त्यादिवशी सकाळी लवकरच उठले. मुलाला आवरुन डे केअर मध्ये पाठवलं. ऑफीसला येणार नसल्याचं कळवलं. याआधी ससुला 1 वर्षाचा असताना आमच्या 20 जणांच्या एकत्र कुटुंबासह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली होती. पण वेळेअभावी कान्हेरी गुंफा बघायला जमलं नव्हतं. त्यामुळे आज आम्ही कान्हेरी गुंफा बघायला जायचं ठरवलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जेवणाची फारशी सोय नसल्याचा अनुभव असल्याने दुपारी जेवायला सोबत पराठे-दही-लोणचं-पाणी असं सगळं बॅकपॅकमध्ये भरुन घेतलं. बोरीवली लोकल पकडली आणि आम्हाला खूपच रोमांचकारी वाटू लागलं. चक्क ऑफीसला दांड्या मारुन आम्ही भटकंती करत होतो! ऑफीसची वेळ निघून गेली असल्याने लोकल बरीच रीकामी होती. निवांत गप्पा मारु लागलो. खूपशा जुन्या आठवणी पुन्हा उजळून निघत होत्या व मन आनंदाने व उत्साहाने भरुन गेलं होतं.
साधारण पाउण तासात आम्ही बोरीवली स्टेशनवर उतरलो. संजय गांधी उद्यान तसे स्टेशनपासून चालत जाण्याच्या अंतरावर आहे. पण आम्हाला अंमळ उशीरच झाला होता पोहोचायला. त्यामुळे सरळ रिक्षा केली आणि उद्यानाच्या प्रवेशद्वारावर पोहोचलो. मीटरने फारतर 20-25 रु. होतात पण तेथील रिक्षावाले काहीच्याकाही भाव सांगतात तेव्हा याची काळजी घ्यावी.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील दरपत्रक

नुकताच पावसाळा सुरु झाला होता. एक दोनदा पाऊस पडून गेला होता. तरीही पावसाने अजून जोर पकडायचा होता. वातावरण काहीसे ढगाळ पण कोरडे होते. एकदोनदा पाऊस पडून गेल्यामुळे सर्वत्र हिरवळ व थंडावा जाणवत होता. उद्यानात पोहोचताच आपण मुबंईत आहोत याचा विसर पडतो इतका हवेमधील बदल जाणवायला लागतो.कान्हेरी गुंफा या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बऱ्याच आत आहेत. चालत जाण्यासारखे हे अंतर नाही. अर्थात उत्साही लोकांना पायी भटकायचे असेल तर जाऊही शकतात. पण एकंदरीत तो रस्ता तसा वर्दळीचा नाही. त्यामुळे चालत जाण्याच्या दृष्टीने सुरक्षित वाटला नाही. तीथे पोहोचायला उद्यानाच्या वतीने बसेस आहेत पण खाजगी टॅक्सीवाले शेअरवर मिळतात. माणशी 50रु. घेतात. शिवाय सायकल/टू व्हीलर भाड्यानेही मिळतात. आम्ही शेअर टॅक्सीने गेलो.
संजयगांधी राष्ट्रीय उद्यानात फिरायला यायचं तर सकाळी 9 पर्यंत येऊन कान्हेरी गुंफा पहाव्यात. दुपारी द्यानात परत येऊन जंगल सफारी करावी व तलावात बोटींग करावे. बोटींग संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच आहे. यानुसार प्लॅनिंग केले तर एका दिवसात येथील मुख्य आकर्षणे पाहून होतील. पण खरं सांगायचं तर राष्ट्रीय उद्यानाचा हा परीसर अतीशय रमणीय आहे व निवांत फिरावा असा आहे. आमची गाडी हिरव्यागार जंगलातून मार्गाक्रमण करत होती. काही अंतरावर रस्त्याच्या बाजूला रानमेवा विक्रेते बसले होते. एकंदरीत रस्ता चांगला होता. आमचे आपापसातील हितगुज संपून निसर्गाशी हितगुज सुरु झाले.
टॅक्सितून घेतलेले काही परिसराचे फोटो
उद्यानात परिसरात दिसलेली काही घरे
रानमेवा विक्रेते
10-15 मिनिटात आम्ही कान्हेरी गुंफा येथे पोहोचलो. थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर तिकीटघर आहे. माणशी 15 रु. तिकीट आहे. ही जागा परिरक्षणासाठी भारतीय पुरातत्वखात्याच्या नियंत्रणाखाली आहे. हा परिसर अतीशय स्वच्छ आहे. नवे बांधकाम सुरु होतो. जवळच एक टपरीवजा हॉटेल व बाजूला बसण्याची व्यवस्था करणारे दगडी बांधकाम चालू होते. त्यामुळे तिथे प्रवेश निषिद्ध होता. हॉटेलच्या उजव्या बाजुला थोडे चालत गेले की, स्वच्छतागृहाची सोय आहे. पिण्याच्या पाण्याचीही सोय आहे. एकंदरच योणाऱ्या पर्यंटकांच्या सोयीचा इतका विचार केला आहे हे पाहून आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. एव्हाना सव्वाबारा वाजले होते त्यामुळे आम्ही जेऊनच लेणी बघायला जायचे ठरवले. इथे एकमेव हॉटेल असून ते काही फारसे चांगले नाही. बटाटेवडे, समोसा व मिसळ असे काही मोजके पदार्थ तेथे खाण्यासाठी मिळतात. तर बिस्कीट,चहा,कॉफी,पाणी व निवडक शीतपेये मिळतात. या हॉटेलमध्ये असलेल्या बैठकव्यवस्थेवर आम्ही सोबत आणलेल्या दही-पराठेंचा आस्वाद घेतला. या परिसरात माकडांचे प्रमाण खूप आहे. आपल्या आसपास माकडे सतत फिरत असतात त्यामुळे सावध राहावे लागते. पोटोबा झाल्यानंतर आम्ही गुफांकडे प्रयाण केले.
एकमेव हॉटेल

दगडी बांधकाम व माकडांचे फोटो
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पयली , लैच excitment वाटते
भटकंती छान.
त्यांचाही उल्लेख येईल पुढच्या भागात.
In reply to भटकंती छान. by गवि
तुमची भटकंती वाचून इतरांना
धन्यवाद काका
होय खरंच उपयुक्त.
सुंदर .....
छान लिहिताय.
छान
महाराष्ट्रात असून देखील अंकासह सगळी पाटी मराठीत आहे हे पाहून आश्
वा !
वाह
हो
In reply to वाह by श्रीरंग_जोशी