Skip to main content

sms

लेखक chipatakhdumdum यांनी सोमवार, 04/04/2011 02:30 या दिवशी प्रकाशित केले.
मला कृपया सांगा.. ३१ मार्च च्या मध्यरात्रीपासून भारत लंका फायनल बद्दलचा sms अख्ख्या भारतात फिरला, तो एकाही मिपाकराला मिळाला नाही काय ? मला आज संध्याकाळी मित्राने त्याच्या mobile वर १ एप्रिल ला आलेला तो sms दाखवला. नंतर आता रात्री माझ्या मुंबईत रहाणार्‍या मुलीने तिला काल सकाळी तोच sms आला होता अस सांगितल. त्या sms मधल ९५ टक्के prediction खर निघालेल आहे. वाद होणार असेल आणि भावना दुखावणार असतील तर कृपया हा धागा लगेच उडवून टाकावा ही विनंती.

आश्वस्त

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी रविवार, 03/04/2011 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या रेताड रखरखाटात कोणास ठाऊक कशी चिकटून बसलीत ही पाती आणि कोण सोस त्या वा-याला सुद्धा ह्या जळजळाटात स्वतः तापत फुंकर घालण्याचा तरी मृगजळाला सुद्धा भास व्हावा मोरपिसांच्या रंगांचा? ह्या वेडेपणाच तू नाव आहेस कि कारण हे माहित नाही पण तुझा हात इथे फिरलाय हे नक्की…

हा ध्वजाचा अपमान नाही का?

लेखक युयुत्सु यांनी रविवार, 03/04/2011 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
काल वल्डकप जिकल्यानंतर स्टेशियम वर जो उन्माद बघायला मिळाला त्यात एक घॄणास्पद गोष्ट बघायला मिळाली. हरभजनसिंग आणि युवराजने राष्ट्रीय ध्वज चेहेर्‍यावरचा घाम पुसायला तसेच नाक पुसायला वापरला. सचिनने तर स्वत:ला राष्ट्रध्वजामध्ये शाली सारखे लपेटून घेतले होते. ही गोष्ट कितीजणांच्या लक्षात आली कुणास ठाऊक?.

सचिनला भारतरत्न द्यायला हवी

लेखक सुधीर काळे यांनी रविवार, 03/04/2011 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
माननीय प्रतिभाताई आणि माननीय मनमोहन सिंग यांना पाठविलेले पत्र (मूळ इंग्रजी निरोप खाली दिलेला आहे) मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो कीं आपल्या सर्वांच्या लाडक्या सचिनला आता आपल्या देशाचा सर्वोच्च मुलकी सन्मान "भारतरत्न" देऊन आपण गौरविले पाहिजे. त्याचे चकित करणारे विक्रम सर्वांनाच माहीत आहेत. पण त्याचे सहकारी खेळाडू त्याला किती मानतात आणि त्याच्यावर प्रेम करतात हे आपणही काल पाहिलेले आहेच.

सावरकरांचे , हिंदु पदपादशाही आणि इतर

लेखक मन१ यांनी रविवार, 03/04/2011 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. नुकतच स्वातंत्र्यवीरांचं "सहा सोनेरी पाने" जालावरुन उतरवुन घेउन वाचलं. हे "सहा सोनेरी पाने" म्हणजे म्हणजे भारताचा इतिहास नव्हे तर इतिहासाची समिक्षा आहे. इतिहासाबद्दलची सावरकरांची कमेंट्री आहे.(जसं Discovery Of India नेहरुंच्या दृष्टिकोनातल्या प्राचीन ते अर्वाचीन भारतीय घटना आणि समाज मानसाबद्दलच मत -संग्रह होय.) इतिहासाबद्दल भाष्य करताना ह्या पुस्तकात त्यांनी बर्‍याचदा " हिंदु पदपादशाही" ह्या त्यांच्याच पुस्तकाचा उल्लेख केलाय. पण हे पुस्तक काही मला जालावर सापडलं नाही.

( पेटवी लंका हनुमंत )

लेखक अर्धवट यांनी रविवार, 03/04/2011 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या सामन्याच्या मानकर्‍यांसाठी आणि अर्थात आमच्या लाडक्या सचिनदेवासाठी हे कवन... गदीमांचे गीतरामायणातील मूळ काव्य इथे मिळेल. काल रात्रभर नाचुन विजयाच्या उन्मादातच लिवलं गडबडीत आहे, मीटर तपासू नये. काही कडव्यांचा क्रम बदलला आहे, पण मुळ चालीवरच म्हणता येइल. (उद्या वेळ मिळाला की.. " देवहो, बघा 'माही'लीला...
काव्यरस

यांना विसरुन कसे चालेल ?

लेखक कुंदन यांनी रविवार, 03/04/2011 02:02 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही आम्ही सर्व जनता विश्वचषक अंतिम सामन्याचा आनंद लुटत असताना , मुंबईतील कायदा व सुव्यवस्था राखणार्‍या मुंबई पोलिस दलाला प्रचंड तणावाखाली काम करावे लागलेले असणार आहे. ही सर्व जबाबदारी समर्थपणे पार पाडल्याबद्दल त्यांना सलाम. या संबंधीची एक बातमी "इथे"