Skip to main content

मटार उसळ

लेखक मितालि यांनी शनिवार, 12/02/2011 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १ वाटी मटार , १ बटाटा, १०-१२ काजूगर,३-४ लवंगा, २ तुकडे दालचिनी, ३-४ मिरी,१-२ वेलची, १ वाटी ओले खोबरे,१/२ वाटी कोथिंबिर, ३-४ हिरव्या मिरच्या, छोटीशी चिंच, मीठ, १/४ चमचा साखर, २ चमचे तेल, पाणी, १/४ चमचा धणेजीरेपूड. कृती: बटाटयाच्या चौकोनी फोडी,मटार व काजुगर एकत्र शिजवुन घ्या. ओले खोबरे, वाटी कोथिंबिर, चिंच, हिरव्या मिरच्या, मीठ, साखर मिक्सर मध्ये वाटुन हिरवी चटणी बनवुन घ्या. तेलात लवंग, दालचिनी, मिरी,वेलची यांची फोडणी बनवा. यात हिरवी चटणी,धणेजीरेपूड व पाणी घालुन शिजवुन घ्या. नीट शिजली ग्रेव्ही की शिजलेले बटाटे,मटार व काजुगर घालुन एक उकळी येऊ द्यावी.

'च'

लेखक नाहिद नालबंद यांनी शनिवार, 12/02/2011 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
'च॒' हिच्या॒त च, तिच्या॒त च ह्याच्या॒त च, त्याच्या॒त च 'च' अक्षर देशाच्या खूप उपयोगी पडते ॥१॥ च॒ळवळीत च मोर्च्या॒त च वच॒ननाम्यात च प्रचा॒रात च खुर्ची॒त च बाचा॒बाची॒त च राजकारण्यांशी 'च' चे बरेच सख्य दिसते 'च' अक्षर देशाच्या खूप उपयोगी पडते ॥२॥ भ्रष्टाचा॒रात च लाच॒खोरात च चा॒रा घोट्याळ्यात च जकातीच्या च॒लनात च बच॒त गटात च ब्यांकेच्या चे॒कात च चा॒लू खात्यात च पैशांशीही 'च' चे खूप छान जमते 'च' अक्षर देशाच्या खूप उपयोगी पडते ॥३॥ च॒कलीत च च॒टणीत च चि॒वड्यात च चा॒ट मसाल्यात च चिं॒चेत च चि॒कण्या सुपारीत च जीभेच्या चो॒चल्यात च च॒टपटीत च॒मच॒मीत सर्वांनाच आवडते 'च' अक्षर देशा
काव्यरस

[ज्योतिष] अपयश आणि मध्यबिंदू ज्योतिष

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 12/02/2011 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
या अगोदरच्या पोस्ट मध्ये मध्यबिंदू ज्योतिषानूसार "अमाप यश" दाखवणार्‍या गुरु-प्लुटो= रवि या भौमितिक रचनेचा विचार केला. या वेळेला अमाप यशाच्या उलट म्हणजे अपयशी आणि वैफल्य निदर्शक मध्यबिंदूचा विचार करणार आहे. वैफल्य आणि अपयश यांचा विचार मंगळ आणि शनीच्या योगातून किंवा मध्यबिंदूतून केला जातो. मंगळ हा ग्रह कृती आणि उर्जेचा निदर्शक मानला जातो आणि शनी हा स्थैर्य, रचना, कायदा, अडथळे नीति-नियम इत्यादिंचा कारक ग्रह ज्योतिषात मानला गेलेला आहे. मंगळ आणि शनी एकाच वेळेला जर सक्रिय असतील तर संघर्षाला तोंड द्यावे लागते.

कवी, रसिक वाचक आणि काव्यानुभव

लेखक शरद यांनी शनिवार, 12/02/2011 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
कवी, रसिक वाचक आणि काव्यानुभव कवी म्हणजे साहित्य निर्माण कराणारा; मग तो कवी ,कथाकार, कादंबरीकार वा नाटककार असेल. वाचक हा रसिक पाहिजे कारण हिशोबाच्या चोपड्या तपासणारा वा वर्तमानपत्र चाळणारा वाचक इथे अभिप्रेत नाही. त्याला साहित्यात रस पाहिजे. ही आवड नसेल तर मग वाचक मेघदूतही दुकानदार किराण्याची यादी जा पद्धतीने वाचतो तसे वाचेल. तर असा रसिक वाचक काव्यानुभव कसा घेतो वा त्याने कसा घ्यावा याचा विचार या चर्चासत्रात व्हावा हा प्रयत्न. अनुभव तुम्ही आम्ही सर्वच घेत असतो, प्रत्येक क्षणाक्षणाला. हा अनुभव घेतांना त्यात "रस" घेतलात तर तुमचे जीवन संमृद्ध होईल. अचानक आलेल्या पावसात कोण भिजले नाही?