Skip to main content

त्रस्त काका शांत व्हा!

लेखक सहज यांनी सोमवार, 20/07/2009 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी शीर्षक वाचून चक्रावलात ना? मीही असाच चक्रावलोय. मिपाचेच एक जेष्ठ सभासद आपल्या संस्थळावर येऊन कोणती तक्रार करुन गेलेत ते पाहा. त्यासोबत मी त्यांना दिलेले उत्तरही पाहा. त्याचा पुरावा खाली वाचा...... ____________________________________________________ प्रमोद देव म्हणाले ... ...हा कोण त्रस्त समंध आहे? ह्याचे नेमके दुखणे काय आहे?... "बाबा रे, तुला असा प्रतिसाद का द्यावासा वाटला? जरा सविस्तरपणे सांगशील काय?" July १९, 2009 ११.२३(भारतीय प्रमाणवेळ) आम्ही म्हणजे देवकाकांच्या चमच्यांनी विचार केला जाउ दे काय बोलायचे.

"लहाने"पण देगा देवा !

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 20/07/2009 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
"लहाने"पण देगा देवा ! रविवार दिनांक १९ जुलै २००९, स्थळ सहयोग मंदीर , ठाणे (पश्चिम) आणि व्यास पौर्णिमेनिमित्त : व्यास क्रिएशन्स चा व्यास स्नेह महोत्सव. सूर सप्तकांचे-हा श्री.संदीप वैद्य संकल्पित मराठी गाण्यांचा कार्यक्रम आणि श्री मधुकर मंडलेकर यांनी मराठीमधे अनुवाद केलेले (रोझेलीन पर्लमन यांचे मूळ इंग्रजी पुस्तक : द ब्लाईंड डॉ.जेकब बोलेटीन - ऑटोबायोग्राफी ) "मात अंधारावर" या पुस्तकाचे प्रकाशन हे निमित्त. कार्यक्रमाची सुरुवात गणपती स्तवनाने झाली, आणि कार्यक्रम फुलत गेला.साधारण ५ गाणी झाली आणि सभागृहात "त्यां"चे आगमन झाले - ज्यांच्या हस्ते "मात अंधारावर" या पुस्तकाचे प्रकाशन हो

स्ट्रीट लाईट्स ....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 20/07/2009 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
काल काही कामानिमित्त वाशीला गेलो होतो. परत येताना साहजिकच पाम बिच रोड पकडला. संध्याकाळचे सहा वाजुन गेले होते. अंधार पडायला सुरूवात झाली होती. मध्येच पावसाने गाठले म्हणुन एका ठिकाणी थांबलो. पाम बिच रोडवर एका ठिकाणी डाव्या बाजुला एक छोटेसे तळे आहे. बहुदा खाडीचाच भाग आहे तो, तिथे थांबलो. अंधार आणि पाऊस यांच्या शिवणापाणीत रोडवरच्या लाईट्स एवढ्या छान वाटत होत्या की पुछो मत ! आणि पार्श्वभुमीवरचे मेघभारले आकाश ! मोह आवरला नाही.

उंबरठा..

लेखक प्राजु यांनी सोमवार, 20/07/2009 06:30 या दिवशी प्रकाशित केले.
अर्थ नेमका संसाराचा कधी कुणास कळला आहे उंबरठ्यावरी तडजोडीच्या जीव सतत हा जळला आहे कुणी जपावे? का जपावे? अन कोणाचे मोठेपण? किती पुरावे? किती उरावे? आकांक्षांचे आत्मसमर्पण.. अहंकार तव फ़ोल पणाचा सर्व समक्ष मी लपवावा घेऊन सार्‍या चुका मजवरी दुभंगलेला जीव जपावा हसरा चेहरा जनांत राही मनांत सार्‍या गर्द छटा शांत जळाच्या अंतरी असती गढूळलेल्या वादळी लाटा नाव तुझे नि गाव तुझे ओळख माझी विरून गेली कर्तव्याच्या मढ्याखाली स्वप्ने सारी पुरून गेली.. - प्राजु
काव्यरस

फोटो कसे पाठवायचे

लेखक अबोल यांनी रविवार, 19/07/2009 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
मला अनेक फोटो मेल करायचे आहेत तरी क्रुपया त्याची पध्दत सा॑गावी.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे

लेखक नितिन थत्ते यांनी रविवार, 19/07/2009 22:40 या दिवशी प्रकाशित केले.
२००४ पासून भारतात संपूर्ण इले़क्ट्रॉनिक यंत्रांनी मतदानाची सुरुवात झाली आहे. झटपट निकाल ही त्यांची जमेची बाजू राहिली आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या विश्वासार्हतेविषयी चर्चा सुरू झाली आहे. इलेक्ट्रॉनिक यंत्रांचे प्रोग्रॅमिंग हव्या त्या पक्षाला जास्त मते मिळतील अशा रीतीने करता येते असे सांगितले जात आहे. ते तसे करता येईल याबाबत काही शंका असूच शकत नाही. पण ते तसे खरेच केले गेले आहे का?

वाटली डाळ

लेखक स्वाती दिनेश यांनी रविवार, 19/07/2009 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- २ वाट्या हरबरा डाळ, ४,५ हिरव्या मिरच्या, १ मध्यम कांदा, १ मध्यम टोमॅटो,चवीनुसार मीठ,१ चहाचा चमचा साखर, तेल, फोडणीचे साहित्य, ओले खोबरे, कोथिंबिर, लिंबू कृती- डाळ ५/६ तास भिजत घालावी ,नंतर उपसून चाळणीवर घालून स्वच्छ धुवून घ्यावी व भरड वाटावी, वाटतानाच त्यात मिरच्या घालाव्यात. कांदा व टोमॅटो चौकोनी चिरावेत. साधारण पळीभर तेलात फोडणी करावी त्यात कांदा व टोमॅटो घालून एक/दोन वाफा आणाव्या,(पोह्यांकरता कांदा घालतो तसे.) नंतर त्यात भरड वाटलेली डाळ घालावी व नीट मिक्स करुन झाकावे व एक वाफ येऊ द्यावी. नंतर त्यात मीठ व साखर घालून ढवळावे व परत झाकण ठेवून चांगली वाफ आणावी.

मी देशासाठी काय करतो ?

लेखक दशानन यांनी रविवार, 19/07/2009 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
** मी देशासाठी काय करतो ? खरं पाहता काहीच करत नाही. पण जे करतो ते सामान्य नागरिक म्हणून मला दुस-या देशातील नागरिकासमोर छाती फुगवून सागायला मदत होते की हा, मी भारतीय आहे. सर्वसामान्य जे करतात तेच करतो मी पण सर्व टॅक्स भरतो, नियमीत लाईट बील / पाणी बील भरतो, फोन बिल भरतो, सरकारी / गैरसरकारी संस्थाच्या कार्यक्रमाना मदत करतो जे काही करता येईल ते करतो पण एका माझ्या गोलाकार वर्तुळामध्ये राहून, माझ्या वर्तुळाचा केंद्र बिंदू हा मी व माझे कुटुंब आहे.. त्यानंतर सर्व काही.. येस मी स्वार्थी आहे, स्वतःचाच फायदा बघतो, का बघू नये ?