मूळ कविता : संदीप खरे
गाडी सुटली , हमाल हलले , काढा चाळीस पटकन बोले,
गाडी सुटली , पाकीट निघता , हमाल डोळे हसरे झाले,
गाडी सुटली नोट वीसाची , हातामधुनि तरी सुटेना ,
चार बोचकी चाळीस रुपडे , पटू दे म्हटले तरी पटेना,
का रे इतका जीव जाळुनी , नोट वीसाची हाती मिळते,
डोळ्यादेखत गायब होते , खुर्दा चिल्लर हाती उरते.
गाडी गेली फलाटावरी , लालपणाचा गलका झाला,
गाडी गेली , सोडा मारुन जीव तापला हलका झाला.
हे भलते अवजड असते , कुणी प्रचंडसे पेटारे , ते लांब लांब नेताना,
डोक्याच्या उप्पर आणि काहिसे खूप घेताना,