लेखकअनन्न्यायांनी शुक्रवार, 23/09/2016 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळ्यात कोकणात ठरावीक फळभाज्या मोठ्या प्रमाणात येतात. पडवळ, दुधी, काकडी, भेंडे, भोपळा, शिराळी, पारोशी त्यापैकीच एक चिबूड! ही काही फार वेगळी पाकृ नाहीय. पण ज्यांनी चिबूड पाहिला नसेल त्यांच्यासाठी!
लेखकशिव कन्यायांनी शुक्रवार, 23/09/2016 08:40 या दिवशी प्रकाशित केले.
डाव्या हाताच्या मुठी एवढ्या चिमण्या
हा हा करतात
या जीवघेण्या ओसाडीत....
कुठे दाणे टिपत असतील?
कुठे पाणी शोधत असतील?
घरटे कुठल्या आडोशाला असेल?
यांच्यात यांचे दफन कसे करत असतील?
कोण करत असेल?
चिमण्या निमित्त असतात............
आपल्याच छाटलेल्या मनाचे
हे तासनतास भिरभिरणे असते.....
.
.
.
दुसरं काय असतो
एकांत म्हणजे तरी!
---- शिवकन्या
लेखकचुकलामाकलायांनी गुरुवार, 22/09/2016 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
कधी तरी पुन्हा आपण भेटायला हवं..
ओळखीचं हसून बोलायला हवं..
किती ती धूळ गैरसमजांची,
मनाला स्वच्छ झाडायला हवं..
कुठंतरी आत सलतंय का काही?
समजूतीचं मलम तिथं लावायला हवं..
जे झालं ते झालं, ते होणारच होतं
अपराधीपणाचं ओझं फेकायला हवं..
पूलाखालून खूप पाणी वाहून गेलंय
आनंदानं जीवन आता जगायला हवं..
अर्ध्यावर सोडू नये, गोष्ट किंवा नातं
एकदा वेळ काढून ते संपवायला हवं..
लेखकbhavana kaleयांनी गुरुवार, 22/09/2016 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
तुज्या प्रेमाच्या ओलाव्यात चिंब भिजेन एवढं प्रेम करू नकोस..
प्रीतीच्या सागरात वाहून किनाऱ्याला येऊ शकणार नाही एवढं प्रेम करू नकोस...
तुझ्या सौदर्यांने घायाळ फक्त स्वप्नातच असतो मी आजकाल..
म्हणून तुझ्या मनात काय आहे ते सांग मला, मी कोणालाच सांगणार नाही..
खरं खरं सांग मला, मी कोणाला सांगणार नाही..
डोळ्यावर झोप अशी नसतेच कधी
स्वप्नात तुझी सोबत हवी हवीशी वाटते..
गजबजलेल्या गर्दीतून वाट काढताना तुझ्या
हळुवार स्पर्शाचा आधार घ्यावासा वाटतो..
तुझ्यावर प्रेम करण्याशिवाय आणखी मला काही सुचतच नाही..
म्हणून तुझ्या मनात काय आहे ते सांग मला, मी कोणालाच सांगणार नाही..
खरं खरं सांग मला, मी कोणाला सांगणार न
लेखकवरुण मोहितेयांनी गुरुवार, 22/09/2016 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
चांगल्या नोकरीचा विचार न करता राजीनामा दिला .फॅमिली बिझीनेस होताच जोडीला चिंता नव्हती. . एक असतं बाजू भक्कम असली कि लांबचे लोक बोलू शकत नाही आणि जवळच्यांचे आपण ऐकत नाही .कळत असतं पण समजत नाही .आई मुख्याध्यापिका होणारी बायको लेक्चरर आणि माझा हे असा वागणं मलाच लाज वाटत होती पण लाज फक्त सकाळी उठताना .एकदा एक पेग झाला कि संपला सगळं .पब पार्टी नेहमीच होतं पण प्रमाण वाढला दारूचं तेव्हा नकळत बहाणे देणं चालू झालं. जवळच्या मित्रांना. कारण एकच ते काय विचार करतील,जेव्हा त्यांच्यासोबत हि असायचो तेव्हाही घरी जाऊन परत ड्रिंक करणं आलच. रात्री २ ला येउदे केव्हा ३ ला कोणाला न सांगता परत एकटा ड्रिंक.
