Skip to main content

कोलंबीची आमटी

लेखक ललिता यांनी बुधवार, 15/10/2008 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
ही सारस्वत पध्दतीची आमटी शेवग्याच्या शेंगा घालून करतात... एक वेगळी चव! ४०० ग्रॅम सोललेली कोलंबी (धुऊन घ्यावी) अर्ध्या नारळाचे खोबरे १ वाटी नारळाचे घट्ट दूध १ मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला १ शेवग्याची शेंग (४'' चे तुकडे करावे) कैरीचा तुकडा - नाहीतर बोराएवढी चिंच पाव चहाचा चमचा धने ४ मिर्‍याचे दाणे ४ सुक्या मिरच्या हळद मीठ चवीप्रमाणे किंचित तेलात धने + मिरे + सुक्या मिरच्या परतून खोबर्याबरोबर वाटाव्या. कोलंबी, कांदा, कैरी किंवा चिंच, शेवग्याच्या शेंगेचे तुकडे व हळद थोडे पाणी घालून शिजवा. कांदा पारदर्शक झाला की घने-खोबर्‍याचं वाटण व मीठ घालून मंद आचेवर पाच मिनिटे उकळवा.

फक्त तुझ्यातच

लेखक द्विज यांनी बुधवार, 15/10/2008 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
फक्त तुझ्यातच विश्व सारे शान्त आहे फक्त तुझीच भ्रान्त आहे प्रतिभा आत्मविश्वासाने भरलेले तारुण्य फक्त तुझ्यातच जीवन किल्मिशात गु॑तलेले माझे तुझ्यात गु॑फलेले प्रत्यय, अनुभवा॑नी नटलेले कारुण्य फक्त तुझ्यातच नयनास्त्रा॑च्या वेधातुन फुललेल्या अबोल भेटीतुन अगम्यात ब्रम्ह शोधण्याचे सामर्थ्य फक्त तुझ्यातच
Taxonomy upgrade extras

माझ्या हिंदीचा बोलु कवतिके

लेखक भोचक यांनी बुधवार, 15/10/2008 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला हिंदी चांगलं कळतं असं मराठी माणसाला उगाचच वाटत असतं. म्हणजे त्यात थोडं तथ्य नक्कीच आहे. अहिंदी भाषिकांमध्ये मराठी लोकांनाच हिंदी जास्त चांगली कळते आणि बोलताही येते. पण म्हणून आपण आपली संपूर्ण अभिव्यक्ती त्या भाषेत करू शकतो असं नाही. आता हा अनुभव महाराष्ट्रात तितका येणार नाही. पण उत्तरेकडे गेल्यानंतर अनेकदा हिंदी चांगली समजत असूनही अनेकदा आपला 'मोरू' होतो. इंदूरमध्ये सुरवातीला आल्यानंतर हिंदीत संवाद साधणं काही कठीण नाही, अशीच भावना होती. पण काही दिवसात आपोआपच विकेट पडायला सुरवात झाली. बायकोने एकदा तूप आणायला लावलं. इथे दुध-दुभतं भरपूर. त्यामुळे त्याची दुकानही बरीच.

विनोद - प्राचीन कथा

लेखक वारकरि रशियात यांनी बुधवार, 15/10/2008 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या काथ्याकूटात एक शब्द वाचला - 'बादरायण'. मनात सहज विचार आला की हा 'बादरायण' (संबंध) शब्द आपण वापरतो, त्याचा संदर्भ (किंवा कथा) कदाचित सर्वांना माहित नसेल. शक्य असल्यास श्लोक आणि पार्श्वभूमी लिहावी असा विचार केला. आपल्यालाही असे अनेक कथा संदर्भ (किंवा कथा) श्लोक माहित असतील. माहित असल्यास श्लोक आणि पार्श्वभूमी सह लिहा - अपेक्षा आहे चांगल्या विनोदाची !!! तर सुरु करतोय 'बादरायण' (संबंध) कथा (श्लोकासह) (पूर्वी ) एकदा एका गृहस्थाकडे बैलगाडीतून काही पाहुणे आले. बायकोला वाटले की नवर्‍याकडील पाहुणे असतील, तर नवर्‍याला वाटले की बायकोकडील मंडळी असतील !

तुझ्यासवे पुन्हा नवा जन्म घेतो...

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 15/10/2008 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
का पाहु मी चन्द्र आता चेहेराच तुझा दिसतो तेथे विसरावयाचे ठरवुन ही तुलाच पहातो जेथे तेथे.... तू अशी माझ्या भवती वेढाच पडे आठवणींचा जीव माझा कंठी येतो पोहताना समुद्र तो. मी प्रयत्न सोडुन बुडून जातो तुझ्यासवे पुन्हा नवा जन्म घेतो...

