाकू/सुरे सापडण्याच्या ज्या घटना घडतात, त्यामधील हत्यारे अतिशय लहान असतात. तेव्हा काळजी करण्याचे कारण नाही.

आज ओंजळित...

लेखक ज्ञानराम यांनी सोमवार, 13/12/2010 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
आज ओंजळित... फुले अचानक पडली....... पडताच ओंळित... हलकेच मग रडली विचारण्या आधिच... मिट्ल्या पाकळया त्यांनी.. कोमेजली तरीही ... गंध देऊन नीजलि.......... आज चंदनाचे.... खोड मज दिसले.... मज पाहुनिया उगाच... मनी अलगद ह्सले..... विचारण्या आधिच... झिजुन गेले सारे.... झिजता झिजता... त्याने... दिले सुगंध सारे...... आज पावसाचे.... थेंब मजला भेट्ले.. वाटेत चालताना... डोळ्यात सारे दाटले.... विचारण्या आधिच... भिजवले डोळे त्यांनी.... पण,,,,,, भिजल्या डोळ्यांनि तेव्हा काहिच नाहि वाट्ले...........

स्वातंत्र्यलक्ष्मीचे पुजारी: गोवा

लेखक प्रीत-मोहर यांनी सोमवार, 13/12/2010 17:06 या दिवशी प्रकाशित केले.

गोवा: पुर्वपीठिका

रविवारी १९ डिसेंबर. तुम्ही म्हणाल त्यात काय मोठ्ठ? कॅलेंडरच्या इतर दिवसासारखाच एक दिवस. पण मी म्हणेन आजच्याच दिवशी भारत पूर्णपणे स्वतन्त्र झाला. १५ ऑगस्ट १९४७ ला जरी भारताचा स्वातंत्रदिन म्हणुन साजरा होत असला, तरी गोमंतक हा भारताचा अविभाज्य भाग १९ डिसेंबर १९६१ या दिवशी पोर्तुगीजांच्या ४५० वर्षांच्या जुलमी राजवटीतुन स्वतंत्र, मुक्त झाला. म्हणुन हा पुर्ण स्वातंत्रदिन! त्यानिमित्ताने गोव्याबद्दल आणि ह्या स्वातंत्र्यलढ्याबद्दल सांगायला खूप खूप आवडेल - गोव्यात पोर्तुगिजांचा प्रवेश --युरोपिय देशांमधे भारत तसा सुपरिचित होता.

सायबानू मीच त्यो .... भाग २

लेखक स्पा यांनी सोमवार, 13/12/2010 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
सायबानू मीच त्यो .... भाग १ *** त्यानंतर पुढे काय झाले त्यांना कळलंच नाही ,फक्त तिन्हीसांजेच्या भयाण प्रकाशात, ती मांजरे, तो चिंचेचा वृक्ष, त्यांची बंगली, आणि कोर्टाची इमारत भोवताली गरागरा फेर धरून नाचत आहेत एवढाच जाणवत होतं. जाग आली तेव्हा ते बंगल्यातच होते. डोक भयानक ठणकत होतं. हनम्या समोरच उभा असतो, सोबत डॉक्टर दिलीप बिरुटे! हे इथे कसे काय?