Skip to main content

(कळेना मला)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी सोमवार, 16/08/2021 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा संदीपभाउंची ही कविता http://misalpav.com/node/49141

(कळेना मला)

डोळ्या समोर तारे कसे चमकतात हे तुमच्या तासाला पहिल्यांदा बसल्यावर... ...मला कळालं! जीभ कशी अडखळते हे तुम्ही पहिल्यांदा प्रश्र्न विचारल्यावर... ...मला कळालं! हृदय कसे धडधडते हे तुमच्या समोर पहिल्यांदा हात पुढे करताना... ...मला कळालं! आता पुन्हा पुन्हा मार खायचा आहे हे माहीत असूनही घरी जाताना, दरवेळी गालावर उठलेली तुमची बोटं कशी लपवावी हे मात्र मला अजूनही कळालेलं नाही! पैजारबुवा

कळेना मला

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 16/08/2021 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
मनात मोर कसे नाचतात हे तुला पहिल्यांदा पाहिल्यावर... ...मला कळालं! जीभ कशी अडखळते हे तुझ्याशी पहिल्यांदा बोलताना... ...मला कळालं! हृदय कसे धडधडते हे तुझा हात पहिल्यांदा हातात घेताना... ...मला कळालं! पुन्हा भेटायचयं हे माहीत असूनही तुझा निरोप घेताना, दरवेळी डोळ्यातलं पाणी कस अडवावं हे मात्र मला अजूनही कळालेलं नाही! - संदीप चांदणे
काव्यरस

वर्तन विपर्यास

लेखक चंद्रकांत यांनी रविवार, 15/08/2021 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
विज्ञान-तंत्रज्ञानाने मंडित जगाने वर्तमानकाळी अनेक प्रश्न माणसासमोर उभे केले आहेत. अर्थात, तुम्ही म्हणाल या विधानात नावीन्य ते काय? प्रश्न माणसांसोबत कधी नव्हते? अगदी खरंय, ते आहेतच आणि असतीलही. समजा, तसे ते नसते तर प्रगतीच्या परिभाषा ना त्याने शोधल्या असत्या, ना परिमाणे वापरून परिणाम तपासले असते. एक मात्र खरंय की, काळाच्या ओघात अन् आयुष्याच्या प्रवासात पुढ्यात पडलेल्या प्रश्नांच्या व्याख्या बदलत असतात. कुणी म्हणेल की, बदल नावाचा प्रकार न बदलणारं वास्तव आहे. बदल हीच एक गोष्ट अशी असावी की, जी बदलता नाही येत कुणाला. बदलांना वेग असतो. चेहरा नसतो. तो द्यावा लागतो. मग तो माणूस असो की, अन्य कुणी.

तुटक तुटक..

लेखक पाटिल यांनी रविवार, 15/08/2021 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
१. रस्त्यावर वाढलेलं कुत्रं चुटकी वाजवून बोलावलं की लगेच शेपूट हलवत पायाशी येतं.. झोंबाळतं.. त्याच्या उचंबळून येण्याचा प्रवाह चहुदिशांना मुक्त असतो.. पण पाळलेल्या कुत्र्यांच्या प्रेमाचा ओघ त्यांच्या मालकांपुरताच वाहतो.. २. आकाशाने भुरकट ढग धरून ठेवले आहेत.. समोर स्तब्ध पाण्याच्या पृष्ठभाग.. तलम पापुद्र्यासारखा.. थरथरतोय अधूनमधून.. बहुतेक वाऱ्याच्या झुळकीचा हलका स्पर्श होतोय तिथे.. झाडाला विचारलं की हे खरंय का? तर त्यानंही होकारार्थी फांदी डोलावली... ३.

सरगोंड्यांची झिंग

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 15/08/2021 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे विरगावला पद्मनाभ स्वामींची समाधी आहे. ह्या समाधीकडे जाण्याचा रस्ता अतिशय छान उतारवळणाचा आहे. दर वर्षी आषाढी आमावस्येला वा दीपअमावस्येला (जिला आपल्या भागात गटार अमावशा म्हणतात) तिथं यात्रा भरते. म्हणजे मी लहान होतो तेव्हा भरत असे. यात्रेच्या दिवशी तिथं लळितही साजरं होत असे. ‘लळित’ म्हणजे एक प्रकारचं नाटक असतं. भारूड सादर करायची कला म्हणजे ‘लळित’. आता ते होणं बंद झालं. त्यात भाग घेणारे कलावंतही एकेक करत वारले. दीपअमावस्येच्या आठ दिवस आधीपासून समाधीत भागवत बसायचा.

मिस्ड कॉल

लेखक भागो यांनी रविवार, 15/08/2021 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
मिस्ड कॉल विनू आणि गोट्या शेताच्या बाजूला असलेल्या चिंचेच्या झाडाच्या चिंचा पाडत होते. “ए पोरांनो कुठला गाव आहे हा?” दोन मध्यम उंचीच्या मध्यम वयाच्या बाप्यांनी प्रश्न केला. “गावात नवीन दिसताय जणू, नाव नाय माहित? मग इथपोत्तर आलात कसे?” विनू आश्चर्यचकित झाला. “मी आहे अल्फा१ आणि हा माझा मित्र झेटा२६. आम्हाला तहान लागली आहे. प्यायला पाणी मिळेल का?” स्वतःला अल्फ़१ म्हणणारा विचारत होता. आता गोट्या पुढे सरसावला. “अल्फा पाव्हणं, हे आहे पाळदे बुद्रुक! तुम्हाला दुसरा बाजीराव माहिती आहे का? नाही माहीत? सोडून द्या. तुम्ही असं करा समोर मळयात विहिरीवर मोट चालू आहे. तिथे पाणी प्या.

६० वर्षांपूर्वी...

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 14/08/2021 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
बर्लिनच्या भिंतीने शीतयुद्धाच्या काळात आंतरराष्ट्रीय राजकारणावर मोठा प्रभाव टाकला होता. लोकशाही, भांडवलशाही व्यवस्थेमुळे ‘पश्चिम जर्मनी’ आणि ‘पश्चिम बर्लिन’मध्ये वेगाने आर्थिक विकास होत गेला. पश्चिमकडील लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्यही होते. या बाबी साम्यवादी ‘पूर्व जर्मनी’ आणि ‘पूर्व बर्लिन’मधील नागरिकांच्या नजरेत येऊ लागल्या. आपल्याही परिस्थितीत लवकरात लवकर सुधारणा होण्याची इच्छा सामान्य जर्मन नागरिकाला होती. त्यामुळं पूर्वेकडून पश्चिमेकडे होणारे पलायन पूर्णपणे रोखण्यासाठी ‘पूर्व जर्मनी’च्या साम्यवादी राजवटीने दोन्ही बर्लिनच्या सीमेवर तारेच्या कुंपणाच्या जागी भिंतच बांधण्याचे ठरवले.