Skip to main content

Kingआख्यान 2: फायरस्टार्टर

लेखक शा वि कु यांनी सोमवार, 30/12/2019 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
Kingआख्यान 1:- डोलोरस क्लेबोर्न टेलिकायनेसीस, टेलीपथी किंगच्या आवडत्या कथा आहेत. किंगची पहिली प्रकाशित कादंबरी "कॅरी" (Carrie- 1974) पण एका टेलिकायनेटिक शक्ती असणाऱ्या तरुण मुलीची गोष्ट होती. अपरिमित जीवितहानी करण्याइतपत शक्ती असलेली, पण बुजरी आणि एकलकोंडी असणारी एक teenage मुलगी, धर्मांध आणि वेडसर असलेली तिची आई, आणि याउप्पर कडी करायला तिला त्रास द्यायला टपलेल्या मुलामुलींचं टोळकं. या सगळ्यांच्या मिलापातून किंग विनाशाचं एक थरारक आणि तितकंच ह्रदयद्रावक तांडव रचतो.

बालकथा -लाडकं पाखरू

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी सोमवार, 30/12/2019 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
बालकथा -लाडकं पाखरू ----------------------------------------------------------------------------------------------------------------------- दिवस चांगला वर आला होता . दिन्या आळोखे - पिळोखे देत उठला . उठल्याबरोबर त्याने उशापासली गलोल चाचपली . दिन्याची आई चुलीपाशी बसली होती . उन्हाळ्याचे दिवस होते . गरम होत होतं अन चुलीपाशी तर जास्तच .तिने दिन्याला पाहिलं व ती म्हणाली , “ दिनू , लवकर आवर बाळा . मला शेतात जायाचं .बा गेलाय ना फुडं .” दिन्या तोंड धुवून आला .

लेखकाचे मानधन : कथा आणि व्यथा

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 30/12/2019 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्याच्या प्रांतात लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. मुळात एखादे साहित्य निर्माण होण्यासाठी लेखक हा मूलभूत स्त्रोत आहे. त्याने काही लिहिल्यावरच अन्य तीन घटकांचा प्रश्न उपस्थित होतो. लेखक स्वतःच्या प्रतिभेने लिहितो आणि मग ते लेखन लोकांनी वाचावे या आशेने निरनिराळ्या माध्यमांत प्रकाशित केले जाते. लेखन करताना लेखकाची बुद्धी आणि कष्ट खर्ची पडतात. त्याच्या लेखनातून वाचकांचे रंजन होते आणि त्यांना अन्य काही फायदेही होऊ शकतात. त्याचा मोबदला म्हणून लेखकाला काही मानधन मिळावे अशी प्रथा पडली. जे लेखक बाजारात यशस्वी ठरतात ते व्यावसायिक म्हणून गणले जातात.

भारतीयांचे अपमानास्पद पराभव:- प्रकरण -१ खडकीची लढाई :-

लेखक kvponkshe यांनी सोमवार, 30/12/2019 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
भाग २ नाकर्त्याचे कर्तेपण -पेशव्याची युद्धपूर्व तयारी :- रावबाजी हा नाकर्ता , करंटा,पळपुटा म्हणून कुप्रसिद्धच आहे . तर अशा या पेशव्याने युद्धाची तयारी तरी काय केली होती तेही जरा पाहू . १. नागपूरचा इंग्रजी एजंट जेनकिन्स याने गव्हर्नर जनरल यास लिहिलेल्या पत्रात ( फेब्रुवारी १८१४) पेशवे आणि भोसले यांच्यात इंग्रजांविरुद्ध सुरु असणाऱ्या खलबतांचा उल्लेख केलाय . यात पेशव्याच्या नेतृत्वाखाली संभाव्य इंग्रजविरोधी युतीचा उल्लेख आहे . २. फेब्रुवारी १८१५ मध्ये रणजित सिंग यांच्या दरबारात संपूर्ण भारतात इंग्रज विरोधी युती करण्याच्या संबंधी बोलणी करण्यासाठी रावबाजीचा माणूस असल्याचा उल्लेख आहे . ३.

"माळ्याच्या मळ्या मध्ये कोण ग उभी "

लेखक Sanjay Uwach यांनी रविवार, 29/12/2019 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
फुकटची प्रसिद्धी हि कुणाला आवडणार नाही . दूरदर्शनवर दिसणारे कलाकार यांचा मला उगीचच हेवा वाटतो . अर्थात आमच्या लहान पणी टीव्ही हा प्रकार नव्हता ,रेडीओ असायचा.

