Skip to main content

नॉस्टेल्जीया

लेखक विनायक पाचलग यांनी शुक्रवार, 20/03/2009 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
चायला आजचा दिवस काही वेगळाच गेला आज सकाळी रेग्युलर कॉलेज वगैरे करुन आलो आणि अभ्यासाला बसलो तेवढ्यात लक्षात आले की आमचा नजीकचा भुत़काळ व नजीकचा भविष्यकाळ(दहावी आणि बारावी) यांची परिक्षा संपत असल्याचे लक्षात आले .वेळ बघतो तर दुपारचे एक वाजलेले ,बर विषय आला तो आला तो काही डोक्यातुन जाइचना. सारखे माझे गेल्या वर्षीचे दिवस आठवु लागले .दहावीची परीक्षा झाल्यावर आम्ही केलेली मजा ,जवळजवळ वीस जणानी एकत्र जावुन पाहीलेला वन टु थ्री हा बोगस चित्रपट .लेट खेळलेली रंगपंचमी वगैरे वगैरे . अचानक जणु काही २८ मार्च २००८ हा दिवस डोळ्यासमोर उभा राहिला.

मधुराभक्ती

लेखक क्रान्ति यांनी शुक्रवार, 20/03/2009 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
मज ध्यास दर्शनाचा रे, ना कसलीही आसक्ती अंतरात माझ्या वसते, मीरेची मधुराभक्ती मी गीत तुझे गुणगुणते चैतन्य जणू रुणझुणते गीतातून माझ्या करते तव प्रीतीची अभिव्यक्ती तन राही जरी संसारी मन घेते गगनभरारी एकाच ठायी अनुभवते आसक्ती आणि विरक्ती काळोख मनाला ग्रासे हा जन्मही शापच भासे तुजवाचून जगण्याचीही उरली ना इच्छाशक्ती सर्वस्व तुला अर्पावे आयुष्य इथे संपावे तुजसाठी पुन्हा उमलाया, या जन्मि मिळावी मुक्ती
Taxonomy upgrade extras

मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

लेखक भोचक यांनी शुक्रवार, 20/03/2009 19:19 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आशा भोसलेंच्या हस्ते झाले आहे. वादात अडकलेल्या साहित्य संमेलनाला त्या उपस्थित राहिल्या हेच खूप. त्यांनी भाषणही बरं केलं. त्यात साहित्यापेक्षा त्यांनी गायलेल्या गाण्यांशी संबंधित काव्याचा जास्त उल्लेख होता. मानापमानाचे नाट्यप्रयोग इथेही रंगले. माजी संमेलनाध्यक्ष म. द. हातकणंगलेकर तर अपमान झाल्याने निघूनच गेले. रामदास फुटाणे आणि अशोक नायगावकरांनी आनंद यादवांचे भाषण वाचून दाखवावे असा आग्रह धरला होता म्हणे. मुख्य कार्यक्रमात तर फुटाणेंनी कौतिकरावांचे भाषण थांबवून त्यांना यादवांच्या भाषणांच्या प्रती वाटायचे आश्वासन घेतले.

तू..... !

लेखक चंद्रशेखर महामुनी यांनी शुक्रवार, 20/03/2009 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
तू...... तू इथेच कुठेतरी आहेस.... की हा तुझा भास आहे ?... वार्‍याची झुळुक होउन येणारा... तुझा स्पर्श आहे कि रातराणीचा सुवास आहे?...... भोवती फ़ेर धरुन ,आजकाल तु नुसती नाचत असतेस..... गिरक्या घेत..वाकुल्या दाखवत..माझी होणारी धांदल बघत असतेस.. पुस्तक उघडल्यावर,आताशा,तुझा चेहेराच दिसायला लागतो..... हार्मोनियम उघडुन मग मी.. तुझी फ़र्माइशी गाणीच गायला लागतो.... रस्त्यावरुन जाताना..वळ्णा-वळ्णाला.. आठवणी दिसायला लागतात... सिग्नल संपुनही रस्त्यात तसेच थांबल्याने... मग मागच्या लोकांच्या शिव्या खायला लागतात.......... निळ्याशार आकाशात... चंद्राकडे पाहाताना..

