श्रीलंका सरकारचे अभिनंदन !!
लिट्टेचा सर्वेसर्वा प्रभाकरनला ठार करून श्रीलंकेच्या सैन्याने जो दैदिप्यमान विजय मिळविला आहे त्याबद्दल त्यांचे हार्दिक
अभिनंदन! प्रभाकरनसारख्या क्रूरकर्म्याचा अंत करून महिन्द्र राजपक्षे व सनथ फोन्सेका यांनी संपूर्ण मानववंशावर थोर
उपकार केले आहेत असेच मला वाटते.
गेली तीस वर्षे हा देश लिट्टे आणि इतर फुटीर तमिळ अतिरेक्यांशी लढा देत आहे. इतका छोटा देश स्वतःच्या अस्तित्वासाठी, सिंहली
अस्मितेसाठी झगडतो हे निश्चितच कौतूकास्पद आहे. ह्या युद्धात आत्तापर्यंत हजारो निरपराध नागरिक, सैनिक, पोलिस, राजकिय नेते
आणि एक अध्यक्ष समर्पित झाले आहेत. भारतानेही अनेक सैनिक आणि राजीव गांधी गमाविले आहेत. भारतासारखा बलाढ्य देश अजून
गडचिरोली जिल्ह्यातला नक्षलवाद संपवू शकत नाही अन भारतातल्या एका जिल्ह्याएव्हढा श्रीलंका देश लिट्टेसारख्या अतिबलाढ्य शत्र्रूवर
निर्णायक मात करतो ही गोष्ट खरेच विचार करण्यासारखी आहे.
ज्या लिट्टेने राजीव गांधींची निर्घृण हत्त्या केली त्या प्रभाकरनचा कळवळा असणार्या करूणानिधींचे समर्थन घेतांना सोनिया गांधींना
शरम कशी वाटली नाही हा एक वेगळाच मुद्दा आहे. ह्या तमिळ नेत्यांची राजधानी दिल्लीतही एव्हढी दहशत जाणविते की श्रीलंका सरकारचे
कुणी मनमोकळेपणाने अभिनंदनही करत नाही !
मी तर पुढे जाऊन म्हणेन की भारत सरकारने राजपक्षेंनाच निमंत्रण द्यावे आणि दहशतवादाचा कठोर नि:पात कसा करायचा हे त्यांच्या
कडून शिकावे! इतका आंतरराष्ट्र्रीय दबाव असतांनाही त्यांनी ज्याप्रकारे श्रीलंकन सेनेत आणि नागरिकांमध्ये प्रखर राष्ट्रप्रेम चेतविले त्याला तोड नाही !!
वाचन
9333
वाचनखूण
प्रतिक्रिया
44
ख्ररंय!
मी तर पुढे
श्रीलंका सरकारचे अभिनंदन
+१
भारतानेच
In reply to भारतानेच by माया
सहमत
In reply to भारतानेच by माया
सहमत
In reply to भारतानेच by माया
मान्य
In reply to मान्य by क्लिंटन
सुंदर प्रतिसाद!
In reply to सुंदर प्रतिसाद! by राघव
आस
In reply to आस by यन्ना _रास्कला
नॉर्वेतील श्रीलंकन तमीळ
In reply to मान्य by क्लिंटन
सहमत!
In reply to सहमत! by मैत्र
बरोबर! हेच म्हणायचे आहे.
In reply to सहमत! by मैत्र
सहमत
In reply to मान्य by क्लिंटन
सुटकेचा श्वास?
In reply to मान्य by क्लिंटन
एक सुधारणा...
In reply to एक सुधारणा... by बिपिन कार्यकर्ते
त्यातला
In reply to त्यातला by भडकमकर मास्तर
मुरली
In reply to एक सुधारणा... by बिपिन कार्यकर्ते
धन्यवाद
In reply to एक सुधारणा... by बिपिन कार्यकर्ते
तसेच
In reply to तसेच by विकास
शक्य आहे..
In reply to भारतानेच by माया
श्रीलंका
युद्धस्य कथा रम्या!
- जगातील इतर सशस्त्र "स्वातंत्र्य लढे" आणि तमिळ वाघांतील साम्य
जगात प्रस्थापित/अधिकृत सरकारांकडून अल्पसंख्यांक गटाची तथाकथित (किंवा वास्तव) गळचेपीविरुद्ध अनेक चळवळी सुरुवातीपासून(म्हणजे अगदी ग्रीक राज्यकर्त्यांपासून) आहेत.
सध्याच्या म्हणजे गेल्या ५० वर्षांत प्रकर्षाने जगापुढे राहिलेले काही गट म्हणजे अफगाणीस्तानात अहमद शाह मसूदचे नॉर्दन अलायन्स, चेचेन्यातील शामिक बेसेव्हच्या नेतृत्वाखाली लढणारे आणि प्रभाकरनचे तमिळ वाघ.
हीच तीन उदाहरणे घ्यायचे कारण म्हणजे ह्या चळवळी ज्या प्रकारे चालविल्या गेल्या त्यांतील साम्यस्थळे विचार करण्याजोगी आहेत.