वेळ

लेखक अनिरुध्द यांनी बुधवार, 15/10/2008 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ आली वेळ झाली मनुजा सांगून गेली काळ आहे बदलला झटपट कामाला लागा संप आणिक दगडफेक झाले ते रोजचेच बॉम्बस्फोटही पचवण्याची आम्हास आता सवय झाली नेते आमुचे बसले नुसते मस्ती त्यांना खुर्चीची सामान्यांना असते चिंता इथे रोजच्या खर्चाची सगळे असती इथे सारखे मरणा-यांचे नशीब सारखे किती गेले, किती राहीले, अतिरेक्यांनी काय साधले निष्क्रीयतेने बघतो आपण चला करुया आज एक पण वेळ आता आली क्रुतीची एकजुटीने लढण्याची बघू नका जात-पात गुंफून हातात हात एकदिलाने सारे लढू शत्रुस त्या दूर पळवू छत्रपतींचे आम्ही सैनिक राष्ट्राचे ही आम्ही पाईक राष्ट्र आमचे, देश आमचा अभिमान आम्हां तिरंग्याचा वेळ आली, सांगून गेली ऊठ आत
Taxonomy upgrade extras

आपल कोल्हापुर

लेखक झकासराव यांनी बुधवार, 15/10/2008 07:26 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, कोणी जर कोल्हापुरला फिरायला जात असेल तर त्याला काय काय बघाव ह्याची लिमिटेड लिस्ट माहिती असते. ह्यातच जर अजुन काहि भटकंती करणार्‍या लोकाना फार प्रसिद्ध नसलेल्या जागांविषयी माहिती कशी द्यावी?? किंवा मला तरी सगळ्या कोल्हापुरतील जागा माहित आहेत का?? मी प्राथमिक शाळेत असताना आमची एका दिवसाची सहल जात असे. अशा सहलीत मी कात्यायनी, खिद्रापुर अशा फारशा प्रसिद्ध नसलेल्या ठिकाणी देखील जावुन आलो आहे. ही ठिकाण बाहेरच्या (कोल्हापुरच्या बाहेरच्या लोकाना जे तिकडे पर्यटनाला येतात) कोणालाच विशेष माहिती नसतात. मग त्याची माहिती कशी मिळेल. आपल्याकडच्या पर्यटन खात्याबद्दल काहि न बोललेलच बर.

(अशीही एक) कोजागिरी

लेखक बेसनलाडू यांनी बुधवार, 15/10/2008 03:50 या दिवशी प्रकाशित केले.
आलेत एकाच दिवशी पूर चांदण्यावरच्या कवितांचे चंद्र,भरती नि शब्द - भलतेच गेलेत वरती म्हणायचे! कोजागिरीला हवा कशाला बिलियन्स् चा बेल्-आउट्? ****************** मिळतील तितके चंद्र घालून बांधल्या असत्या कित्येक भेळी भरतीपण मग आली असती सांगेन तश्शी - नेमक्या वेळी भेळवाला बघा मराठी, 'भैयाची भेळ' आउट्! ***************** दाट सायीच्या पडद्याआडून गोड चेहरा दिसला असता (हाती ग्यालन् 'फॅट्-फ्री'चे, अन् विचारसुद्धा पातळ नसता) कुण्याकाळची याद कुणाची छळे अशी थ्रूआउट् *****************

मिसळपाव आणि साबूदाण्याची लापशी

लेखक आनंद घारे यांनी बुधवार, 15/10/2008 02:15 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईहून न्यूयॉर्कला केलेल्या विमानप्रवासाबद्दल मी चार ओळी लिहिल्या होत्या तेंव्हा या लिखाणावर फारशी चर्चा होईल असे मला वाटले नव्हते. माझा तसा उद्देशही नव्हता. अमेरिकेला गेल्यानंतर तिथला एक मांडीवरला माझ्या तावडीत सापडला तेंव्हा तो कसा चालतो ते पाहण्यासाठी त्याच्याशी चाळा करता करता मिपाचे संकेतस्थळ हाती लागले. समर्थांच्या एका सुप्रसिद्ध ओवीच्या पहिल्या दोन चरणांवरून प्रेरणा घेऊन "जे जे आपणांसी कळावे, ते ते इतरांसी सांगून मोकळे व्हावे" असा विचार मनात आला आणि गारठलेली बोटे कीबोर्डावर बडवून घेतली.