Skip to main content

सिंग इज किंग : शुद्ध व निखळ मनोरंजन नव्हे तर "फसवणुक" !!!

लेखक छोटा डॉन यांनी सोमवार, 25/08/2008 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
. समजा तुम्ही अतिशय पट्टीचे खवय्ये आहात. चवदार व लजीज अन्न हा तुमचा विक पॉइंट आहे. बाजारात आलेली नवी "चटपटीत डिश" चाखण्यासाठी तुम्ही पैशाचा विचार करत नाही. तुम्ही स्वतःच्या खिशातले पैसे टाकुन खास "हॉटेलात" जाऊन त्या डिशचा आस्वाद घेता, कुठेतरी नेटवरुन त्याची पाककॄती उतरवुन हेऊन त्याचे घरगुती प्रयोग करुन पैसे वाचवण्याचा नतद्रष्टपणा तुम्ही करत नसता. योग्य मालाच्या व लायकीच्या पदार्थासाठी पाहिजेतेवढा पैसा मोजण्याची तुमची दानत व तयारी असते. पण तुम्ही सध्या आयुष्याच्या कंटाळवाण्या कालखंडातुन मार्गक्रमण करत आहात. काहीच तुमच्या मनासारखे होत नाही. जाईल तिकडे निराशा पदरी पडत आहे.

प्रो.देसाई म्हणतात,

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 25/08/2008 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
"जीवनात सतत अडचणी येतच असतात,म्हणून जे काही नशिबात आहे ते होणार असं समजून जर त्या अडचणींचा स्विकार केला,आणि स्वतःच्या जबाबदाऱ्या झिडकारल्या तर जीवनात काहीच मिळवलं जाणार नाही. माणसाने स्वतःला परिस्थितीचा बळी झालो असं समजू नये. उलट माणसाने आपली आहे ती परिस्थिती जमेल तेव्हडी स्विकारून आणि त्याचं योग्य कारण पहाण्याच्या प्रयत्नात असलं पाहिजे. माणसाच्या मनात श्रद्धा का असावी?

फाळणी

लेखक सौरभ वैशंपायन यांनी सोमवार, 25/08/2008 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
११ जुलै रोजी मुंबईत रेल्वेमध्ये जे स्फोट होऊन २०० पेक्षा जास्त माणसं मारली गेली होती त्या नंतर दोन दिवसांनी मला ही कविता सुचली आहे. शक्य तितकं वास्तव मांडण्याचा प्रयत्न केलाय. दुर्दैवाने गेल्या २०-२५ दिवसांत अश्या घटाना घडात आहेत कि सुभाषबाबुंचे ३रे कडवे आपण खरच खुप सिरीअसली घ्यायला हवे. ----------------------------------------------- परवाच एका स्फोटात मेलो, पहिल्याच झटक्यात स्वर्गात गेलो, स्वर्गात जाण्याचा एकच कायदा होता, सरळ जगण्याचा हाच एक फायदा होता.

माझे फोटो - सूर्यास्त

लेखक ईश्वरी यांनी सोमवार, 25/08/2008 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
माझे घर पूर्व पश्चिम असल्याने घरातून सूर्योदय आणि सूर्यास्त नेहमीच बघायला मिळतो. सूर्य मावळत असताना संधीप्रकाश असतो तेव्हा आकाश निरभ्र असेल तर लाल , गुलाबी , केशरी रंगाच्या छटा तर फारच सुरेख दिसतात. हा मावळतीचा सूर्य डोळ्यांना नेहमीच सुखावतो.

प्लम सुफले

लेखक स्वाती दिनेश यांनी सोमवार, 25/08/2008 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- २५० ग्राम डब्यातील प्लम,१ चहाचा चमचा बटर,२ अंडी,२ टे‌बल स्पून मैदा १.५ चहाचा चमचा लिंबाची साल किसून,३ चहाचे चमचे वॅनिला अर्क किवा २ पाकिटे वॅनिला साखर १५० ग्राम स्पाइझक्वार्क/चक्का/केफिर चीज/क्रीम चीज यापैकी जे उपलब्ध असेल ते. १ टेबल स्पून साखर,१ चिमूट मीठ कृती- बेकिंगट्रे/डिशला बटर लावून घेणे.प्लम्सचे अर्धे तुकडे करणे आणि त्यांना काट्याने टोचे मारणे व ते बेकिंग ट्रे मध्ये लावून घेणे.

जय हो

लेखक अमेयहसमनीस यांनी सोमवार, 25/08/2008 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
लोकमान्य टिळकांनी प्रथम पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात केली आणि बघता बघता सार्वजनिक गणेशोत्सव परदेशातही साजरा होऊ लागला. यंदा प्रथमच हॉलंडच्या हेग शहरात गणेशोत्सव साजरा होणार असून, यासाठी सोमवारी पुण्यातून गणेशमूर्ती रवाना करण्यात येत आहेत. मूर्तीबाबत देशमुख म्हणाले, "मूर्ती पूर्णपणे आंतरराष्ट्रीय नियमांचा विचार करून निर्माण केली आहे. मूर्तीसाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला असून, ती पर्यावरणपूरक आहे. हे नियम फक्त आंतरराष्ट्रीय मूर्तीला का? भारतात पर्यावरणाला काही धोका नाही का? अमेय

मिपा - अभिरूची कट्टा....(पोथी)

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 25/08/2008 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे वार्ताहराकडुन शनीवार श्रावण कृष्ण सप्तमी शके १९३० पुण्यपत्तन मोडकी बातमी ( ब्रेकिंग न्यूज) आज वडगाव धायरी येथे एक भव्य मिपा सदस्यांचे जंक्षन फ़ंक्षन झाले त्यावेळी काही सदस्यांस उत्खनन करताना एक दूर्मीळ हस्तलिखीत सापडले. हे हस्त लिखीत पोथी स्वरुपात असुन त्यात आष्चर्य म्हणजे मिपा सदस्यांच्या मेळाव्याचे वर्णने चक्षुर्वैही सत्यांशासह वर्णीले आहे, मूळमजकूर अर्धमागधीत आहे. या शोधाबद्दल सर्वत्र मिपा सदस्यांत तसेच पुणपतनातात एकच कौतुहल निर्माण झाले आहे.

प्रश्नांत खरोखर जग जगते

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 25/08/2008 08:27 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा अघटीत घडले. देवाच्या असंख्य न उमगणार्‍या लीलांपैकी एक लीला. माणसांना प्रश्न पडायचेच थांबले. कोणी कुणाला काहीच विचारेना. आपणा स्वतःला नाही. आई वडिल मुलांना नाही. मुले शिक्षकंना नाही. मालक नोकराला नाही. जनता राजकारण्याला नाही. कोणाच्या मनांत काहीच प्रश्न उरले नाहीत. मग विचारणार काय? सगळे कसे स्वच्छ माहीत आहे. प्रत्येक जण माहीत असलेल्या ज्ञानाच्या आधारे काम करू लागला. नवीन आलेला कोणी, प्रश्न विचारत न बसता, इतरांचे पाहून तसेच करू लागला. नवीन जन्माला आलेल्या बाळासारखा. जर अनुकरण करून, किंवा पाहणी करून काय करायचे ते कळले नाही, तर फारच सोपे. काहीच करायचे नाही.