Skip to main content

कैफियत ....

लेखक बट्ट्याबोळ यांनी बुधवार, 20/05/2009 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
मगील रंगपंचमीच्या काहीच दिवस आधी विलासअण्णा ने राष्ट्रवादीत स्वीच मारला होता. तेव्हा तो ही फॊर्मात होता आणि साहेबही. मध्यांतरीच्या काळात विलासरावपुरस्क्रुत नवनिर्माणकारांनी राज्यपातळीवर राडा करून स्वत:चा मतहिस्सा रखून ठेवला होता. कार्याध्यक्शांनी देखील शेतक-यांच्या काळजाला हात घालून आपली मुळे ग्रामीण भागात पसरली होती. क्रिकेट आणि क्रुषी हे दोन्ही सांभाळता साहेबांचं राज्यपातळीवर तस दुर्लक्शच झालं. परिणामी लोकसभा निवडणूकीत विलासअण्णाच्या पक्शाने नांगी टाकली. एव्हना विलासअण्णा च्या राष्ट्रवादी प्रवेशाने गल्ली-कोंग्रेसमधे तयार झालेली पोकळी सच्या कोल्हांडगे याने भरून काढली.

ऒळखीचे भेळवाले

लेखक सुबक ठेंगणी यांनी बुधवार, 20/05/2009 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईच्या कुठल्याही नाक्यावर असतो तसाच आमच्याही नाक्यावर एक भेळवाला होता. ब-याच लहानपणीपासून माझा त्याच्यावर (म्हणजे त्याच्या भेळेवर) डोळा होता. आपण चांगले मार्क मिळवावेत आणि मग आईने “जा, नाक्यावरच्या भेळवाल्याकडून भेळ घेऊन ये” असं म्हणावं असं माझं एक माफक स्वप्न होतं. पण आईपुढे आमची डाळ शिजत नसे. त्यामुळे इव्हसारखंच मलाही त्या भेळेच्या “forbidden fruit” चं कायम आकर्षण वाटत राहिलं. आणि मग एका कोजागिरीला भय्याची भेळ खायचा “दुग्धशर्करा” योग आला आणि मग पुन्हा पुन्हा आला, येतच राहिला. कोजागिरीच्या दिवशी लक्ष्मी “को जागर्ती” असं म्हणत जागत्या घरी जाते असं म्हणतात.

तांबडा रस्सा ( मालवणी पद्धत )

लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी बुधवार, 20/05/2009 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
१/२ कि. मटण किंवा चिकन ( तुकडे लहान असावे ) ५ कांदे , ३ टमाटो , ५ पाकळ्या लसूण , आलं , लिंबाचा रस . सु़खं खोबरं , लाल सुखी मिरची , धने , लवंग , दालचिनी , तमालपत्र , ओलं खोबरं , मीठ लाल तिखट , हळद , तेल इ. मटण स्वच्छ धुवून त्याला थोडं मीठ आणि लिंबाचा रस लावून १ तास ठेवावे. कढई मधे तेल गरम करून त्यात प्रथम सुखं खोबरं लालसर भाजून घ्यावे मग त्यात लाल सुखी मिरची घालावी, मिरची पण चांगली भाजल्यावर त्यात अख्खा गरम मसाला (धने , लवंग , दालचिनी , तमालपत्र) घालावे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अस्ताची सुरवात?

लेखक भोचक यांनी बुधवार, 20/05/2009 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
''राष्ट्रवादी कॉंग्रेस हा काही नव्याने स्थापन झालेला पक्ष नाही. ती वैयक्तिक बळावर निवडून येणार्‍या नेत्यांची मोळी आहे,'' ही व्याख्या राज ठाकरे यांनी केलीय म्हणून दुर्लक्षिता येणार नाही. कारण त्यात बर्‍याच अंशी सत्यही आहे. कारण पक्ष स्थापन करताना त्याची एक निश्चित भूमिका, विचारधारा आणि धोरण असायला लागते. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसला नाही आणि नव्हते. वास्तविक निवडणूक संपली असताना आणि सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू असताना, त्यातही राष्ट्रवादी कॉंग्रेस या सरकारमध्ये सामील होत असताना हा प्रश्न उपस्थित होण्याचे कारण काय? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो.

