कान्हा
पैलतीरावर तुझी बासरी
घुमते ..कान्हा, वेड लावते
निळे मोरपीस ,श्यामल अंगी
खुलते आणिक हळू खुणवते
अस्तित्वाच्या हिंदोळ्यावर
मी ही होते राधा , मीरा
घनश्याम ,मनमोहन ओठी
निळाईत ही विरे दिठी.
निळा जलाशय निळ्या नभाशी
करीतो हितगुज हळवे,कोमल
सारे होई एकरूप अन्
व्यापून उरतो केवळ कृष्ण
शशक - भूल भुलैय्या २
तिला पटत नव्हतं तरी आमच्या दोघांच्या अधिक चांगल्या भविष्यासाठी मला तिथे जायचं होतं.
अवघड प्रवासानंतर मी तिथे पोहोचलो.
ती गाणं ऐकत होती "कसे सांगू " ? ती धावत मला बिलगली.
"आता पुन्हा जायचं नाहीस." क्षणार्धात तिनं माझ्या हातातलं मशीन बाल्कनीतून भिरकावून दिलं
"मूर्ख झालीस का ?" तिच्यासोबत मला आता रहायचं नव्हतं.
" इतकी वर्षे मी तुझीच वाट पाहिली , तुझ्यावरच प्रेम केलं. आता वयस्कर झालेली मी तुला नकोय ?" तिच्या डोळ्यात पाणी होतं.
" . . . . "
" तु गेल्यावर मी एकटीनेच घर चालवलं. तुझी संपत्ती आणि विम्याची रक्कम मला मिळाली; पण सात वर्षानंतर..
राष्ट्रपती भवन, अम्मा जी आणि सर जी
भारताचे नवीन राष्ट्रपती निवडण्यासाठीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.करोंना : माझी गल्ली , गाव, आयएमए , पतंजलि इत्यादि
दिल्लीतील अधिकान्श जनता अनिधिकृत भागात राहते. अर्थात त्याचे श्रेय ही पंडित नेहरूंच्या डीडीए अक्ट 1957ला आहे. त्या कायद्यात घरे बांधण्याचा अधिकार फक्त डीडीए मिळाला. डीडीए मागणीनुसार घरे बांधू शकली नाही. नेता आणि प्रॉपर्टी डिलर्सने हात मिळविणी करून अनिधिकृत कालोनीज बांधल्या. लोकांना घरात शिरण्यासाठी रस्ता म्हणून 10, 20 आणि 40 फुटांच्या गल्ल्या आणि रस्ते मजबूरीने निर्मित करावे लागले. त्यामुळे सार्वजनिक सुविधा- शाळा, कॉलेज, हॉस्पिटल्स, पार्क इत्यादि या भागांत फारच कमी. घरे ही जमिनीवर १५X६० ft. आणि वरचे माले दोन-दोन फूट पुढे मागे जास्त. ७० टक्के दिल्लीकर अश्याच भागांत राहतात.
बहारो फूल बरसाओ....
बहारो फूल बरसाओ मेरा महेबूब आया है......
हिंदी सिनेमातलं हे गाणे जणू खास बँडवाल्यांसाठे मुद्दाम होउन लिहीले असावे असेच वाटते. मला तर लहानपणी हे गाणे सिनेमातले नसून लग्नातले आहे असेच वाटायचे.
लहानपणे म्हणे टीव्हीवर एकदा हे गाणे लागले होते तेंव्हा मी आईला विचारले होते की "आई या गाण्यात बँडवाले कुठे आहेत? वरात कुठे आहे. काहीतरी चुकतय." माझा प्रश्न ऐकून घरातले सगळे खो खो हसत सुटले होते. तो एक किस्साच होऊन बसला होता. कोणतेही लग्न असले आणि त्यात हे गाणे वाजू लागले की सगळे इतर कुठे पहायच्या ऐवजी माझ्याकडेच पहायला लागतात. इतक्या वर्षांनंतरही.
वीस वर्षांनंतर (भाषांतर)
बीटवरचा पोलीस कडक रुबाबात रस्त्यावरून फिरत होता. ती त्याची रोजची सवयीची चाल होती. तो काही कोणाला रुबाब दाखवावा असा प्रयत्न करत नव्हता, कारण त्याला पाहायला तिथे फारसं कोणी नव्हतंच. रात्रीचे दहा वाजत आले होते. थंड वाऱ्याच्या झुळुका सुरु झाल्या होत्या. पावसाचा ओलावा दाटून आला होता. त्यामुळे रस्ते जवळजवळ निर्मनुष्य झाले होते.
चालता चालता तो रस्त्यावरच्या दुकानांची दारं ढकलून पाहत होता. हातातली काठी छानशा लयीत फिरवत होता. अधूनमधून वळून आजूबाजूच्या शांत रस्त्यांवर जरबेची नजर टाकत होता. ताठ, दमदार पावलं टाकणारा तो दक्ष पोलीस म्हणजे जणू मूर्तिमंत शांततेचा रक्षक.
मिसळपाव