Skip to main content

मुखपृष्ठाची निवड करा !!!!

लेखक रामदास यांनी सोमवार, 23/05/2011 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
माझा काटेकोरांटीची फुलं हा कथासंग्रह नवता प्रकाशन या अग्रगण्य प्रकाशन संस्थेतर्फे पुढच्या महीन्यात प्रकाशीत होणार आहे. या कथासंग्रहातील कथा मिसळपाव वर गेल्या काही वर्षात आपण वाचल्या आहेतच. पुस्तकाचं मुखपृष्ठ बनवताना मुखपृष्ठकार किती मेहनत घेतात, त्याच्या मागे त्यांच्या काय संकल्पना असतात याचं दर्शन वाचकांना घडवण्यासाठी नवताच्यावतीने "काटेकोरांटीची फुलं" या कथासंग्रहासाठी बनवण्यात आलेली सर्व मुखपृष्ठ डिझाईन्स खास मिसळपावच्या सदस्यांना पहायला मिळणार आहेत. या मुखपृष्ठांमध्ये मिसळपावच्या वाचकांना जे डिझाईन सर्वाधिक भावेल तेच डिझाईन पुस्तकाचं मुखपृष्ठ म्हणून वापरण्यात येईल.

संपत्या सुटीचे पूर्वरंग

लेखक बहुगुणी यांनी सोमवार, 23/05/2011 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
या विडंबनाची स्फूर्ती आहे अरूण मनोहरांची ही सुंदर गझल, त्या चांगल्या शब्दांचा 'कच्चा माल' म्हणून वापर केल्याबद्दल क्षमस्व! अताशा असे हे मला काय होते जराशा श्रीखंडाने पँट तंग होते रिचवित आलो सागर आमरसाचे आता पाहून थेंबही मन हे दुभंग होते खूर्चीस पाठी लोटू, चक्क टेबल की हलावे भलतेच जडभारी झाले ते माझेच अंग होते टेकून पाठ थोडी पंखा वरी फिरावा निद्रेत माझिया झणी नुसते तरंग होते स्वप्नात पाहिले, कळले माझे मला की संपत्या सुटीचे ते पूर्वरंग होते
काव्यरस

वीकेंडचा मेनू

लेखक पियुशा यांनी सोमवार, 23/05/2011 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
वीकेंडचा मेनू
सध्या आमरसाचा सिझन आहे , म्हटल चला ट्रायच करुया म्हणून आमरस ,पुरणपोळी ,भात आणि आमटी अन कांदा भाजी ,बटाटा भजी, याचा घाट घातला होता .(आणि इथे देण्याचा मोह अनावर झाला म्हणुनच देत आहे ) पुरण पोळी :-अर्धा कि.

रंग कवितेचे -

लेखक विदेश यांनी सोमवार, 23/05/2011 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
पहिली माझी कविता हो प्रेयसीने वाचली - अर्धी लिहिली होती तरी अय्या कित्ती छान म्हणाली ! दुसरी माझी कविता हो आईने ती ' पाहिली ' - कौतुकाने सांभाळूनी पेटीतच ती ठेवली ! तिसरी माझी कविता हो बापाने वाच(व)ली - कागद मागे पुढे बघुन कोरी बाजू वर ठेवली ! चौथी माझी कविता हो दुसऱ्याने ती पाहिली - खो खो हसून तिसऱ्याकडून तीनशे मित्रात फिरवली ! पाचवी माझी कविता हो बायकोने वाचली - काही समजली नाही तिला रद्दीतच तिने घातली ! सहावी माझी कविता हो शेजाऱ्याने वाचली - नेहमीप्रमाणे 'जळून ' त्याने तुकडे करून भिरकावली ! सातवी माझी कविता हो टीकाकाराने चाळली - त्यालाही ना कळल्यामुळे 'सर्व
काव्यरस

अताशा मला हे असे काय होते

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 23/05/2011 08:11 या दिवशी प्रकाशित केले.
अताशा असे हे मला काय होते जराशा दुखाने नशा भंग होते रिचवूनी आलो सागर नशेचे पाहून थेंबही मन दंग होते पाश रेशमी भोगले नित्य जरी शरशय्याची अंति संग होते शुभ्र चंदेरी वस्त्रावरी ह्या फ़रफ़ाटलेले कृष्ण रंग होते शिखर दिसताची कळले मला की मिळविले मी ते, यशही सवंग होते अताशा असे हे मला काय होते येई अरुण परी मन निसंग होते

मेरे मुर्गे को क्या हुवा चाचा?