- शस्त्रात्रे: तीनही चळवळी सशस्त्र होत्या/आहेत. तीनही चळवळी त्यांच्या यशस्वीततेच्या शिखरावर असताना हजारो तरूण/तरूणींचे सशस्त्र गट बाळगून होत्या. ह्या चळवळींनी शस्त्रांच्या बळावर मानवी हक्कांची मनसोक्त पायमल्ली केली. सामान्य जनतेत (आणि बहुत करून ज्या जनतेसाठी ते लढा देत होते त्याच जनतेत) जबर दहशत पसरविली होती. उदा. तमिळ वाघ अनेकवेळा शरण आलेले शेकडो सरकारी पोलीस/खबरे ह्यांची निर्दय पणे हत्या करत. चेचेन बंडखोर बलात्कार, लूटमार इ.चा शस्त्र म्हणून वापर करित. त्यामुळे क्रौर्य हा ह्या चळवळींचा अविभाज्य भाग होता असे म्हटले तर गैर ठरणार नाही
- सबळ नेतृत्वः तीनही चळवळींना कणखर आणि अतिशय कावेबाज,संधीसाधु नेतृत्व लाभले होते. ह्या नेत्यांनी बराच काळ त्या-त्या देशातील (बलाढ्य असणार्या)लष्करांना निष्क्रिय,हतबल करून ठेवले होते. "तह,शांतता प्रस्तावांचे कागदी घोडे नाचवत" वेळकाढूपणा करत मोर्चेबांधणी कशी करावी इ. युद्धकला ह्या नेत्यांना चांगल्याच अवगत होत्या.
चळवळीच्या सर्व सामान्य कार्यकर्त्याच्या/सैनिकाच्या मते हे नेते देवाच्या जागी होते. नेतृत्वाप्रती प्रखर निष्ठाच अपेक्षित होती. किंचितही विरोधी सुर काढणार्या गटाला समुळ आणि निर्घृणपणे नष्ट केले जायचे.
- चळवळीला लागणारा पैसा: अफू/शस्त्रास्त्रे/हवाला ह्यांचे अनेक देशांत पसरलेले बेकायदेशीर व्यापाराचे जाळे होते. उदाहरणार्थ तमिळ वाघांचे ५४ देशांत शस्त्रात्र व्यापाराचे जाळे होते. शिवाय परदेशात राहणारे चळवळींप्रती सहानभुती असणारे श्रीमंत दाते हा ही मोठा स्त्रोत होता.
- प्रचार आणि प्रसारःआंतरजाल, दूरचित्रवाहिन्या, वर्तमानपत्रे ह्यांच्या मदतीने चळवळीच्या हेतूचा आणि विरोधी सरकाराविरोधी धोरणांचा प्रसार/प्रचार अगदी सराईत पणे केला गेला.
- ह्या "स्वातंत्र्य" लढ्यांचा अस्त
बंडखोरीपुढे हात टेकलेले सरकार स्वबळावर(फक्त) ह्या चळवळींना कधीच नेस्तनाबूत करू शकले नाही. दुसरे म्हणजे राजकीय तोडग्यापेक्षा बंदूकच ह्या चळवळींना अधिक श्रेयस्कर वाटत आली आहे. त्यामुळे सरकारनेसुद्धा चळवळीतील अंतर्गत विरोधकांना (आर्थिक मदत/राजकीय पक्षात स्थान इ.) प्रोत्साहन देऊन फूट पाडली. ह्या फुटीत मग लष्करी बळाची पाचर ठोकून ती वाढविली आणि चळवळींची शकले उडविली. मात्र समूळ उखाडून टाकण्यासाठी नेत्याचा/बंडखोराची "नेत्रदीपक" पद्धतीने - आंतर्राष्ट्रीय मिडीयाच्या साक्षीने हत्या केली..
पण शेवटी ज्या सामान्य माणसाच्या तथाकथित हक्कांसाठी हे लोक लढले ते मात्र मधल्यामधे भरडलेच गेले. त्यामुळे चळवळीचा मूळ हेतू कितपत साध्य झाला हे शंकास्पद आहे. ---- कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाहीIn reply to युद्धस्य कथा रम्या! by विंजिनेर
धक्कादायक शस्त्रास्त्रे
In reply to धक्कादायक शस्त्रास्त्रे by मैत्र
हे एक आश्चर्यच आहे
In reply to हे एक आश्चर्यच आहे by क्लिंटन
एक उदाहरण
In reply to एक उदाहरण by मराठी_माणूस
बदल करत आहे
चांगला लेख
राजपक्षेंची तयारी
प्रभाकरन मेला?
In reply to प्रभाकरन मेला? by संजय अभ्यंकर
हे घ्या.
In reply to हे घ्या. by ३_१४ विक्षिप्त अदिती
कपाळावर टिच्चून गोळी घातलेली दिसतेय...
In reply to हे घ्या. by ३_१४ विक्षिप्त अदिती
हे पण बघा..;)
In reply to हे पण बघा..;) by अभिज्ञ
काय कळत
In reply to काय कळत by ३_१४ विक्षिप्त अदिती
उयीरुतन उल्लार!
In reply to हे पण बघा..;) by अभिज्ञ
फोटोशॉप
In reply to प्रभाकरन मेला? by संजय अभ्यंकर
बंधूंनो,
In reply to बंधूंनो, by भडकमकर मास्तर
डोक्यात गोळी लागलेल्या प्रभाकरनचे छायाचित्र , व्हिडिओ सर्व .....
चांगला लेख!!!
आजच्या ईसकाळमध्ये
हम्म. सरकार
In reply to हम्म. सरकार by नितिन थत्ते
श्रीलंकेचे
थांबा
सर्वच विचार उत्तम..