Skip to main content

बेणारे

लेखक शरदिनी यांनी मंगळवार, 19/05/2009 01:36 या दिवशी प्रकाशित केले.
बेणारे युद्धपिपासू साम्राज्यटोळ्यांच्या शोकसंघर्षातून गर्वल्यालेला बधिराsकांत तोंडी लावायला लब्धप्रतिष्ठित सुरुंगा-तुरुंगांच्या चित्ताकर्षक बाजारगप्पा चिअर्स चिअर्स आणि विद्धनजरेने पहायची पैलतीरावरच्या बेणारेची सुटकाधडपड किंवा वितळून राहायचे ऐलतीरी झारीतल्या शुक्राचार्यासारखे आळोखे पिळोखे देऊन कंटाळा आल्यावरती मात्र टाळ्या पिटून निघून जायचे उगाच तो आकांत मनाला चिकटला तर काय घ्या म्हणत म्हणत की "अशी धडपड अनुभवायची म्हन्जे " हौ एक्सायटिंग नै "? १८ मे २००९, पुणे
Taxonomy upgrade extras

बालसाहित्य

लेखक अनिल सोनुने यांनी मंगळवार, 19/05/2009 01:13 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना नमस्कार, काही दिवसापूर्वी मी मराठी मुलांसाठी तयार केलेल्या संकेतस्थळाला आपण भरभरुन प्रतिसाद दिलात त्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांच्या प्रेरणेनेच मी आता नव्या स्वरुपात संकेतस्थळ तयार केले आहे. आपल्याला ते आवडेल, उपयोगी पडेल अशी अपेक्षा आहे. कृपया बालजगत.कॉम ला भेट द्यायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्याकडे मुलांसाठी उपयोगी पडेल असे लेख, गोष्टी, गाणी इ. असतील तर अवश्य पाठवा. आपल्या नावासहित ती प्रसिद्ध केली जातील. तसेच संकेतस्थळ चांगले करण्यासाठी आपल्या सूचना, प्रतिक्रिया अवश्य पाठवा.

`उत्तर'क्रिया!

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 18/05/2009 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
निवडणूक निकालाची धामधूम संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून राज ठाकरे त्यांच्या नित्यक्रमाला लागले होते. नाही म्हटलं, तरी प्रचार संपूनही प्रत्यक्ष निकालापर्यंत गडबड कायम होतीच. बेरजा वजाबाक्‍यांची चर्चा सुरू होती, समीकरणं मांडली जात होती. प्रत्यक्ष निकालाच्या दिवशी तर मनसेची दिवाळीच साजरी झाली होती. पहिल्याच निवडणुकीत अनेक उमेदवारांनी लाख-दीड लाख मतांपर्यंत बाजी मारली होती. अधिक जोर लावला असता, तर आणखी काही जागा जिंकलोही असतो, अशी परिस्थिती होती. लोकांच्या अगदी "मनसे' प्रतिसादामुळं सगळेच भारावले होते.

लग्न म्हणजे...

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 18/05/2009 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याच्या एका टप्प्यावर कुणाची तरी साथ हवीशी वाटते...(तात्यासारखा "बाई-बाटली'त न गुंतणारा एखादाच!) निर्णय कसा घ्यायचा, हे मात्र ठरलेलं नसतं. "अमक्‍याची तमकी लग्नाची आहे...' कुणीतरी सुचवतं. "तमका तुला अगदी शोभून दिसेल हो!' भोचक शेजारीण काकू मध्येच नाक खुपसतात. प्रत्यक्ष निर्णय आपल्यालाच घ्यायचा असतो.

आमची शाळा

लेखक वडापाव यांनी सोमवार, 18/05/2009 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉगिंगचे वेड हे आता सर्वत्र पसरत आहे. नुकतेच ऐकले, की मी ज्या शाळेत शिकलो, त्या शाळेचीही अनुदिनी आहे. त्यामध्ये शाळेतील विद्यार्थी-शिक्षकांनी आपले लेख व कविता दिलेल्या आहेत. आमच्या मुंबईतील दहिसरगावचे (आता ते गाव राहिले नाही) हे पहिले हायस्कूल, विद्या प्रसारक मंडळाचे दहिसर विद्या मंदीर.

मुलभुत व बाळबोध

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 18/05/2009 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
मला एक अतिशय मुलभुत व बाळबोध असा प्रश्ण विचारायचा आहे.. आज प्रत्येक राजकिय पक्ष असे म्हणत असतात कि आमचि फुले डॉ.बाबा साहेब आंबेडकर व शाहु महाराजांच्या विचारांशि बांधिलकी आहे..व आमचि त्या नुसार तशीच वाटचाल चालु आहे..मला व सा~यांना कुणी जाणकार समजावुन सांगु शकेला का..कि हे नेमके विचार काय आहेत..आजच्या काळातहि ते उपयुक्त आहेत का? व खरच राजकिय नेते त्या विचारा प्रमाणे वागतात का?

पराच्या राज्याची भेट

लेखक क्रान्ति यांनी सोमवार, 18/05/2009 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
शीर्षक वाचून चमकू नका! क्रांतिबै बालकविता आणि ती पण जनातलं मनातलंमध्ये लिहितेय, झालंय काय तिला? असा विचारही करू नका! ही वार्ता आहे माझ्या अगदी अचानक झालेल्या पराच्या [मिपावरील परिकथेतील राजकुमाराच्या]राज्याच्या धावत्या भेटीची! [प-यांच राज्य पराच्या राज्याच्या समोर आहे. म्हंजे सौन्दर्य संवर्धन/संगोपन केन्द्र, शुद्ध मराठीत ब्युटी पार्लर!] त्याचं असं झालं, लेकीची तब्येत ऐन परीक्षेच्या सुरुवातीला बिघडली. इकडे मायचा जीव खालीवर! शेवटी पुण्याला जाऊन प्रत्यक्ष लेकीला भेटून यायचं ठरवलं.

भारतीय रेल्वे आणि लालु यादव.

लेखक मुशाफिर यांनी सोमवार, 18/05/2009 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
आताच एका काथ्याकुटाच्या निमित्ताने लालु यादव आणि भारतीय रेल्वेविषयी चर्चा वाचनात आली. भारतीय रेल्वे फायद्यात आणल्यामुळे लालु यादवना बरीच प्रसिद्धी मिळाली असली, तरी बर्‍याच लोकांमध्ये रेल्वेने नक्कि कोणती धोरणं बदलली आणि कशी ? याविषयी अनभिज्ञता दिसली.

एकम् सत्

लेखक विकास यांनी सोमवार, 18/05/2009 19:54 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेत हा मौसम पदवीदान समारंभाचा आहे. मिडलस्कूल (सातवी), हायस्कूल (१२वी) पासून ते बॅचलर्स आणि इतर उच्चशिक्षणाच्या पदवीदान समारंभास येथे शाळा, विश्वविद्यालये, पालक, शिक्षक, आणि विद्यार्थी सर्वच महत्व देतात. त्या समारंभानंतर होणार्‍या पार्ट्या आणि त्या समारंभात मिळणारा एखाद्या माननीय पाहुण्याकडून मिळणारा उपदेश हा अतिशय मनापासून ऐकत, कधी कधी त्या पाहुण्याच्या राजकीय/सामाजीक विचारांमुळे धुडकावत, पण त्याला त्या त्यावेळेचे आणि त्या त्या स्थानामधे अनन्यसाधारण महत्व दिले जाते. तो पर्यंत झालेला सर्व त्रास हा मुले आणि पालक विसरून जातात...