Skip to main content

वास्तविक, काल्पनिक आणि .....

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी रविवार, 24/07/2011 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
पोस्टचं शीर्षक "वास्तविक, काल्पनिक आणि ....." वाचल्यावर काही मुद्रणदोष तर नाहीना अशी शंका कुणाच्या मनात डोकावण्या आधीच नमूद करू इच्छितो की असं काही नाहीय. वास्तविक म्हणजे जे प्रत्यक्षात घडतं. ज्यावर आपलं अत्यल्प नियंत्रण असतं ते सारं काही. या अफाट विश्वाचा आपण एक अतिशय नगण्य असा हिस्सा असतो. याउलट काल्पनिक म्हणजे सर्व काही आपल्या नियंत्रणात असणारं विश्व. या जगावर आपली शंभर टक्के हुकूमत असणारच. म्हणूनच तर वास्तवातला एखादा कफल्लकही कल्पनेच्या विश्वात भरार्‍या मारताना मर्सिडिझ किंवा रोल्स रॉईसमध्येही विराजमान असतो.

एक अद्भुतरम्य जागा

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 24/07/2011 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
पॅरिसच्या गजबटापासून दूर, अतिशय शांत, निर्मनुष्य आणि अद्भुतरम्य जागा म्हणजे Parc de Saint Cloud. सुमारे ११३६ एकर जागेत पसरलेल्या या उद्यानात हजारो मोठमोठी झाडे, हिरवळी, गच्च झाडीने झाकलेल्या पायवाटा, टेकड्या, पुतळे, कारंजी वगैरे आहेत. सतराव्या शतकातील या जागेचे एक चित्र: या चित्रात डावीकडे दिसणार्‍या भव्य प्रासादात सोळाव्या शतकापासून राजघराण्यातील लोकांचे वास्तव्य असायचे, मात्र १८७० सालच्य

श्रावणमास कहाणी: वर्षभर प्रसिद्ध नारायणाची कहाणी

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 24/07/2011 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावणमास कहाणी: वर्षभर प्रसिद्ध नारायणाची कहाणी
आटपाट संकेतस्थळ होतं. आंतरजालावरती त्याचं नाव होतं. तेथे येणारा प्रत्येक सदस्य त्याचप्रमाणे सहज म्हणून येणारा पाहूणा तेथे देहभान विसरत होता. तेथील सुविधांना भुलत होता. देशोदेशातील व्यक्तींना तेथे मुक्त प्रवेश होता. म्हणूनच तेथे अनेक व्यक्तीस्वभावांचे प्रदर्शन भरले होते. असल्याच अनेक व्यक्तींपैकी राजा रवी हा एक तेथील सदस्य होता. तो मोठा पराक्रमी, मानी होता. त्याचा स्वभाव दिलदार होता. पण तो तत्वाला जागणारा होता. आपल्या तत्वाच्या बाहेर काही करण्यास त्याचा नकार असे.

योगिराणा

लेखक स्पा यांनी रविवार, 24/07/2011 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
"हनुमंत अमुची कुळवल्ली, राम मंडपा वेला गेली ,श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोलिया नामे" पहाटेच्या पवित्र वातावरणात कल्याणाची काकड आरती संपत आलेली असते. समर्थांना जाग येते. कल्याणाचा खणखणीत आवाज कानावर येतो " अमुचे कुळी हनुमंत, हनुमंत अमुचे कुलदैवत, तयावीण अमुचा परमार्थ सिद्धी ते न पावे" समर्थ उठून बसतात , क्षणभर डोळे मिटून रामाच आणि हनुमंताच स्मरण करतात. सज्जन गड कडाक्याच्या थंडीमुळे धुक्यात लपेटलेला असतो,. बाहेर राममंदिरात समईच्या प्रकाशात रामाची मूर्ती उजळून निघालेली असते.

अन्याय झाल्याची भावना आणि न्यूनगंड

लेखक सुशान्त यांनी रविवार, 24/07/2011 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
'गुगलवर मराठी यावी म्हणून मागणी' ह्या निनाद ह्यांनी काढलेल्या धाग्यावरील चर्चेत न्यूनगंडाचा मुद्दा उपस्थित झालेला दिसला. गूगलसारख्या व्यावसायिक कंपनीने मराठी भाषेसाठी एखादी सोय देणे किंवा न देणे ह्यामुळे मराठीवर अन्याय होतो ही समजूत न्यूनगंडापोटी आलेली असावी असे मत तिथे व्यक्त झाले आहे.

