Skip to main content

मुलांना आहे तसंच खरं ते सांगाव.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 26/10/2008 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
रमाकांत परूळेकर आणि त्यांच कुटूंब रत्नागिरीतल्या एका लहानशा परूळे नावाच्या गावात राहातात.रमाकांतचं बरंचस आयुष्य मुलं आणि त्यांच शिक्षण ह्यावर केंद्रित आहे. ते गावातल्या शाळेत शिक्षक होते.अगदी पहिली पासून ते आठवी पर्यंत प्रत्येक वर्गात त्यांनी शिक्षक म्हणून आपला अनुभव घेतला होता.आता गावात आणखी दोन तीन शाळा झाल्या आहेत आणि ते सध्या शाळेच्या स्कूल बोर्डाचे सभासद आहेत. परूळ्याला आमच्या घराचं दैवत आदिनायण,त्या दैवताचं पुरातन मंदीर परूळ्यात आहे.ते पहाण्यासाठी मी अलीकडे गेलो होतो. मंदिरातल्या पुजार्‍याने मला रमाकांत परूळेकरांची ओळख करून दिली.आणि त्यांच्याच घरी मी दोन दिवस राहयला होतो.ह्या मुक्कामात

माझ्या स्वप्नातील भारत

लेखक हेरंब यांनी रविवार, 26/10/2008 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या स्वप्नातील भारत असा असावा. १. कुठल्याही प्रकारचा जातिभेद वा धर्मभेद नसेल. २. त्यामुळे अर्थातच कुठल्याही प्रकारच्या विशेष सवलती कोणालाही नसतील. ३. कुठलेही धार्मिक उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे केले जाणार नाहीत. कुठल्याही धर्माचे विशेष लाड होणार नाहीत. ४. लोक शांततेने रहातील, कुठल्याही प्रकारचे ध्वनिप्रदुषण नसेल. ५. सर्व समाज भ्रष्टाचारमुक्त असेल, तसे करणार्‍यास कडक शासन होईल. ६. सर्व नेते हे पारदर्शक प्रक्रियेने निवडले जातील, काम न केल्यास मतदारांना त्यांना परत बोलावता येईल. ७. सर्व क्षेत्रांत केवळ 'गुणवत्ता ' हाच निकष असेल. ८.

अभाविपची आक्रमक धर्मांधता...

लेखक विकी शिरपूरकर यांनी रविवार, 26/10/2008 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
शिक्षणक्षेत्रात आपल्या रचनात्मक आंदोलनामुळे आणि संस्कारशील तरुणांच्या संघटित ताकदीमुळे स्वतंत्र अस्तित्व तयार केलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवर दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे गंभीर आरोप लावले जात आहेत. मालेगाव शहरातील नूरानी मशीद भागातील भिकू चौकात गेल्या 29 सप्टेंबर 08 रोजी रात्री झालेल्या स्फोटात 5 जण ठार झाले होते. या स्फोटामागे 'अभाविप'चे कार्यकर्ते असल्याचा आरोप समोर आला आहे.

दिवाळी अचानक मिपा कट्टा..!

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 26/10/2008 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
शीर्षक वाचल्यावरच काही लोकांच्या कपाळाला आठ्या पडल्या असणार याची कल्पना आहे! "साले हे मिपाकर कट्ट्याव्यतिरिक्त दुसरं करतात काय? एकत्र जमून खाणे-पिणे एवढंच यांना ठाऊक आहे! त्यापेक्षा एकत्र जमून एखादं समाजोपोयोगी काम का नाही करत?" वगैरे वगैरे ताना काही लोकं घेतील याची कल्पना आहे! :) अहो पण मी काय म्हणतो, आधी मुळात मिपाकर हे एकमेकांना आपुलकीने भेटतात, एकत्र जमतात, हे काय कमी आहे? करतील की काही चांगली कामंही! गेल्या वर्षभरापासून नुकतीच कुठे कट्ट्यांना सुरवात झाली आहे.

हिंदूंनो, आपल्या संस्कृतीत शिरलेल्या कुप्रथा टाळून धर्मचरणाचे पालन करा !

लेखक सनातन यांनी रविवार, 26/10/2008 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदूंनो, दिवाळीच्या सणातील पाश्चात्त्यांचे अंधानुकरण टाळा ! सध्या दिवाळीत विद्युत् सजावट, अनाठायी रोषणाई, नको तेवढा फटाक्यांवरील खर्च, आतषबाजी इत्यादी गोष्टींना अवास्तव महत्त्व दिले जात आहे. या सर्व बाह्य दिखाऊपणाने आता हळूहळू आमच्या धार्मिक कृती व प्रतीके यांवरही हल्ला चढवण्यास सुरुवात केली आहे. भारतीय आता हळूहळू पाश्चात्त्यांचे अनुकरण करू लागले आहेत; परंतु भारतीय संस्कृतीने दिलेला प्रत्येक विचार, परंपरा व तिची प्रतीके यांमागे एक शास्त्रसंमत अशी बैठक आहे, हे धर्मशिक्षणाच्या अभावामुळे त्यांच्या लक्षात येत नाही. पुढच्या पिढीला तर हे माहीतही होणार नाही, अशी स्थिती आहे.

