Skip to main content

समिधाच सख्या या...

लेखक अवलिया यांनी रविवार, 27/02/2011 08:28 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी आज २७ फेब्रुवारी. वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन. हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष म्हणूनही साजरे होत आहे. त्यांचा जन्मदिवस आपण मराठी दिन म्हणुन साजरा करतो. या निमित्ताने अनेक दिग्गज कवी, लेखक आपल्या साहित्यकृती रसिकांसमोर सादर करतील. अनेक मान्यवर आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेने त्या सर्व कलाकृतींचा आस्वाद घेतील. ह्या सर्व सरस्वती पूजनामधे माझे हे एक साधेसे फुल. सादर करत आहे कुसुमाग्रजांच्या काही कवितांबद्दल माझे विचार आणि मुळातल्या त्या कविता. त्यात बुद्धीनिष्ट निरुपण नसेल की रसास्वादाच्या सर्व पदरांना स्पर्श नसेल.
विशेष

फुलपाखरू

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 27/02/2011 07:37 या दिवशी प्रकाशित केले.
नानाविध रंगांनी भरला पुष्पसुगंधे साज बहरला दवबिंदूंना लेऊनी सजला आसमंत अमृते नाहला फ़ूलपाखरे अहा नाचती कणाकणाने मधू प्राशती पराग प्रेमे वाटत सुटती पुष्पावरुनी पुष्पावरती मउ रेशमी झाल खुणावे नारींगी पंखात झुलावे घटकेसाठी शांत बसावे चंचल हे भ्रमण विसरावे बसुन मजेने पंख हलविले फ़ुलपाखरू तिथे थबकले लावण्याला फ़ुलही भुलले उराउरी भेटण्या विसरले जरा बागडून उडून जाई फ़ुल अचलसे भुलुनी राही भ्रमर अवचिते तेथे येई नारींगी पदरात विसावी फ़ूल येतसे भानावरती क्षुधा उफ़ाळे आतुन वरती आनंदे भ्रमरा अलिंगती शोषुन जीवन, भूक शमविती

स्वसंपादन सुविधा परत दिल्याबद्दल मिसळपाव व्यवस्थापनाला जाहीर धन्यवाद.

लेखक राजेश घासकडवी यांनी रविवार, 27/02/2011 04:38 या दिवशी प्रकाशित केले.
आजच मी माझा नवीन लेख पुन्हा वाचून बघायला म्हणून उघडला तर अहो आश्चर्यम! लेखावर दोन टॅब दिसले. दृश्य आणि संपादन. माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना. मी अधीरपणे संपादन टॅब उघडला. मला माझ्या लेखाची एचटीएमेल व्हर्जन दिसली. खात्री करून घेण्यासाठी मी एके ठिकाणी पूर्णविराम टाकला, व पुन्हा प्रकाशित केला. तर काय सांगू तो पूर्णविराम मला आपल्या बिंदूमय अस्तित्वाने संपादन यशस्वी झाल्याची हमी देत होता. माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. मिसळपाव व्यवस्थापनाने सदस्यांची इच्छा विचारात घेऊन ही सुविधा परत बहाल केल्याबद्दल व्यवस्थापनातील सर्वांचेच मनापासून जाहीर आभार मानतो.

सुधारक सावरकर

लेखक विकास यांनी रविवार, 27/02/2011 04:16 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता माझ्याकडे २६ तर भारतात २७ फेब्रुवारी आहे. सावरकरांचा निर्वाणदिन आणि कुसुमाग्रजांच्या जन्मशताब्दीची सुरवात... सर्वप्रथम, या दोन्ही विभुतींना प्रणाम! ------------------------------------------------------------------------------------------------------------------------- “Leaders are visionaries with a poorly developed sense of fear and no concept of the odds against them.” असे रॉबर्ट जार्विक नामक शास्त्रज्ञाचे वाक्य आहे. या शास्त्रज्ञाने म्हणूनच का काय ते माहीत नाही पण कृत्रिम हृदयाचा शोध लावला असावा!
विशेष

१५० रुपयाचे नाणे

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 27/02/2011 02:44 या दिवशी प्रकाशित केले.
भारत रविंद्रनाथ टागोर ह्यांचे १५० वी जयंती साजरी करत आहे. रिजर्व बॅंक ऑफ इंडिया नोवेल पुरस्कार विजेत्या टागोरांच्या जयंती निमित्ताने १५० रुपयाचे नाणे चलनात आणत आहे. हे नवीन नाणे ४० मिमी व्यासाचे असून जवळपास ३५ ग्राम वजनाचे असेल. ह्या नाण्याच्या एका बाजूस रविंद्रनाथ टागोरांचे चित्र असेल तर दुसऱ्या बाजूस अशोक स्तंभ असेल. कालीदास्..भवभुति..कवि कुसुमाग्रज्...पु.ल ..आचार्य् अत्रे ह्या थोर् साहित्यिकांची नाणी यावित् या साठी सा~यांनी प्रयत्न् करणे गरजेचे आपणास् वाटते का? आपल्या मनात् जर् या व्यतिरिक्त् नावे असतिल् तर् ति सांगावित्..

हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांना आदरांजली

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 27/02/2011 02:20 या दिवशी प्रकाशित केले.
आज हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांचा ८० वा हौतात्म्यदिवस. हुतात्मा चंद्रशेखर आजाद हे हुतात्मा रामप्रसाद बिस्मिल यांच्या नंतरचे हिंदुस्थन प्रजासत्ताक समाजवादी सेनेचे सरसेनापती. प्रखर देशभक्त, धाडसी योद्धा, कुशल संघटक या बरोबरच नेता कसा आसावा याचे हुतात्मा चंद्रशेखर आजाद हे उत्कृष्ठा उदाहरण आहेत. एकदा देशकार्यात स्वत:ला झोकुन दिल्यानंतर कुठल्याही भावनांना थारा नाही हे त्यांनी वेळोवेळी आपल्या सहकार्‍यांना समजावलं. एकदा सहज हुतात्मा भगतसिंह त्यांना म्हणाले होते की त्यांनी त्यांच्या घरचा ठावटिकाणा द्यावा म्हणजे जर दुर्दैवाने वेळ आलीच तर इतर सहकारी त्यांच्या घरच्यांची वास्तपुस्त घेऊ शकतील.

मुंबई / ठाणे परिसरातील अभ्यासिका - मदत हवी आहे.

लेखक इंटरनेटस्नेही यांनी रविवार, 27/02/2011 01:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मला मुंबई तसेच ठाण्यातील अभ्यासिकांबद्दल अतिशय त्वरेने माहिती हवी आहे.. घर आहे.. चांगले ३ बी एच के, अंशतः वातानुकुलीत पण "घर म्हणजे प्रेम जिव्हाळा, दुसरं तिसरं काही नसतं" या ओळी तुम्ही ऐकल्या असतीलच, त्याच प्रमाणे घर कितीही सुंदर, लक्सझुरीअस असो पण घरात जर अभ्यासाला लागणारी मनशांती मिळत नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही.. तेव्हा माझे मिपाकर मित्र मला याही बाबतीत मदत करतील अशी आशा आहे.

क्रांतीकवी कुसुमाग्रज

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 27/02/2011 01:41 या दिवशी प्रकाशित केले.
आज २७ फेब्रुवारी, महान साहित्यिक कै. कुसुमाग्रज यांची जयंती. आज त्यांचा ९९ वा जन्मदिन, आजपासून त्यांच्या जन्मशताब्दिवर्षाला प्रारंभ होत आहे. मराठी साहित्यातील काव्य, कथा, नाटक या सर्व प्रकारात वैपुल्याने भर घालणार्‍या आणि आपला ठसा उमटविणार्‍या कुसुमाग्रजांचे मराठी कवितेत एक अढळ स्थान आहे. कुसुमाग्रजांनी उठा उठा चिऊताई सारख्या किलबिल कविता लिहिल्या तशाच पृथ्वीचे प्रेमगीत सारख्या गहन कविताही लिहिल्या. ’काढ सखे गळ्यातले’ सारखे लडिवाळ शब्दही त्यांचे आणि’जे भुक्त त्यांची राहते पोटात सारी संस्कृती’ हे स्पष्टोक्तिचे परखड बोलही त्यांचेच.
विशेष

नक्षलवाद्यांच्या मागण्या आणि सरकारी मान्यता

लेखक विकास यांनी रविवार, 27/02/2011 01:16 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. विनील कृष्णा आणि श्री. माझी यांची सुखरूप सुटका झाली. तरी देखील त्या संदर्भातील बातम्या वाचत असताना, एक प्रश्न सतत पडला होता की नक्की काय मागण्या होत्या आणि नक्की काय मान्य केले गेले आहे. मात्र याचे उत्तर कुठेच नीटसे मिळत नव्हते. वास्तवीक सरकारने देखील हे अशा वेळेस जाहीर करायला पाहीजे. त्यामुळे फुकाची गोपनीयता राहील्याने जर काही अफवा पसरणार असतील तर थांबू शकतात. शेवटी तेहलका मधे त्यांनी म्हणल्याप्रमाणे शोधपत्रकारीतेचा वापर करत मिळवलेल्या प्रतीतील मजकूर मिळाला ज्यात हे स्पष्ट दिलेले आहे.