महगाइचा दर कसा ठरवतात

लेखक राहुल सरकार यांनी शुक्रवार, 20/03/2009 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
आज वर्तमान पत्रात वाचले की महागाईचा दर .४४ % ज़ाला आहे. पण मला सांगा तुम्हाला कुठे महगाई कमी जालेली दिसते काय ? आणि हा महागाईचा दर ठरवतात कसा? एसी ऑफिस मधे बसून महगाई कलते का या लोकाना! का election आले की असे महागाईचा दर कमी होतो (महगाई नाही)

हरवलेलं सुख

लेखक आनंदयात्री यांनी शुक्रवार, 20/03/2009 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
माझं गाव तसं शांत आहे. म्हणजे वर्दळीच्या वेळेतही बर्‍यापैकी मोकळे रस्ते असतात. आमच्या भागात तसा उन्हाळा जरा कडकच. मग दुपारच्या वेळेस उन्हाळ्यात रस्ते, गल्ल्या अगदी मोकळ्या मोकळ्या असतात. तुरळक चुकार एखादी रिक्षा धावते, किंवा कुल्फीवाला/बर्फ का गोलेवाला पुकारा करत जातांना दिसतो. दुपारी मात्रं उन चांगलेच तापलेले असते. शिशिरातली पानगळ धुळीच्या भोवर्‍यांवर स्वार होउन गल्लोगल्ली, छोट्या मोठ्या मैदानांवर नाचत असते. आईची नजर चुकुवुन बाहेर खेळणारे एखादे चिमुरडे त्या वावटळींमधे कागदाचे तुकडे टाकण्यात मग्न असते.

लिहून काय साधले

लेखक केशवसुमार यांनी शुक्रवार, 20/03/2009 15:44 या दिवशी प्रकाशित केले.

आमची प्रेरणा वैभव जोशी यांची अप्रतिम गझल  जगून काय साधले

लिहून काय साधले विचारतोस केशवा
(निदान तू तरी असे म्हणू नकोस "केशवा")

जरा कुठे लिहायला तजेलदार लागले
धुण्यापरी तरी  कशास बडवतोस केशवा

अरे मला विचार ना, तिनेच बोंब मारली
पुन्हा पुन्हा तिला म्हणे सतावतोस केशवा

अजून वाटते नवल कशी असेल ती बया
स्मरून जीस तू असा थरारतोस केशवा

उन्हाळा

लेखक जागु यांनी शुक्रवार, 20/03/2009 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळ्यात प्रत्येकाच्या तोंडावर रोज एकदातरी ही वाक्य येतातच. "केवढ गरम होतय आज" रोज मध्ये हा आज असतो. "काय उन पडलय कडकडीत", "बाहेर नकोस वाटतय उन्हामुळे", "कधी संपेल हा उन्हाळा ?" उन्हाळ्याकडे आपण ह्याच दृष्टीने बघतो. तो नकोसा वाटतो. गर्मि ने जीव हैराण होतो. खरच आहे ते. पण ह्यातले आपण फक्त अवगुणच पाहतो. पण ह्यात पण बरेच गुण आहेत. उन्हाळ्यातच मुलांना आणि आपल्याला मार्च एप्रिल पासून सुट्टीचे वेध लागतात. गावाला जायचे, फिरायला जायचे बेत आखायला सुरूवात होते. मे महीना म्हणजे काय मजेला उधाणच. मामाच्या गावाला ह्याच दिवसांत जायला मिळते. शाळेला सुट्टी मिळुन झोपेवरचे, खाण्यावरचे बंधन नाहीसे होते.

खाजाच्या करंज्या

लेखक स्वाती दिनेश यांनी शुक्रवार, 20/03/2009 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
पेठकरांनी दिलेल्या कातील करंज्या पाहून मला खाजाच्या करंज्यांची आठवण झाली.
साहित्य- आवरणासाठी: १ वाटी रवा, १वाटी मैदा, दूध, ५,६ मोठे चमचे साजूक तूप, २ ,३ चमचे तांदळाची पिठी/कॉर्नफ्लोअर सारणासाठी: १ नारळ,२ वाट्या साखर, वेलचीपूड,२ चमचे बदाम/काजू पावडर,मूठभर बदाम,पिस्ते इ.चे तुकडे,बेदाणे ( ४,५ चमचे गुलकंद वेलचीऐवजी घातला तरी वेगळा,सुंदर स्वाद येतो.) खवा हवा असल्यास अर्धी वाटी खवा घेऊन भाजून घ्यावा आणि अर्धी वाटी साखर जास्त घ्यावी. तळणीसाठी :