Skip to main content

पावसाळ्यातील एक प्रवास!

लेखक लई भारी यांनी मंगळवार, 06/08/2019 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात काही महत्वाच्या कारणांमुळे भर पावसात मुंबई-पुणे-निपाणी आणि परत पुणे असा प्रवास करावा लागला. त्या दरम्यान आलेले काही अनुभव लिहावे म्हटलं! तस म्हटलं तर खूप काही वेगळं, थरारक नाही पण माझ्यासाठी तरी बऱ्याच गोष्टी कायम लक्षात राहतील अशा होत्या. मुंबई मध्ये पाऊस वाढू लागला आणि शनिवारी दुपारी मी पुण्यासाठी बसने निघालो. प्रचंड पाऊस अपेक्षित असल्यामुळे रस्त्यावर तुलनेने गर्दी कमी होती, पण एकंदरीत पावसामुळे वेळ लागलाच. एका बोगद्यात आम्ही पोचायच्या आधी एक कार पलटी झालेली बघितली आणि धस्स झालं! घाटामधून दिसणारे धबधबे बघत ४ तासात पोचलो.

युगांतर आरंभ अंताचा भाग २२

लेखक मृणालिनी यांनी मंगळवार, 06/08/2019 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
"कुंती, माद्री, ऐकलंत का?" हातातली रवी तशीच सोडून कुंती बाहेर आली. "काय झालं आर्य?" शेतावरून मधेच परत आल्याने दोघींना काळजी वाटली. पंडुच्या नाजूक तब्येतीने त्याला काही होणार तर नाही ना ही सतत मनाला लागलेली भिती! त्यात किंदम ऋषींचा शाप.... कुंतीने माद्रीला सांगितले तेव्हा तिची अवस्था गर्भगळीत झाल्यासारखी झाली होती. राजमहल सोडून कुटीत राहायला आली तेव्हाही तिच्या चेहऱ्यावर कधी दु:खी भाव नव्हते. या शापाने मात्र तिला एकटे पाडले होते. गांधारीची सुंदरता आणि माद्रीचे लोभस रुप यात एक साम्य होतं..... लागलेलं ग्रहण! गांधारीच्या रुपाला अंधत्वाचं आणि माद्रीच्या रुपाला शापाचं!

रक्षाबंधन - भाग १

लेखक मायमराठी यांनी सोमवार, 05/08/2019 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
' रक्षाबंधन ' भाग १ भारतीय समाज केव्हा बरं अडचणीत सापडतो, असा विचार केल्यावर काय काय सुचेल? आकाशात जेवढे ग्रह तारे एवढी उत्तरे आठवली तरी एक उत्तर नक्कीच ध्रुव ताऱ्यासारखे असणार. 'सण आले की..'हेच ते तेजस्वी उत्तर असे वाटते. वरवर पाहता हे पटणार नाही किंवा लिहिणारा गोंधळात पडलेला आहे असे वाटेल कदाचित, पण आता असे वाटतंय तर लिहून तर बघू. आपल्या देशात महिनाभर सुट्ट्या सणांमुळे असतात, त्यामुळे मुख्य पंचाईत अशी की कोणत्या सणाचा गोंधळ साजरा करायचा?

चार थेंब

लेखक मायमराठी यांनी सोमवार, 05/08/2019 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
चार थेंबांत संपेल मग पाऊस तो काय, चार शब्दांत मावेल, मग माणसाचं मन ते काय, संपलाही असता तो, जर प्रत्येक थेंबाला आभाळ मिळालं असतं, मावलेही असते ते, जर प्रत्येक शब्दाला आयुष्य लाभलं असतं, पण मग उरल्या थेंबांचं आणि शब्दांचं काय ? -अभिजीत
काव्यरस

सेकशन ३७० आणि संस्थानिकांचा तनखा काहि प्रश्न

लेखक हस्तर यांनी सोमवार, 05/08/2019 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
वरवर पाहता दोनही वेगळे विषय ,एक तर देशभक्ती शी निगडित पण साम्य पण बरेच आहेत भारत स्वतन्त्र झाला तेव्हा ह्या दोन्ही अतिरिक्त सोयी मंजूर केल्या तनखा पण एकदा रद्दबातल करायचे विधेयक नामंजूर झाले पण नंतर मंजूर केले ३७० तर बऱ्याच वेळा चर्चा झाली आज गेले संस्थानिकांना तनखा मंजूर केला कारण त्यांनी संस्थाने विलीन केली व फक्त तिजोरीवर ओझे म्हणून रद्द केला केला माननीय इंदिराजी ह्यांकडून ह्या निमित्ताने पडलेले काही प्रश्न १) ज्या संस्थानिकांनी भारतात विलीन होण्यास नकार दिला त्यांना पण तनखा का दिला जात होता ?