दोन घडीचा डाव.....!!
*दोन घडीचा डाव...*
*"जीवनात ही घडी अशीच राहू दे"* .. सुखा-समाधानाच्या प्रसंगात, आनंदाच्या लाटांवर तरंगत असताना, प्रत्येकाला अगदी असचं वाटत असतं. पण *"घडीने घडी काळ आयुष्य नेतो.."* या कटू सत्याचं भान मात्र आपल्याला कधीच नसतं. त्यामुळे बरेचदा जीवनात अचानक नैराश्य येतं. एकाकी अन् असहाय्य वाटतं, आणि आपलं जीवन व्यर्थ आहे की काय...? असे विचार मनात रुंजी घालू लागतात. त्यासाठी हे सिंहावलोकन किंवा एक विचार मंथन.....!!!
चौ-यांशी लक्ष योनीतून प्रवास झाल्यावर म्हणे हा मनुष्याचा जन्म येतो. ती आपली सर्वात मोठी देणगी असते. हे आपण कालौघात विसरतो.
मिसळपाव