यातना

लेखक स्वप्नयोगी यांनी बुधवार, 20/05/2009 19:47 या दिवशी प्रकाशित केले.
ओठावर हळूच येणारे शब्द जेंव्हा माघारी वळतात खरं सांगतो तुला मी तेव्हा मनाला फार यातना होतात

लोक कम्युनिस्टांवर इतके चिडतात तरी का?

लेखक वेताळ यांनी बुधवार, 20/05/2009 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल मिपावर राजकारणाची चर्चा चालताना त्यातल्या त्यात कम्युनिस्टांवर चर्चा करताना लोक जहाल होतात . असे का घडते? कम्युनिस्टांवर सगळ्याना इतका राग का आहे तेच कळत नाही.खर तर कम्युनिझम हा तर सर्वसामान्य माणसांचे जीवन्मान सुधारण्यासाठी निर्माण झाला आहे . परंतु आज सर्वसामान्य लोकच त्याच्या कडे पाट फिरवत आहेत. हा विचार करण्याचे आज कारण म्हणजे नेपाळ ह्या आपल्या शेजारच्या देशातील अस्थिरता . नेपाळ हा खुप वर्षापासुन भारताचा खुप चांगला शेजारी व मित्रदेश आहे. परवा पर्यत त्या देशात राजेशाही होती.परंतु गेल्या काही वर्षात त्या राष्ट्राने लोकशाहीचा स्विकार केला आहे.

श्रीलंका सरकारचे अभिनंदन !!

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी बुधवार, 20/05/2009 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
लिट्टेचा सर्वेसर्वा प्रभाकरनला ठार करून श्रीलंकेच्या सैन्याने जो दैदिप्यमान विजय मिळविला आहे त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन! प्रभाकरनसारख्या क्रूरकर्म्याचा अंत करून महिन्द्र राजपक्षे व सनथ फोन्सेका यांनी संपूर्ण मानववंशावर थोर उपकार केले आहेत असेच मला वाटते. गेली तीस वर्षे हा देश लिट्टे आणि इतर फुटीर तमिळ अतिरेक्यांशी लढा देत आहे. इतका छोटा देश स्वतःच्या अस्तित्वासाठी, सिंहली अस्मितेसाठी झगडतो हे निश्चितच कौतूकास्पद आहे. ह्या युद्धात आत्तापर्यंत हजारो निरपराध नागरिक, सैनिक, पोलिस, राजकिय नेते आणि एक अध्यक्ष समर्पित झाले आहेत. भारतानेही अनेक सैनिक आणि राजीव गांधी गमाविले आहेत.

जुन्यात जूनं अलौकिक औषध.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 20/05/2009 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
अलिकडेच फार्मसूटीकल डिग्री घेऊन नोकरीला लागलेला माझा भाचा मला आपल्या नोकरीचा अनुभव सांगत होता. मी त्याला म्हणालो, "अनेक रोगावरची औषधं घ्यायला तुझ्या फार्मसीत लोक येत असतील.पण तुला विशेष वाटलेलं औषध कुठलं की ज्याने तुला कुतूहल वाटत असेल?" मला म्हणाला, "तुम्ही मला चांगला प्रश्न विचारला.इतर अनेक औषधं घ्यायला लोक येतात.पण जे लोक उदासिनता कमी होण्यासाठी-Anti-Depressant- औषधं घ्यायला येतात जसं Prozac किंवा Xanax सारखी औषधं घेऊन जातात त्यांच मला जास्त कुतूहल वाटतं. तुम्हाला माहितच आहे की आत्ताच मी एक नवीन जॉब घेतला.एका फार्मसीत मी कामाला लागलो.मला हा माझा जॉब आवडतो आणि मी नियमीत जॉबवर जातो.