Skip to main content

प्रतिसादक उत्क्रांत होतो का?

लेखक प्रभो यांनी मंगळवार, 27/10/2009 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर यापुर्वी सिद्धहस्त लेखकांविषयी चर्चा झालेली आहे. मिपावर यापुर्वी सिद्धहस्त टवाळकांविषयी चर्चा झालेली आहे. पण मिपावर यापुर्वी सिद्धहस्त प्रतिसादकांविषयी चर्चा झालेली नाही. या प्रतिसादकांपैकी काही जण आजकाल फारसे प्रतिसाद लिहित नाहीत तर काहीजण अजिबातच प्रतिसाद लिहितांना दिसत नाही. गेल्या काही महिन्यांत ज्यांचे प्रतिसाद आवडले त्या प्रतिसादकांसंदर्भात हा चर्चाविषय आहे.

लेखक उत्क्रांत होतो का?

लेखक अक्षय पुर्णपात्रे यांनी मंगळवार, 27/10/2009 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर यापुर्वी सिद्धहस्त लेखकांविषयी चर्चा झालेली आहे. या लेखकांपैकी काही जण आजकाल फारसे लिहित नाहीत तर काहीजण अजिबातच लिहितांना दिसत नाही. गेल्या काही महिन्यांत ज्यांचे लेखन आवडले त्या लेखकांसंदर्भात हा चर्चाविषय आहे. सध्या लिहीते असलेले तीन लेखक रामदास, श्रावण मोडक आणि संजोप राव हे या मिपावर लक्षवेधी आणि वाचनीय ललितलेखन करतांना आढळतात. तीन्हींची शैली, हाताळलेले विषय निराळे आहेत. नुकतीच राव यांनी 'माझे खाद्य-पेय जीवन' ही लेखमाला सुरू केलेली आहे. रामदासांचा धातुकोष आणि मोडकांच्या श्रावणनोंदी लेखमाला प्रसिद्धच आहेत तसेच अपुर्णही.

प्रवासवर्णन - पहिलाच प्रयत्न

लेखक मस्तानी यांनी मंगळवार, 27/10/2009 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी ! शाळेत असताना लिहावे लागलेले निबंध यापलीकडे लिखाण न केलेली मी ... पण गेले काही दिवस नियमितपणे मिपावर बागडत असते, त्यामुळे "मी सुद्धा लिहू शकेन" असा काहीसा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. तो वापरूनच आज हे धाडस करीत आहे. बघू कसं काय आणि कितपत जमतंय ते ! आम्ही सध्या आहोत अमेरिकेतल्या मिशिगन राज्यात. एकाच हिमवादळात चांगला फुट- २ फुट बर्फ आणणारा हिवाळा आणि कायम शून्याखाली तापमान अशी थंडी चालू होण्याआधी अधाशासारखे फिरून घेणारे लोक आहेत इथे ... २/३ हिवाळे पाहील्याने आम्हीही "आधीच" एखाद्या ठिकाणी जाऊ असा विचार केला. बरं, एक ठिकाण ऐकून माहित होत. Pictured Rocks National Lakeshore.

अचानक....

लेखक नेहमी आनंदी यांनी मंगळवार, 27/10/2009 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
अ्चानकच तूला अस समोर बघितलं आणि काय झालं न कळे शुष्क असलेल्या जिवनात एक कोम्बं अंकुरलं..... निगा राखावी तर कशी कळेना पाऊस प्रेमाचा कधी पडेना रान वाळवंट झाले.... ग्रिष्माचे रण माजले.... मग केले हद्दपार पावसाला या जिवनातून तुझ्यासकट...... आणि पुन्हा अचानक.... हो अचानकच..... तू समोर आलास.. ठरवलं होत थेंब हे पडु द्यायचे नाहित तरी उगाच पाणी तरळले झिरपु नकोस म्हंटल तरी हा पाऊस कोसळलाच प्रसन्ना जीके
काव्यरस

मिपाचे वैभव...

