Skip to main content

समयाकडून मिळणारा दिव्य दिलासा.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 15/06/2009 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
वनिता शर्मा माझ्या मुलीची शाळकरी मैत्रीण.कॉलेज संपून नंतर लग्न झाल्यावर ह्या मैत्रीणी आपआपल्या निर्माण केलेल्या जगात संसार करायला निघून गेल्या.पण पृथ्वी गोल आहे आणि जग लहान होत चालंय.परवां तिच्या ह्या मैत्रीणीचा फोन आला.घरी मी एकटाच होतो.माझ्या मुलीची तिने चौकशी केली. कुणीतरी तिला पत्ता आणि फोन नंबर दिला होता.

सहजिवनात आली ही .....

लेखक टारझन यांनी सोमवार, 15/06/2009 02:42 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स , गोष्ट आहे साधारण नऊ दहा वर्षांपुर्वीची .... दहावीत असेल .. नुकतंच मिसरूड फुटू लागलं होतं ... आणि सारख "कुछ कुछ होता है" असं वाटत होतं .. नक्की काय होतंय का होतंय हे कळायची अक्कल नव्हती .. आणि जरी बडबड्या स्वभाव असला तरी काही गोष्टी कोणाबरोबर बोलण्याची सोय नव्हती .. ते केवळ शारिरीक आकर्षण नव्हतं एवढं खरं .. त्याच्या कितीतरी पुढचं होतं ते .. मन कोणाच्या तरी शोधात होतं .. कोण ? स्वप्नसुंदरी ? त्यावेळी एक मराठी सिनेमा पाहिलेला .. नाव नाही आठवत .. त्यात एक अत्तिशय सुंदर गाणं होतं ..

तुळशीबाग - एक अनुभव

लेखक मराठमोळा यांनी रविवार, 14/06/2009 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख एक पुरुष का लिहितोय असा प्रश्न कदाचित तुम्हाला पड्ला असेल, सांगतो. गेल्या आठवड्यात पण तेच झालं. पुण्याबाहेरचे कुणी पाहुणे घरी आले कि त्यांना पुणेदर्शन करायचे असते. त्यात जर महिलामंडळ असेल तर मग विचारायलाच नको. तुळशीबाग म्हणजे तर अविभाज्य भाग. आणी आमचा रोल ठरलेला - "ड्रायवर".

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग ४

लेखक प्रसन्न केसकर यांनी रविवार, 14/06/2009 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.

उजाड!!

लेखक नीधप यांनी रविवार, 14/06/2009 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
विस्थापन झालेल्या गावातले चित्र आहे. लोक घरे सोडून, छतं मोडून गेले आहेत. संपूर्ण गावभर हे असेच अवशेष आहेत शिल्लक. त्या गावातून जात असताना सगळ्या गावाचं भूत झालंय असं वाटत होतं. कुणाच्या अंगणात पेरूला बारके पेरू लागले होते. कुणी अंगणाच्या पेळूवर स्लिपर्स विसरले होते. कुठे शेवटची चूल पेटवून पुजा केल्याच्या खुणा होत्या. कुणी छताच्या नळ्यांसकट घर तसेच टाकून गेले होते. विस्थापन होऊन जेमतेम दोनेक महिनेच झाले असावेत असं सांगणार्‍या अनेक खुणा होत्या. भयंकर भयंकर वाटत होतं..

एफ. एम.

लेखक विनायक पाचलग यांनी रविवार, 14/06/2009 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्याकडे एक जुना रेडिओ आहे .झाली असतील त्याला घेवुन एक २६ - २७ वर्षे .आजही चांगला चालतो बापडा !.पण काय करणार, दोन वर्षापुर्वी आमच्या कोल्हापुरात २ खाजगी रेडिओ वाहिन्या(शुद्ध मराठीत चॅनेल) आल्या आणि हा बिचारा रेडिओ काहीही झाले तरी ती चॅनेल आपल्यावर लागु देईना ,मग काय तो गेला माळ्यावर!! आणि तेथे नवीन एक झकास रेडिओ आला. अहो काय भाग्य होत कोल्हापुरचं....इथे एकाच दिवशी दोन रेडीओ चॅनेल आली आणि तीही वेगवेगळ्या समुहांची आणि महत्वाचे म्हणजे दोन्ही प्रींट मीडीयातले. पुर्वी पुण्याला येणे म्हणजे मजा वाटायची.

सट्टाबाजार

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 14/06/2009 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
`साहेब, हा कॉम्प्युटर सट्टा बंद करून टाकला पाहिजे... महागाई बरोबर कमी होते की नाही बघा...' निवडणुकीवरून महागाईवर आलेल्या विषयावर बोलताना तो ताडकन म्हणाला आणि माझे डोळे विस्फारले. `कॉम्प्युटर सट्टा?' मला कळलं नव्हतं. मी तोच प्रश्‍न त्याला केला आणि माझ्याकडे न पाहता तो बोलू लागला. `ते पैसेवाले लोक धान्य, धातूंच्या भावावर सट्टा खेळतात. गरिबांना लुटून नफा कमावतात. खिशातला पैसाही इकडचा तिकडे न करता त्यांना लाखो रुपयांचा नफा होतो आणि आमच्यासारख्या हातावरचं पोट असलेल्या लोकांचा जीव जातो.