रायगड भ्रमंती

लेखक मालविका यांनी रविवार, 29/12/2019 08:46 या दिवशी प्रकाशित केले.
रायगड भ्रमंती दिनांक १५ डिसेंबर २०१९ रोजी आम्ही रायगड किल्ल्यावर जायचे ठरवले. मी, नवरा श्रीनिवास, मुलगा ईशान (इयत्ता ३री ) आणि भाची जुई (इयत्ता ५वि ). मुलांनी छत्रपती संभाजी मालिकेत अनेकदा ऐकलेला रायगड प्रत्यक्षात कसा आहे बघितला नव्हता. आता जरा मोठी झाल्याने त्यांना किल्ला, आणि त्याची माहिती कळेल अशी आशा होती. त्याप्रमाणे आम्ही प्लॅन केला. जाताना आम्ही चढून जायचं ठरवलं आणि येताना रोप वे ने. जेणेकरून मुलांना दोन्हीची ओळख होईल. रायगड चढायला १६०० पायऱ्या आहेत असं ऐकलं होतं. मुलं कितपत जमवतील जरा शंका होती. पण मुलांचा उत्साह होता. जमेल जमेल म्हणून उड्या मारत होती.

Whatsapp Romantic Shayari

लेखक तृप्ति २३ यांनी शनिवार, 28/12/2019 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
Whatsapp Romantic Shayari
खामोश दिल हमारा सब कुछ सह लेता है…. तेरी याद मे शायद ये दिल युही रोये जाता है…
Whatsapp Romantic Shayari https://www.truptisshayari.com/whatsapp-romantic-shayari
काव्यरस

भारतीयांचे अपमानास्पद पराभव !! प्रकरण -१ खडकीची लढाई

लेखक kvponkshe यांनी शनिवार, 28/12/2019 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
भाग -१ भारताला वर्षानुवर्षांचा युद्धेतिहास आहे. या लढायांची यादी अगदी मागे खेचत नेली तर पुराणात वर्णिलेल्या देव दैत्य संग्रामापासून सुरु होईल आणि राम रावण युद्ध , भारतीय महायुद्ध , झेलम चे युद्ध वगैरे प्रवास करत करत १९९९ साली झालेल्या कारगिल युध्दपाशी येऊन थांबेल .यातील काही लढाया अंतर्गत आहेत तर अनेक परकीय शत्रूं विरुद्ध लढलेल्या आहेत .काही लढायातील विजय अभिमानाने मान उंचावणारे आहेत तर अनेक लढयातील पराभव हे शरमेने मान खाली घालायला लावणारे आहेत. या लेख मालेद्वारे आपण भारतीयांना अशा शरमेने मान खाली घालणाऱ्या लढायांची चर्चा कारणार आहोत .

सूर जाणिले कोणी

लेखक मायमराठी यांनी शनिवार, 28/12/2019 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
खाली दिलेल्या लिंकवर जे गाणे आहे त्यावर काहीतरी खरडलंय. https://youtu.be/kWOXZmIIrSo २ दिवसांपूर्वी ९ वीच्या अभ्यासक्रमातील 'मेंदू'शी झटापट सुरू होती. उजवा बाजूला कुठली केंद्र व डाव्या बाजूला कसले हिशोब असं काय काय चर्वीचरण चालू होतं. "संगीत, नृत्य अशा कलांची जबाबदारी उजवा भाग घेतो." वाक्य वाचून झालं. आता हे शिकवायचं कसं ? का घेतो? कशी घेतो? कोण व कधी ठरवतं? जन्मतः घेऊन येतो हे सेटिंग का समाज व परिस्थितीनुसार बदलतं? हा माणूस अरसिक / रसिक असणार हे उजवा किंवा डावा भाग छापून आणत असतील तर बरंच आहे.

वृक्षतोड...

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 27/12/2019 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
दिसतील ती झाडे, कापीत चाललो मी होऊन मेघ काळा, शापित चाललो मी श्रुंगार झडून गेला, गर्भगळीत निस्तेज वृक्ष पानगळीत श्वास गुंतलेला शोधीत चाललो मी झाले उन्हाळे अनेक, ओसाड उदास राने ओले अधीर अश्रू, कुरवाळीत चाललो मी पसरला गहिरा अंधार, झाकोळला आसमंत दिशाहीन प्रवासात, ऐटीत चाललो मी डागाळला चंद्र उरी, नभास का खंत आहे आपुलेच खोटे नाणे, घाशीत चाललो मी -------- शब्दमेघ (Edited)