बिग सर....

लेखक बबलु यांनी रविवार, 26/10/2008 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
या ऊन्हाळ्याच्या शेवटाला आमच्या घरापासून जवळच असलेल्या "बिग सर" पॅसिफिक सामुद्रिक Scenic Highway ला गेलो होतो. मस्त प्रकरण आहे हे ! अतिविशाल पॅसिफिक समुद्र, क्यालिफोर्नियाची नयनरम्य coastline आणि उत्कृष्ट हवामान. त्यातलेच काही फोटू....

आमचा बॉस आणि आम्ही

लेखक मूखदूर्बळ यांनी रविवार, 26/10/2008 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा बॉस आणि आम्ही, एकत्र राबतो. बॉस राबवतो. आम्ही 'राब'तो. आम्हाला कधीतरी ऑफीसला जायला उशीर होतो. नेमका तेंव्हाच, आमचा बॉस लवकर आलेला असतो. आम्हाला पाहून आमचा बॉस एकवार आमच्याकडे बघतो आणि एक वेळ घड्याळाकडे. आमच्या मनात विचार येतो ' घड्याळाच्या जागी आमच्या बॉसलाच लटकवावा' , पण... चेहेर्‍यावर 'आपल्याच घड्याळाचे काटे मोडल्याचा' भाव आणावा लागतो. आमचा बॉस विचारतो, "उशीर का झाला?" आम्ही सांगतो, " ट्रेन लेट" "मग तूमच्या बरोबरचे देशपांडे वेळेवर कसे?" " ट्रेन पकडायला लेट. " आम्ही उत्तरात थोडासा बदल करतो. आमचा बॉस आमच्या हजेरी बूकात एक फूली मारतो. आम्ही बॉसला मनातल्या मनात ३ ते ४ 'फूल्या' वहातो.

अरे आपल्या बिरुटेसरांना वाचवा...! :)

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 26/10/2008 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
अरे आपल्या बिरुटेसरांना वाचवा..! आपल्या मिपाचे माननीय संपादक साहेब प्रा डॉ दिलिप बिरुटे सध्या उपक्रमावर खरडवहीच्या एका प्रकरणात अडकले आहेत व त्यांच्यावर आणि उपक्रमावर अजामीनपात्र गुन्हा दाखल झाला आहे आणि ऐन दिवाळीत बिरुटेसर गजाआड जातील की काय अशी चिंता उत्पन्न झाली आहे! :) आमचे मित्र व उपक्रमाचे मालक शशांक आणि आमची मैत्रिण व उपक्रमाची संपादिका प्रियाली ही मंडळींनादेखील या केसमध्ये अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे!

मराठीपणा

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 26/10/2008 04:32 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मिपामधे दोन विषयांवर भरपूर चर्चा वाचायला मिळाली आहे. पहिला विषय- राज ठाकरे ह्यांनी धसास लावलेला, मराठी प्रदेशात मराठी माणसांना नोकरी मिळण्यास प्राधान्य हवे हा. दुसरा शुद्ध, अशुद्ध भाषेचा. ह्या दोन्ही विषयांना जोडणारी एक बातमी इ सकाळवर वाचली. कर्नाटकात, मराठीपळ्या आणि कोननकल्ल गावात १७९७ सालापासून स्थायीक झालेली मराठी कुटूंबे. २०० वर्षे जुना बाज असलेली भाषा तिथे अजूनही वापरली जाते. मराठीपळ्यात १००% मराठी लोकसंख्या आहे.

मराठीपणा

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 26/10/2008 04:31 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मिपामधे दोन विषयांवर भरपूर चर्चा वाचायला मिळाली आहे. पहिला विषय- राज ठाकरे ह्यांनी धसास लावलेला, मराठी प्रदेशात मराठी माणसांना नोकरी मिळण्यास प्राधान्य हवे हा. दुसरा शुद्ध, अशुद्ध भाषेचा. ह्या दोन्ही विषयांना जोडणारी एक बातमी इ सकाळवर वाचली. कर्नाटकात, मराठीपळ्या आणि कोननकल्ल गावात १७९७ सालापासून स्थायीक झालेली मराठी कुटूंबे. २०० वर्षे जुना बाज असलेली भाषा तिथे अजूनही वापरली जाते. मराठीपळ्यात १००% मराठी लोकसंख्या आहे.