राजयोग - ७
तिथून निघाल्यावर जयसिंह निर्जन रस्त्याने मंदिराकडे परत जाऊ लागला. तसं तिथून मंदिर फार दूर नाही पण आज जयसिंहला परत तिकडे जावंसं वाटत नव्हतं. किनाऱ्यावर एक मोठं झाड पाहून तो त्याखाली बसला. शरीराच्या थकव्यापेक्षा त्याच्या मनाला थकवा आला होता. आज पहिल्यांदाच त्याला अगदी एकटं एकटं वाटत होतं. विचारांचा ताण असह्य व्हायला लागला तेव्हा त्यानं आपला चेहरा हाताच्या ओंजळीने झाकून घेतला. त्याला वाटलं, आजचा एक प्रश्न तर मिटला पण इथून पुढे माझ्या मनातला संशय कोण दूर करणार? चूक काय, बरोबर काय कोण सांगणार?
मिसळपाव