मी कोण? - एक प्रयोग
मी कोण? - एक प्रयोग
============
-राजीव उपाध्ये
मला ए०आय० बरोबर वेगवेगळे प्रयोग करायचा छंद लागला आहे, हे आता जगजाहिर आहे. विचारमंथनाबरोबर वेगवेगळ्या शक्यता/बाजूंचा अंदाज घेण्यासाठी ए०आय०चा उपयोग होऊ शकतो. मला हा उपयोग अ त्यंत महत्त्वाचा वाटतो. आता कुणाला या जिलब्या वाटतील तर कुणाला पिपाणी वाटेल, पण ज्यांना कल्पकतेचं अप्रुप वाटते त्यांना हा प्रयोग आवडेल. म्हणूनच करून बघावा.
इथे मि०पा०वर डावे-उजवे इ० लेबले लावण्यचा उद्योग जोरात चालतो. त्यात धर्म मला मुक्तीच्या मार्गातला अडसर वाटतो!क्लीन बोल्ड
क्लीन बोल्ड
महाराष्ट्र क्रिकेट संघटना,
सर्वोच्च कोर्टात ली घटना ||
MCA निवडणूक प्रकरण,
सदस्यवाढ हे कारण ||
सरन्यायाधीश संतापले,
MCA प्रमुख असावा
माजी खेळाडू,
इथे घराणेशाही
नका काढू.
MCA चे सदस्य १६४,
काकांच्या नातू नं ,
गुपचुप पक्ष धार्जिणे
४०० सदस्य वाढविले आतून ||
ही कृती बेकायदेशीर,
मी डीसमिस करू का,
का करताय उशीर??
जर सदस्यसंख्या
वाढवायची,
तर माजी खेळाडूंसाठी
राखीव काढवायची ||
ज्यांना धरता येत
नाही बॅट ,
त्यांची का सदस्य म्हणून
करतात बात?!
न्यायाधीशांचा यॉर्कर
होता अफलातून,
क्लीन बोल्ड झाले
काका,नातू मनातून ||
काकांचा चाललाय
बॅड पॅच ,
सारखे विरोधक
घेतायत कॅच ||
गोल्डमेडल
वि 'लीन' करण
एप्रिल मध्ये काकांची,
संपतीय मुदत,
मग बदलावीच,
लागणार आदत ||
राज्यसभेत नाही प्रवेश,
म्हणून हा नाट्यप्रवेश ||
नुसती भावनिक
पाजा वाईन,
पाळीव पत्रकार
देती हेडलाइन ||
अपुरी संख्याबळे
मग बोला बळेबळे ||
देऊन आवळा
(१० आमदार)
पाहिजे कोहळा
(४१ आमदार) ||
प्रत्येक चाली ला,
काटशह देऊन,
नानांनी केलंय
दीन-लीनकरण ||
लोक राहिले नाहीत
पूर्वीसारखे अडाणी,
आता काय उपयोग
भेटायला येऊन अदानी ||
रीटायर चा ढोंगीपणा,
वर्षापूर्वी नसता केला,
६० वर्षाचा सन्मान
असहाय्य नसता गेला ||
ब्रेक के बाद..
ब्रेक या विषयावर मला खूप दिवसांपासून तुमच्याशी बोलायचं होतं. ब्रेक म्हणजे सिरीयल मधले ब्रेक बरं का! मध्ये मध्ये गॅप असते ना ती!
या गॅपमध्ये म्हणजे ब्रेकमध्ये मालिका दहा मिनिटे असते आणि ब्रेक वीस मिनिटांचा असतो. या ब्रेक मध्ये खूप गोष्टी काही काही जण करून घेतात. म्हणजे नॅचरल कॉल्स उरकून घेणे ,गाद्या घालणे , झोपण्यापूर्वी दात घासणे.
माझ्या सासूबाई तर म्हणायच्या", मी पटकन देवाचं म्हणून घेते. आणि देवापुढे दिवा लावायच्या .दोन स्तोत्रंही त्या म्हणायच्या. तरीही ब्रेक सुरूच असायचा. जेवणाचे ताट घेऊन खूप जण ब्रेकच्या वेळात जेवायला बसतात.