लाचखोर लोकांनी -

लेखक विदेश यांनी रविवार, 24/07/2011 06:45 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल: रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी...) लाचखोर लोकांनी, भ्रष्ट साऱ्या मार्गांनी स्वार्थासाठी कायदाही तोडीला पायबंद घालू त्यांच्या खोडीला |धृ| नवी कोरी गाडी काळ्या पैशाची भरली ती भेसळीच्या मालाची गुंड आले तडीपार, तडीपार जोडीला |१| पायबंद घालू.. जात येत विमानानं देशात, परदेशात दलालीत डल्ला मारी देशात, मायदेशात त्यांनी मायदेशाचा टॅक्स का हो बुडविला |२| पायबंद घालू.. चीड नाही त्यांना देशद्रोहाची मिरवित शेखी स्विस बँकेची घोळघालू नाती सारी भूखंडाच्या वाढीला |३| पायबंद घालू..
काव्यरस

(गाववाले आणि मुंबैकर)

लेखक धन्या यांनी रविवार, 24/07/2011 01:37 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा एका संध्याकाळी आमच्या गावच्या चावडीवर, गाववाले आणि मुंबईकर अशी चर्चा चांगलीच रंगली विषय तसा वादाचा, आणि सारे मुद्दे असेच कळीचे आमच्या सार्‍या गावाची शांतता या चर्चेने भंगली त्याचे झाले असे की, पूर्वापार वाद शेजारच्याच गावाशी त्यांनी आमच्या गावच्या गंज्यांना आगी लावून दिल्या जळलं मेलं ते गावाचं लक्षण, सगळे बाप्ये मेले नामर्द मुंबैकर वाणीन काकू गावकीत भावनाभरात बोलून गेल्या वाणीन काकूंच्या या बोलण्याचा गावकर्‍यांना खुपच राग आला गाववाल्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार मुंबैकरांस कुणी दिला बिर्‍हाड गावी असणार्‍या चाकरमान्यांचं बोलणंही एकवेळ योग्य मुंबैचं राशन कार्ड काढून मुंबैकर झालेल्यांनी बो

पती पत्नी और वो आणि लॉंग ड्राइव्ह ....

लेखक विश्वेश यांनी रविवार, 24/07/2011 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
हा एक स्वानुभवाचा केलेला कल्पनाविष्कार आणि कल्पनाविस्तार आहे ... याचा कुठल्याही हयात व्यक्तीशी संबंध आढळल्यास मी तुमच्या दुख्खात सहभागी आहे आणि देव तुमचे भले करो .... "डाडू ..... मला डाडू पाहिजे ....भ्या ssssss" मी जरा पान घ्यायला गाडीतून खाली उतरलो आणि मागून आमचे चिरंजीव ओरडले .... झाले ... कधी नव्हे तो आज बायकोने हट्ट केला कि "लॉंग ड्राइव्ह ला जाऊ, पान खाऊ" शेवटी आला माझ्या मागे .... तिथे पान टपरी वर ... प्रत्येक गोष्टीकडे बोट करून ... "हे काय आहे ? हे कोण आहे ? हे काका शी शी आहेत का ? हे असं का बर करतात ?" असे न संपणारे प्रश्न सुरु झाले ... "भाऊ, लहान पोराला कशाला टपरी वर आणता ...

आसूड

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 23/07/2011 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
नाही भय लाज सारे सत्तातूर देशाचा विचार कवडीमोल लोभालोभ सारा सत्तेचिये पायी आपापल्या सोयी लाघव भावे आज वाटे त्यांसी ब्रम्हांड ठेंगणे टेकीता ढुंगणे खुर्चीवरी सुखाचिया राशी त्यांच्यांच पायाशी मग जनतेशी काय पुसावे? मतीमंद झाला आज बुद्धीवंत नाही बलवंत कोणीच येथे उठ माझ्या लेका आता नको चुका नाहीतर भिका मागशील हातामध्ये घेरे सत्तेचा आसुड भडव्यांच्या ओढ पाठीवरी हिच माझी इच्छा पुरी कर बाबा देशाचा या ताबा तुझे हाती ..!!!