Skip to main content

मराठी भाषा शिकणाऱ्यांना थेट व्हिडिओ चॅटद्वारे सरावाची सोय

लेखक कौशिक लेले यांनी शनिवार, 05/05/2018 18:17 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मराठी भाषेच्या सेवेत अजून एक उपक्रम. आता मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट ऑनलाईन व्हिडिओ चॅटद्वारे माझ्याशी बोलून मराठी बोलण्याचा सराव आणि शंका निरसन करता येईल. परस्परांच्या सोयीने वेळ ठरवून बोलता येईल. प्रायोगिक तत्त्वावर असल्याने सध्या हा उपक्रम मोफत ठेवत आहे. Practice Marathi through live chat संवादसत्रांची सुरुवात आजपासून झाली. दोन जणांशी बोललो.

कोल्हापुरी भेळ

लेखक श्वेता२४ यांनी शनिवार, 05/05/2018 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
परवा आईने फ्रिज मध्ये ठेवलेली कैरी पाहिली आणि नाळेसाठी घोडा हि म्हण मी प्रत्यक्षात उतरवली. कारण कैरी साठी मी भेळ करायची ठरवली. कैरी या प्रकरणाशी माझ फारसं कधी जमलं नाही. पण ती जेव्हा ओल्या भेळेसोबत मिळणाऱया उकडलेल्या मिरच्याच्या बाजूला जाऊन बसे तेव्हा तिची दृष्टच काढविशी वाटायची. रंकाळ्यावर मिळणारी कागदाच्या कोनात झणझणीत चटकदार भेळ भरलेली त्यावर दोन मिरच्या, सोबत हि कैरीची फोड आणि पत्याचे खोचलेलं पान! पत्त्याचा चमचा करून खाल्लेली ती भेळ म्हणजे निव्वळ स्वर्गसुख! आज त्याच भेळेची रेसिपी देणार आहे. कोल्हापूर पुणे आणि मुंबई मधल्या भेळेतील फरक चिमुरयंपासून सुरु होतो. (हो चिरमुरेच!
Taxonomy upgrade extras

जालफ्रेझीची सोय

लेखक खिलजि यांनी शनिवार, 05/05/2018 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
भोपळ्याने सर्व भाज्यांना दमात घेतलं सांगितलं मी आजपासून आहे तुमचा राजा शेपू पालक सर्वानी शेपूट घालून मान दिला अन बनल्या भोळी प्रजा शेपूला केला मंत्री त्याने पालक झाला प्रधान धुसफुसणारी भेंडी वझीर केली देउनी खास सन्मान कसेबसे ते राज्य उभारले कांदे बटाटे रुसले संख्येने ते जास्त म्हणोनि आरक्षण मागत सुटले कोथिंबीरही मिरचीसंगे चूल मांडते वेगळी कडीपत्ताही राग आळवतो तर पुदिन्याची बंडाळी वांगे आपले अलिप्त तेथे , ना कसलीही चिंता गनिमीकावा गवार वापरते , वाढवत सुटते गुंता भोपळा झाला येडा पुरता डोकं झालं बधिर भेंडी देई आधार त्याला तर पालक देई धीर दोन घडीचा डाव मांडला

मधुर, मोहक ताडगोळे

लेखक जागु यांनी शनिवार, 05/05/2018 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
आकाशाला भिडायला निघालेली, सरळ उंच वाढलेलं खोड त्यावर झुबकेदार टोकेरी पात्यांची भारदस्त झाडे म्हणजे ताड. ह्या ताडाच्या फळांच म्हणजे ताडगोळ्यांचं आणि माझा लहानपणापासून अतिशय सख्य. ताडगोळे म्हटल्यावरच माझ्या मनात शांत आणि मधुर भाव उमटतात. वाचताना कदाचित हे तुम्हाला हास्यास्पद वाटेल पण असच आहे हे पुढच्या लिखाणावरून कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचेल. उरणला नागांवात माझ्या माहेरी वाडीत ताडाची ७-८ उंच झाडे होती. काही ठिकाणी एकमेकांना सोबत देत दोन-तीन झाडे एकत्र कुटुंब पद्धतीत होती तर कोणी एकटेच शांतताप्रीय, एखादे आपल्याच तोर्‍यात तर कोणी सदा प्रसन्न सळसळते.

म.मु., ट्रेन आणि पप्पू यादव!

लेखक चायवाली यांनी शनिवार, 05/05/2018 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
फार फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट नाही. साधारण ७-८ वर्षांपूर्वीची असेल. पण, त्या आधी तुम्हाला प्रश्न पडला असेल हे म.मु. काय आहे! तर म.मु. म्हणजे मराठी/मध्यमवर्गीय मुली. तर साधारण ७-८ वर्षांपूर्वी आम्ही (म्हणजे अस्मादिक आणि आमची एक घनिष्ठ मैत्रीण - म्हणजेच म.मु.) कानपूरला जाण्यासाठी कुर्ल्याला ट्रेन मध्ये चढलो. (हो हो, असा उलटा प्रवास पण करतात लोक.) आधीच पुणे ते मुंबई असा ऐन उन्हाळ्यातला एक अत्यंत घामेजलेला प्रवास करून स्टेशनला पोहोचलो होतो. त्यात उशीर इतका झाला होता, की मुंबईतल्या त्या भर दुपारी, हातात चार सुटकेसेस नाचवत DDLJ style ट्रेन पकडावी लागली.

