Skip to main content

पं.भीमसेन जोशी कुणाचे?

लेखक आनंद घारे यांनी शुक्रवार, 07/11/2008 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
स्वरभास्कर पं.भीमसेन जोशी यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाल्यामुळे सर्वांनाच खूप आनंद झाला आहे. मिसळपाववर तर दुसरी दिवाळी साजरी होत आहे. माझ्या मनात ज्या विभूतींना सर्वोच्च आदराचे स्थान आहे त्यात पं.भीमसेन जोशी यांचा समावेश होतो. तेंव्हा त्यांच्या विरोधात मला एक अवाक्षरसुध्दा लिहायचे नाही किंवा वाद घालायचा नाही हे आधीच स्पष्ट करतो. विकीपीडियावर यासंबंधी माहिती शोधतांना एक गोष्ट मला जाणवली त्याबद्दल या ठिकाणी लिहीत आहे. आजवर ज्या आदरणीय लोकांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला त्यांच्या यादीमध्ये नांवाबरोबर ती व्यक्तीचे मूळ राज्य किंवा राष्ट्र कोणते हे दिले आहे.

सर्वात मोठा जोक

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी शुक्रवार, 07/11/2008 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या मटा मधिल एक हसु आणनारी बातमी भ्रष्टाचार कळवा... दोन लाख मिळवा! टेबलाखालचे' व्यवहार करणारे सरकारी अधिकारी व कर्मचारी यांच्या अवैध मालमत्तेची माहिती कळवा आणि दोन लाख रुपये मिळवा, अशी घोषणा राज्य सरकारने केली असून मालमत्ता जितकी अधिक, तितके बक्षीसही वाढत जाणार आहे! सरकारी व निमसरकारी अधिकारी, कर्मचारी व लोकसेवक यांच्या अवैध मालमत्तेची खबर देणाऱ्यांना १० हजार ते दोन लाख रुपयांपर्यंत बक्षीस देण्यात येईल. खबऱ्याने २५ लाखांपर्यंतच्या अवैध मालमत्तेची माहिती अॅन्टी करप्शन विभागाकडे दिल्यास त्याला १० हजार रुपयांचे बक्षीस मिळेल.

भारतामधील दहशतवाद - एका नवीन वळणावर....

लेखक नाम्या झंगाट यांनी शुक्रवार, 07/11/2008 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
कर्नल श्रीकांत पुरोहित यांनी मालेगाव मधील बॉम्बस्फोटमध्ये सहभाग असल्याची धक्कादायक कबुली दिल्याची बातमी नुकतीच वाचनात आली. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3684027.cms भारतामधील दहशतवाद एका नवीन वळणावर येऊन ठेपला आहे. या बाबत आपल्याला काय वाटते???

बरेच काही..!

लेखक उपटसुंभ यांनी शुक्रवार, 07/11/2008 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
आठवशिल तर आठवेलसे बरेच काही. अजुनी आहे राहिले तसे बरेच काही. मुठीत नाही आली स्वप्ने खंत कशाला, ओंजळीतही मोहवेलसे बरेच काही.. क्षितिजापाशी सांज देऊनी गेली मजला. निशा, चांदणे, गंध, कवडसे बरेच काही.. तुझे वचन स्वप्नी येण्याचे म्हणून निजतो. घडले आहे जागवेलसे बरेच काही.. जगता जगता नकळत पायी तुडवत गेलो. श्रद्धा, निष्ठा, प्रेम, भरवसे बरेच काही.. आज किनारी उरलेले वेचण्यास आलो, वचने, शपथा, पावले, ठसे बरेच काही..! -- अभिजीत दाते
Taxonomy upgrade extras

(चकणा )

लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 07/11/2008 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
(चकणा ) उमाकांत काणेकर यांचे गीत असलेली , शोभा गुर्टू यांच्या आवाजातील एक अप्रतिम गझल ' उघड्या पुन्हा जहाल्या, जखमा उरातल्या ' याचे हे विडंबन त्यांची माफी मागून -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- मिळता पुन्हा सगळा चकणा बशीतला दिसती मम डोळ्यांना मदिरा पेल्यातल्या घेऊ कशी नुसती घशात जळजळे सुरवात करताना, चकल्या पुढातल्या निघता वलय ओठी, हळुवार सिगारचे मिळतात त्या अजुनी शेंगा भाजलेल्या पिऊनिया उरावी, ती भुक लागलेली तू विसरलास होत्या नोटा खिशातल्या ----------------------
Taxonomy upgrade extras

शतकांच्या बाद्शहाला सलाम

लेखक वासुनाना आले यांनी शुक्रवार, 07/11/2008 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर भारतिय क्रिकेटचा खंदा आधरस्तंभ तितकाच नम्र विनयशील आणी सच्चा खेळाडु तो जितका खेळाडु म्हनुन श्रेष्ठ तितकाच एक व्यक्ती म्हनुन ही श्रेष्ठ आहे याच सचिनने आपल्या कारर्किदीतील प्रतेक शतकांमधे कोनाचा ना कोनाचा हात आहे असे सांगुन त्यांना धन्यवाद दिले म्हनुनच मटा च्या बातमीचा संर्दभ यथे देत आहे नारंगी नागपुरात सचिनच्या गुलाबी शतकाचा साज चढला आणि जामठा गावचे विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे स्टेडियम पावन झाले!

तुम्हाला काय वाटते?

लेखक विकास यांनी शुक्रवार, 07/11/2008 08:47 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता म.टा. चाळत असताना "महाराष्ट्राबाहेर एकही परीक्षा जाऊ देणार नाही!" ही बातमी वाचण्यात आली. हे उद्गार अर्थातच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचे आहेत :-) बाकी त्यांचे राजकारण अथवा राज्य चालवण्याची पद्धत (?) मला मान्य नसली तरी त्यांचे हे वाक्य कुठेतरी पटले: "महाराष्ट्रात मध्यंतरी परप्रांतियांना मारहाण झाली, अनेक उद्योग बंद पडले. पण, ते सुरू करण्यासाठी स्थानिक कामगार मिळाले नाहीत. आमचा मराठी माणूस ती कामे करण्यास तयार नाही!

रगडा पॅटीस

लेखक आकांक्षा यांनी शुक्रवार, 07/11/2008 06:02 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः (२ जणांसाठी) पॅटीस करिता :३ उकडलेले बटाटे, हळद, मीठ, रवा. रगडया करिता : २ वाटया उकडलेला हिरवा वाटाणा, १ मोठा टोमॅटो, १ मोठा कांदा, बारिक केलेला आल - लसुण (अंदाजे), मीठ, फोडणी साहित्य, तेल, लिंबाचा रस (आवडीनुसार), चिंच खजुर चट्णी, दही. सजावटीसाठी: बारिक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, आणि बारिक शेव. कृति: प्रथम बटाटे कुसकरुन घ्यावे. त्यात मीठ, हळद घालावे व मळून घ्यावे. उभे चप्पट असा आकार देऊन कटलेट सारखे बनवुन घ्यावे. कढई मध्ये तेल गरम करुन घ्या. त्यात मोहरी टाका, तडतडली की त्यात कांदा टाका, गुलाबी झाला की बारिक केलेल आल लसुण टाका, मग टोमॅटो टाका. थोड परतुन घ्या.