Skip to main content

येस ,वी आर ...

लेखक विनायक पाचलग यांनी शुक्रवार, 10/06/2011 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
MIT ,Symboysis किंवा अशाच एखाद्या कॉलेजचा कॅंपस.. देन तीन पोरे नेसकॅफे वर कॉफी पीत फाडफाड इंग्लिश बोलताना दिसतात. आपण, सहज जवळ जाऊन नाव विचारतो.. तर ते असतात जोशी, कुलकर्णी आणि पाटील .. दॅटस इट .. मराठी येत असूनही इंग्लिश बोलणारा, चांगल्या निदान बर्‍या घरातून आलेला.हाताशी मोबाईल आणि गाडी असणारा.. शरीराने भारतात आणि मनाने इंडियात राहणारा हा आमचा तरूण वर्ग.. अख्ख्या महाराष्ट्रभर पसरलेली ही आमची जनरेशन..सुशिक्षित,मॉडर्न असा हा वर्ग .. संख्येने कमी पण ब्युरोक्रॅट्स प्रमाणे मोस्ट इफेक्टिव्ह ...

शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून २०११

लेखक मालोजीराव यांनी शुक्रवार, 10/06/2011 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
रायगडावर ६ जून रोजी हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा ३३८ वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.जबरदस्त पावसात आणि धुक्यात सोमवारी पहाटे मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली. मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर कुलदेवतेला स्मरून शिवरायांच्या सुवर्णमूर्तीवर श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते राज्याभिषेक संपन्न झाला.यावेळी महाराजांच्या जयजयकाराने सारा आसमंत दणाणून गेला होता. पोवाडे, ललकारी,तुतारी च्या आवाजाने वातावरण भारुन गेलं होतं. यावेळी नितीन देसाई यांनी पुढील वर्षी सोहळा आणखी दिमाखदार आणि भव्य होणार असल्याचा सांगितलं....तसंच रायगड,राजगड आणि सिंधुदुर्ग

राष्ट्रवादी काँग्रेसचा ब्राह्मणद्वेष की विसरभोळेपणा..?! :)

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 10/06/2011 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरील माझ्या सर्व जातीधर्माच्या मित्रमैत्रिणींनो, सप्रेम नमस्कार वि वि, आज तुमच्या-आमच्या आणि सर्वांच्याच लाडक्या राष्ट्रवादी काँग्रेसचा १२ वा वर्धापनदिन. आपली राष्ट्रवादी १२ वर्षांची झाली हो..! त्यानिमित्ते शरदमामा पवारांचे अभिनंदन बर्र का! :) या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आज मुंबैत राष्ट्रवादीने 'सामाजिक हक्क परिषद..' या नावाने एक रॅली भरवली आहे. गेले काही दिवस रस्त्यावर काही ठिकाणी त्या संबंधीचे फलक पाहण्यात येत होते.

दोन लेकांमधील अंतर

लेखक सुनील यांनी शुक्रवार, 10/06/2011 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
भारतातील शहरी मध्यमवर्गीय सध्या आम्ही दोन, आमचे एक ह्या मोडवर आहेत. परंतु, कुटुंब नियोजनाच्या सुरुवातीच्या काळात "हम दो हमारे दो" किंवा "पहला जल्दी नही, दुसरा अभी नही, तीसरा कभी नही" अशा जाहिराती प्रसिद्ध होत. दोन मुलांमध्ये किती अंतर ठेवावे ह्याची चर्चा करणारा एक रोचक लेख नुकताच वाचनात आला. आदिमानवदेखिल आपल्या अपत्यांत ३-४ वर्षांचे अंतर ठेवी, हे कळून आश्चर्य वाटले.

आज पहाटे

लेखक विश्वेश यांनी शुक्रवार, 10/06/2011 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
आज पहाटे, आळसावल्या मनात सखये उरला तुझाच बंध आज पहाटे, सुकल्या राताराणीस सखये उरला तुझाच गंध ... आज पहाटे, सोडले शरीर अन भिरभिरले मन तुझ्याच मागे आज पहाटे, संपला शिशिर, फुलवितो वसंत नवस्वप्नांचे थवे आज पहाटे, सरला काळोख, उजळले मन्मनात सोनेरी रंग आज पहाटे, झालो वैरागी, अन झालो पुन्हा मोहरानात दंग आज पहाटे, पुन्हा एकदा, बोलले किती एरवीचे तुझे नयन मुके आज पहाटे, पुन्हा एकदा, दाटले डोळ्यासमोर वास्तवाचे धुके - विश्वेश

घाव

लेखक प्यारे१ यांनी शुक्रवार, 10/06/2011 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
लोक्स चारोळीचे धागे बनवताहेत. म्हटले आपण पण न लाजता (कोण हसतोय रे तो? आहे. आहे मला थोडीशी का होईना लाज) जे काही आहे ते प्रकाशावे. वादसंवाद करताना निर्मिती झालेली आहे त्यामुळे श्रेय अर्थातच मला नाहीये. प्रस्तावना पुरे झाली. तर सादर आहे माझे शेरोशायरीतले पहिले अपत्य. घाव तो होता जुना पण वर्मी नव्याने लागला पुसटल्या जखमांना जणू आज स्पर्श कुणाचा जाहला आली अशी कळ उरी, आली उरी कळ अशी जणू अंत मी स्वतःचा, आज जवळ पाहिला
काव्यरस

स्पंदन

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 10/06/2011 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
वर्षे सुकली गुच्छ बांधले काडी एक तयातिल चंदन वळून मागे शोधू पाहे; गंध मंडली; शापित मन उगाळली आयुष्ये परि ना वात सरे ना ऋतुमंथन काळावरती ठसे अबाधित; तलम रेशमी हे बंधन घटअमृतसय निराकार; उभयांना विरहाचे प्राक्तन शोध निरागस क्षतापलिकडे; रोज सागराचे स्पंदन .............................अज्ञात
काव्यरस

दोन लेखांमधील अंतर

लेखक शरद यांनी शुक्रवार, 10/06/2011 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
१) नविन लेखकांच्या बरोबरच जुन्या लेखकांनी देखील आपल्या दोन लेखात किती अंतर ठेवावे ह्याची स्पष्ट सूचना देण्याची वेळ आली आहे असे वाटते. 'हळुहळु समजतील, लक्षात घेतील' असे वाटणे चुकीचे आहे असे वाटते. २) अनेक नवे लेखक / सदस्य हे ब्लॉगधारक असतात. मिपाचे व्यासपीठ मिळाल्याबरोब्बर ते रोज २/४ लेख ब्लॉगवरुन सरळ उचलुन आणतात आणि इथे रतिब चालु करतात. (१) श्री. परासाहेब यांच्या वरील प्रतिसादावरून मला बरेच दिवस पडलेला प्रश्न समोर आला आहे. किती लिहावे ? केव्हा थांबावे ? आपण लिहतो ते वाचकांना आवडते का ? त्याचा दर्जा काय आहे ? या सारखे अनेक प्रश्न अनुत्तरित रहातात. कोण देणार यांची उत्तरे ?

भंगलेल्या मनाचा अभंग ..२

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शुक्रवार, 10/06/2011 00:26 या दिवशी प्रकाशित केले.
फव्वारा सुगंधी लावतो शरिरा आणि त्याचा तोरा मिरवितो... तरी येइ घाम थांबवू हा कसा..? किती जरी पुसा घमघमे.. असे किती लेप माझ्या मुखावरी गंध पावडरी भस्म माझे.. पुटावरी पुटे सत्यासंगे खोटे समागमे खाटे लाज आली....