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 27/10/2009 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकरहो, हे मिपाचे वैभव! हे केवळ अन् केवळ तुम्हा सर्व मिपाकरांमुळेच शक्य आहे. मी सर्वांचा ऋणी आहे.. आपला, (कृतार्थ आणि कृतज्ञ) तात्या अभ्यंकर.

ढेकर...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 27/10/2009 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
वार - प्रतिवार... शह - काटशह..., अरे ला कारे.... नुसतेच सारे..., शब्दांचे पसारे....! नखं गळालेला जर्जर वनराज, त्याच नखांनी परस्परांशी..., झुंझताहेत छावे...! सामर्थ्य, सत्ता ... अनुत्तरित...? प्रश्न अस्मितेचा (?) विखुरलेले सारे कळप मेंढरांचे! बलाबलावरुन भांडताहेत ... अनियंत्रित...,मेंढपाळ भरकटलेले! त्यांचे राजकारण, फरफट कुणाची? कुणीही यावे टिकली मारुन जावे नियती आमची कधी बदलणार? संतप्त, विव्हल ... गांधारीचे शाप ... आम्हालाही कायम भोवणार...! आमच्याच भांडणात... सत्तापिपासु लांडगे... नेहमीच ...,मेजवान्या झोडणार! आम्ही तसेच उपाशी.... ते मात्र सुखाचा ढेकर देणार ! विशाल

आनंदी आनंद गडे

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 27/10/2009 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
बाबा, तुझे आनंदाचे सर्वोकृष्ट क्षण कुठले? चिरंजिवानी विचारले. हा प्रश्न कट्टा झाल्यावर त्याने विचारला होता म्हणुन लगेच उत्तर दिले नाही. कधी पटात घुसेल त्याचा नेम नाही. कट्ट्याला तात्या,सर्वसाक्षी,जोशीबुवा आणि रामदास होते. खाना खजाना साठी सौ .दिमतीला होती. कट्टा होत असताना चिरंजिव कट्ट्याला पाठ करुन गुगलत बसले होते. तु सांग बघु? मी प्रतिप्रश्न केला. तेवढाच विचार करायला वेळ. तुम्ही सर्वजण सगळेजण बागडत होतात बाबा. अगदी कॉलेज कुमारांसारखे. मला मजा आली. तुम्ही तर सर्व नॉटी मोड मधे होता..

अरे, झाला पराभव शिवसेनेचा त्यात काय?

लेखक वि_जय यांनी मंगळवार, 27/10/2009 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
अरे, झाला पराभव शिवसेनेचा त्यात काय? निवडणुकीच्या आखाड्यात कमी जागा मिळुन सत्तेची संधी हुकली असेल. याचा अर्थ सेना संपली म्हणून अर्ध्या हळकूंडाने पिवळे होऊन अगदी राजकीय निरिक्षकांपासून, पत्रकारांपर्यंत अनेक पत्रपंडीतांचा सद्या बाजारात सुळसुळाट झाला आहे. असो. रा॑जकारणच ते... निवडणूक म्हटल्यावर हार-जीत आहेच. आणि पराभव शिवसेनेला काही नविन नाही. असे अनेक पराभव आणी संकट झेलून, तावून सुलाखूनच शिवसैनिकांनी सेना वाढवली आहे. पुर्वी अस म्हणत की मराठे युध्दात जिंकतात आणी तहात हरतात.. तशीच काहीशी स्थिती आहे शिवसैनिकांची ... रणांगणात जिंकतात पण निवडणूकीत हरतात...

सुरुवात

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 27/10/2009 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
मराठवाड्यातील माळाकोळी या गावातील महिलांनी एकत्र येवुन, आंदोलन करुन गावात यशस्वीरित्या दारुबंदी करवुन आणली. त्या रणरागिण्यांना मानाचा मुजरा करुन त्या घटनेवर आधारीत ही कथा लिहीली आहे. मुळ दुवा : लोकप्रभा / स्त्रीशक्ती विशाल कुलकर्णी ******************************************************************* एक पत्रकार या दृष्टीकोनातून पाहिले तर ही संपूर्ण घटना म्हणजे सॉलीड मालमसाला असलेली जबरदस्त बातमीच होती माझ्यासाठी!