मुंबई-पुणे-मुंबई (भाग २)
१ फेब्रुवारीला लग्न समारंभ उरकल्यानंतर आतील पुण्यातला गोंधळ पाहिला आणि २ तारखेला भावासोबत outskirts मधली शांतता अनुभवली. ३ तारखेला रविवारी परततीचा प्रवास करायचा होता. रात्री उशीरापर्यंत बॅग भरायचा प्रोग्रॅम सुरू होता. २-३ दिवसाचे माझे कपडे मी ३१ आधीच पुण्याला पाठवले होते, आता ते परत बदलापूरला मलाच आणायचे होते. त्यात किलोभर चितळे भाकरवडी होतीच. २-३ lit पाणी, १ रेडबूलचा कॅन, अंडी असा सगळा ६-७ किलोचा संसार पाठीवर येणार होता. भाकरवडीला चिक्कीची सोबत लोणवळ्याला होणार होती.
रविवारी ६:०० ला निघायच ठरवल आणि मी ६:३० नंतर भावाच घर सोडल.
मिसळपाव