परतीचे प्रवास
म्हातारी माणसे एकटीच बसून
अश्रू ढाळतात.
कधी सहजच पाणी येते त्यांच्या
डोळ्यातून उगाच.
अचानक विकल होतात ती मागचे
काहीबाहि आठवून.
सैरभैर होतात माना हलवत
चेहेऱ्यावर अपराधी भाव घेऊन...
काय बर होत असेल त्यांना ?
कोण आठवतय आता या वयात ?
कशाने असे बावरले जात असतील ?
कसल्या वेदना पाझरताहेत मनातून?
आता खूप दूर निघून गेलेल्या
माणसांना काही सांगायचे असेल,
का आता जवळ असलेल्यांना
काहीच सांगता येत नसेल?
भोगलेल्या वेदनाचे माप ओतायचय
त्यांना कोणाकोणाच्या पदरात
की दिलेल्या दुखांच्या डागण्या
पुसायच्यात कापऱ्या हातांनि?
खोटे मुखवटे ओरबाडायचेत
उरल्या सुरल्या ताकतीने
का पडलेले चेहेरे पुन्हा एकवार
ठाकठीक करायचेत
मिसळपाव
दोन वर्षांपूर्वी विजयदुर्ग किल्यावर गेलो होतो, तेव्हा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प खाडीच्या पलीकडे दिसत होता. या प्रकल्प परिसराला भेट देण्याचे तेव्हाच नक्की केले होते. आज सायकलिंग करत जैतापूरला जाण्यामुळे माझ्या बकेटलिस्ट मधील एक इच्छा पूर्ण होणार होती.
सकाळीच राजापुरातील वाल्ये गावातून सुरुवात करून कोंडये घाटी रस्ता निवडला.