धूम्राक्ष, मानवीय इच्छा पूर्ण करणारा दैत्य
मानव ऋषीने दगड घासून अग्नी प्रज्वलित केला. अग्नीला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना केली “हे अग्नी, सुख-समृद्धी दे, शत्रूंवर विजय मिळवून दे.” त्याने उच्चारले: “अग्नये स्वाहा. इदं अग्नये इदं न मम.”
तेवढ्यात हवनकुंडातून एक धुरकट अशरीरी आकृती प्रकट झाली. हात जोडून उभी. ती म्हणाली, “मी धूम्राक्ष, अग्निपुत्र. धूर हेच माझं भोजन. मानवाच्या इच्छा पूर्ण करणं, हाच माझा धर्म.”
ऋषीने मधमाश्यांच्या पोळ्याचं मध मागितलं. धूम्राक्षने धूर निर्माण केला, मधमाश्या निघून गेल्या. ऋषीला खोकला आला, पण मधुर मध चाखायला मिळाला.
अजित दादा पवार…"मैने हमेशा मेरे दिल की सुनी है"
जवळजवळ आता एक आठवडा होत आला आहे दादा गेल्यानंतर. एका राजकारणी माणसाचा अंत मनाला इतका चटका लावून जाईल, असं कधीच वाटलं नव्हतं.
त्या दिवशी सकाळी मी जिममध्ये होतो. तेवढ्यात आमच्या दादाचा फोन आला— “तुमचे अजित दादा गेले.”
पहिल्यांदा मला काहीच कळलं नाही. “दादा गेले म्हणजे कुठं गेले?” असा उलट प्रश्न मी विचारला. दादांच्या विमानाला अपघात झाला हे ऐकल्यावर मात्र मन सुन्न झालं. लगेच मोबाईल पाहिला. यात दादा नसावेत, किंवा यातून ते वाचले असावेत, अशी एखादी बातमी पुढे यावी असं मनोमन वाटत राहिलं; पण नियतीचा फास उलटाच पडला होता.
घरी गेल्यावरही कशातच मन लागलं नाही.
दाटलेली हुरहूर.
दाटलेली हुरहूर
मन असं सैरभैर
कुणाचे हे रंग सारे
पसरले मनभर
काय झाले असे
मन वेडेपिसे
कुणाचे हे मनावर उमटले ठसे.
रंग न्हाली सांज येई
कुणाची ही भूल पडे
गंध ओल्या वाऱ्यातून
कुठे मन दूर उडे
शोधिते कुणाला
कळेना मनाला
झाडातून पानातून कोण आता दिसे
कुणाचे हे मनावर उमटले ठसे.
उमललेल्या पहाटेस
सपनात येई कोण
बहरल्या वेलीपरी
मोहरुन जाई मन
कुणाचे हे रूप
मनभर धूप
पसरून दिसभर गंधाळते जसे
कुणाचे हे मनावर उमटले ठसे.
https://youtu.be/RBXDiuu3qT8
काव्यरस
मेंदूच्या विकासातील टप्पे - नवे संशोधन
मेंदूच्या विकासातील टप्पे - नवे संशोधन
-राजीव उपाध्ये
२०२५ च्या अखेरीस 'नेचर कम्युनिकेशन्स' मध्ये प्रकाशित झालेल्या कॅम्ब्रिज विद्यापीठाच्या संशोधनाने मानवी परिपक्वतेच्या पारंपारिक सीमांना पूर्णपणे बदलले आहे. या संशोधनाने मेंदूच्या रचनेचे पाच मुख्य कालखंड आणि ९, ३२, ६६ आणि ८३ हे चार कालखंड पाडले. या वयातील "वळण-बिंदू (टर्निंग पॉईण्ट) ओळखून, हे संशोधन असे स्पष्ट करते की मानवी मेंदू त्याच्या स्थिर आणि पूर्ण विकसित अवस्थेत चौथ्या टप्प्यापर्यंत पोहोचत नाही. तसेच हे संशोधन असे सूचित करते की, ज्याला सध्या पौंडावस्था (adolescence) मानले जाते, ती अवस्था वयाच्या ३२ व्या वर्षापर्यंत सुरू राहते.
मिसळपाव