ज्ञानदेव आणि ज्ञानेश्वर-१ 

लेखक शाली यांनी शुक्रवार, 04/05/2018 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
काही मित्रच असे असतात की ते कधीही भेटले तरी मन कसं प्रसन्न होवून जातं. पण माझ्या या मित्राची जातकुळी जरा वेगळी. मनःस्थिती चांगली असताना भेटला तर वेळ मजेत जातो पण एऱ्हवी मात्र याला पाहीले की ‘कुठून ही ब्याद आली’ असे होते. कारण हा वृत्तीने प्रचंड नास्तीक. नास्तीक असल्याने नास्तीकांचे ‘स्वयंघोषीत अधिकार’ याला प्राप्त. त्यामुळे हा सदैव हातात एक अदृष्य तलवार घेऊन हिंडत असतो. म्हणजे कुणाला चतुर्थीचा ऊपवास असला की याचा लगेच वार. कुणी सोमवारी पिंडीवर अभिषेक केला की याचा लगेच हल्ला. असेन का नास्तीक. काय लक्ष द्यायचे. असंही म्हणता येत नाही. कारण या प्राण्याचा व्यासंग मोठा दांडगा.

संघ भाजपाने याचा विस्तार करावा

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 04/05/2018 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
कदाचित राजकीय दबावातून असेल किंवा सरसंघचालकांची जेनुआईन इच्छा असेल, गेल्या दोन एक वर्षातील सरसंघचालकांची भाष्ये दलितांसोबत सामाजिक सौहार्द वाढवण्याच्या दृष्टीने संकेत देत होती, पण जमिनीवर काही विशेष घडल्याचे जाणवत नव्हते - कारण सरसंघचालकांची किती इच्छा असेल त्यांचा कार्यसर्त्यांनी ते मनोमन स्विकारण्याचे आव्हान अगदीच लहान नाही. आता उत्तरप्रदेशात दलितांसोबत राजकीय पुढार्‍यांची समरसता भोजनांची रेलचेल चालु दिसते. राजकीय पुढार्‍यांचे वागणे हवेत विरु शकते , पण कथित संत मंडळींचा या कार्यक्रमात समावेश करुन घेण्याचा प्रयत्नाची सकारात्मक दखल घेण्यास हरकत नसावी .

अ लेडी विथ द कॅमेरा…

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी शुक्रवार, 04/05/2018 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
२०११ च्या काळात इजिप्त धुमसत होता. मुस्लीम ब्रदरहूड आणि जनता यांच्यातला वाद शिगेला पोचला होता. तेहरीर चौक या सगळ्या घडामोडींचं केंद्र बनलं होतं. रोज हजारो माणसं तिथं येत-जमत, निदर्शनं करीत असतं. तेव्हा ’एक २०-२२ वर्षांची मुलगी आपल्या कॅमेरानं हे सगळं टिपत असे. आजूबाजुची परिस्थिती, अंधाधुंद माजलेली अराजकता, वारंवार निघणारे मोर्चे-निदर्शनं, त्यांच्यावरची दडपशाही, लष्कराचं डोळ्यात भरणारं अस्तित्व, जनतेतला रोष असं बरचं काहीसं तिनं आपल्या कॅमे-यात कैद केलं होतं.

झॅन्स स्कांस आणि डच पवनचक्क्या!

लेखक देतनूशंसाई यांनी शुक्रवार, 04/05/2018 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
माझे आजोबा, श्रीपूर ला साखर कारखान्याच्या लॅब मध्ये काम करायचे. कुठल्याश्या मशीन मधून उसाचा रस बाहेर पडून एका मोठ्या विहिरीमध्ये साठायचा आणि आजोबा आणि त्यांचे मित्र, ह्या विहिरींमधून पाहिजे तेवढा उसाचा रस पिऊ शकायचे, हे त्यांनी सांगितलं तेव्हा उसाच्या रसाची विहीर आणि त्या विहिरीमध्ये रस ओतणारं अजस्त्र असं मशीन कसं असेल ह्याची मी कल्पना करत बसायचो. कधी कधी कारखान्यांमधल्या यंत्र सामग्रीबद्दल त्यांनी सांगितलेलं मला पुसटसं आठवतं, पण ते सांगताना त्या यंत्राबद्दल किंवा यंत्रामागच्या तंत्रज्ञाना बद्दल त्यांना असलेला निस्सीम आदर स्पष्ट आठवतो.

उन्हाळी भटकंती: कोयनानगरजवळचा भैरवगड ( Bhairavagad near Koyananagar )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 04/05/2018 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राचा भौगोलिक विचार केला तर सपाट असणारा देश आणि समुद्रसपाटीला असणारे कोकण यांच्या मधोमध एखाद्या द्वारपालासारखा सह्याद्री खडा आहे. उंच सुळके, बेलाग शिखरे, अडचणीच्या खिंडी, नाळेच्या वाटा आणि जणु बोट धरुन उतरायला लावणारे घाट वाटा इथे आहेत. यावर नजर ठेवायला सह्याद्रीच्या मुख्य रांगेत अनेक गड, किल्ले फार प्राचीन काळापासून उभारले आहेत. अश्यापैकी एक गर्द जंगलाने वेढलेला वनदुर्ग म्हणजे कोयनेजवळचा "भैरवगड". महाराष्ट्रात चार भैरवगड आहेत, त्यापैकी कोयनेच्या म्हणजेच सध्याच्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात , सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून थोडा पुढे कोकणात झुकलेला हा गड तसा दुर्लक्षित आहे.