लेखकरातराणीयांनी गुरुवार, 22/09/2016 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
तर मंडळी झालं असं की मिपाराज्यात अनागोंदी माजली. कोण कुणाचा डू आयडी, कोण कुणाचा खरा आयडी काही म्हणता काहीच ताळमेळ लागेना. एक दिवस असंच रमत गमत आम्ही खरडफळा गल्लीमध्ये डोकावलो. एरवी छान गुण्यागोविंदाने नांदणारे प्रजाजन अंगात वारं भरल्यासारखे खरडी टाकत होते. सहसा धुराळी धाग्यांना वळसा घालूनच आम्ही जनातलं मनातलं, जे न देखे रवी या गल्ल्यांमध्ये पोचत असल्याने खरडी वाचून वाद कोण घालतंय आणि कोण सरळ बोलतंय हेच आमच्या निरागस बुद्धीला
झेपेनासे झाले.
अरे काय चाललंय काय? असं बसल्या जागेवरूनच आम्ही ओरडलो.
लेखकराजेंद्र देवीयांनी गुरुवार, 22/09/2016 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
हेमलकसा
रंजले गांजले आदिवासी
जमात त्यांची माडीया
लुटुनी त्यांचे अनुदान
अधिकाऱ्यांनी बांधल्या माड्या
नक्षलवादाचा घेऊन संशय
मांडला त्यांचा छळ
जन्मताच ज्यांची
ठेचली गेली नाळ
जगण्यासाठी करती
कसबसे मेळ
वर्दीतील जनावरे
करिती शरीराशी खेळ
निबिड अरण्यात शिरला
प्रकाशाचा एक कवडसा
घेऊन मानवतेचा वसा
गाव वसवले हेमलकसा
अनाथ प्राण्यांसाठी
काढले त्यांनी निवास
बनले प्राणिमित्र
गौरविले त्यांस भारतरत्न
सहकारी भेटले सारे
होते ध्येयाने भारलेली
सहचरी पण अद्वितीय
भुवरी देवमाणसे पेरलेली
राजेंद्र देवी
लेखकस्वीट टॉकरयांनी बुधवार, 21/09/2016 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
आपण नकाशावर जेव्हां भारताहून अमेरिकेकडे जाणार्या विमानांचे मार्ग बघतो तेव्हां आपल्याला एक गोष्ट खटकते. सारे मार्ग वक्राकार दिसतात. यूरोप (ऍटलांटिक) वरून जाणारा मार्ग सारखा डावीकडे वळत वळत गेल्यासारखा दिसतो आणि जपान (पॅसिफिक) वरून गेलेला उजवीकडे. तीच गत बोटींच्या मार्गांची. आकाशात आणि पाण्यात ट्रॅफिक नसतो, तर हे शहाणे सरळसोट का जात नाहीत? हा मुद्दा वेगवेगळ्या वेळेस मिपावर उपस्थित झाला आहे. शिवाय माझ्या व्यनिमध्ये देखील ही विचारणा झाली आहे.
विचारलंत ना? घ्या आता!
लेखकभटकीभिंगरीयांनी बुधवार, 21/09/2016 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
तो २००८ सालातील ११ मी हा दिवस होता. मी केसरी टुर्स सोबत ओस्ट्रेलिया टूरवर गेले होते. त्या दिवशी आम्ही सिडनीहून सकाळी ८ वाजत कॅनबेरा या कॅपिटल सिटीमध्ये गेलो. जाताना बसमधून बाहेर निसर्गाने उधळलेल्या सौदर्याचा आस्वादघेत गेलो. पूर्वीची राजधानी सिडने होती. पण सिडने समुद्र किनार्यावर आहे. आणी राजधानी समुद्रकिनार्यावर असणे सुरक्षेच्या दृष्टीने ठीक नाही म्हणून नंतर ती कॅनबेराला आणली.
DSCN2065
आमचा ड्रायव्हर ...
पुर्वि हा प्रदेश ओसाड होता. पण व्यवस्थित प्लानिंग करून हे शहर वसवले आहे. त्यामुळे ते अतिषय सुबक आहे. जाताना १२ वाजता आम्ही जेवलो.
लेखकसस्नेहयांनी बुधवार, 21/09/2016 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
(हा लेख अनाहितामधे पूर्वप्रकाशित आहे आणि तिथले काही उल्लेखनीय उत्तम साहित्य ज्यात कोणतेही वैयक्तिक संदर्भ नसतील असे यापुढे नियमितपणे लेखिकांच्या परवानगीने मिपावर सर्वांसाठी खुले करू. - अनाहिता)
------------------------------------
(आमची प्रेरणा)
मागच्या महिन्यात आमच्या घरी मोठाच फंडा झाला..
नाही हो, माझा अन माझ्या नवऱ्याचा नव्हे, तिचा अन तिच्या पिल्लांचा !
सगळा घोळ माझ्या झाडांच्या हौशीमुळे झाला असं नवऱ्याचं म्हणणं.