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 23/05/2011 05:52 या दिवशी प्रकाशित केले.
मेरे मुर्गे को क्या हुवा चाचा?
मेरे मुर्गे को क्या हुवा चाचा? खाता नही पिता नही बंद पडलीय त्याची वाचा ||धृ|| अब मै क्या करू उसको? नही डाक्टर दिखानेको तेरे आंगनमे वो जाताय कुकुचकु कुकुचकु वो वरडताय मेरा दानापानी नही उसको भाता अरे मेरे मुर्गे को क्या हुवा चाचा? ||१|| देख हळुहळु तो कसा भागताय लई उदास उदास दिखताय चोच उघडी रखके तो बसतोय नही फडफड फडफड करताय अब्बी तुच हैरे बाबा उसका दाता मेरे मुर्गे को क्या हुवा चाचा?
काव्यरस

लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 23/05/2011 04:20 या दिवशी प्रकाशित केले.
लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी
किती दिस झालं, आठवंना सालं गोष्ट सांगतो मी खरीखुरी; लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी ||धृ|| हि असली कसली चढती महागाई वाढत्या भावानं जीव निघून जाई पहिल्या आठवड्यात पगार संपतो बँक खाते अन खिसा रिकामा होतो पैसा जावून मी जणू होतो भिकारी लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी ||१|| ह्या भाववाढीनं डोकं वर काढलं महागाईनं आगीत तेल टाकलं पेट्रोल सत्तर रूपये लिटर झालं गरीबीत दिवस काढणं आलं उसनवारी करावी लागती दारोदारी लई दिसांची

"पांगिरा"

लेखक गणेशा यांनी रविवार, 22/05/2011 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
"पांगिरा" कथा : विश्वास पाटील दिगदर्शन: राजीव पाटील ( जोगवा फेम) --- काय लिहु तेच जास्त कळत नाहि इतका भिषण वास्तववादी आघात झालाय मनावर... ह्या चित्रपटातुन जे चित्रण दाखवले गेले आहे, ते आपल्या अवतीभोवती आपण कायम पहात असतो- ऐकत असतो आणि त्यामुळे शेतकर्यांच्या जीवनाबद्दल तेथील राजकारनाबद्दल विचार करताना मनात कमालीची अस्वस्थता आणते आहे.. सामान्य गावामध्ये वस्तीवरती लोक कसे जीवन जगतायेत.. राजकारणी -सरपंच सरकारी योजनांचा बोजवारा वाजवुन कसा पैसा उकळतो.. गावातील -वस्तीवरील लोकांच्या रोजचे जीवन तर खरेच मन पिळवटुन टाकणारे आहेत.. त्यांचे आभाळाच्या पांघरुनाखाली निजलेले स्वप्न पिक .. त्याची चिंता ..

नवाज शरीफ सही बोलले!

लेखक सुधीर काळे यांनी रविवार, 22/05/2011 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
नवाज शरीफ सही बोलले! (माझ्या नेहमीच्या लेखांतील विचारांपेक्षा एक वेगळाच विचार मांडणारा लेख) गेल्याच आठवड्यात नवाज शरीफ यांनी सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्काच दिला! कराचीत त्यांच्या "पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज" या पक्षाच्या वतीने बोलावलेल्या पत्रकारसंमेलनात त्यांनी "पाकिस्तानने आता भारताला त्याचा सर्वात मोठा शत्रू समजणे सोडून दिले पाहिजे" असे उद्गार काडले आणि "पाकिस्तानला जर प्रगतीच्या वाटेवर पाऊल टाकायचे असेल तर त्याने भारताबरोबरच्या संबंधांचे पुनर्मूल्यांकन (Re-appraisal) केले पहिजे" असेही ते पुढे म्हणाले.