Skip to main content

मराठी माणूस म्हणजे अशिक्षित, दारूबाज, आळशी, गावठी ???............... का???

लेखक मंगेशपावसकर यांनी गुरुवार, 04/03/2010 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो, आमच्या ऑफिस मध्ये घडलेला एक प्रसंग सांगतो. हल्लीच मी माझे टी. वाय. पूर्ण केले व नोकरीच्या शोधात होतो, एका प्रतिष्ठित कंपनीमध्ये जॉबला हि लागलो, पण ट्रेनिंग च्या वेळी आम्हाला इंग्रजी व्याकरण, गणिती, यु . के एस्सेंट विषय होते. एका फिमेल ट्रेनर चा असा समज होता (अर्थात गैरसमज) कि मराठी मुले वर्नाक बोलतात, तिने तसे बोलून हि दाखवले. सगळ्या उमेदवारांना एक पेसेज दिला व वाचायला सांगितले, आमच्या पैकी माझ्यासकट ब-याच मराठी मुलांनी तो पेसेज ऑफिशियली यु. के . असेंट मध्ये वाचून दाखवला व तिचा गैरसमज दूर केला. पण इतर मुलांनी १-२ जण वगळता कुणाहि अमराठीस तो धड वाचता हि आला नाही .

प्रथम तुला वंदितो

लेखक अर्धवटराव यांनी गुरुवार, 04/03/2010 07:19 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी. आम्हि अर्धवटराव. नावाप्रमाणेच आचार, विचार, उच्चार, आणि इतर बर्‍याच बाबतीत आम्हि अर्धा पेला भरलेला (कि रिकामा... काय ते असेल) आहोत. काहि बाबतीत मात्र आम्हि परिपूर्ण आहोत... पण त्यांचि आम्हाला अर्धवट माहिती आहे. तर सांगायचा मुद्दा हा कि अश्या आमच्या सारख्या मडक्यांचि ठण्ठण् कोणिही ऐकुन घेत नाहि. अश्या उदास अवस्थेत व्रुथा भुमीवर भटकत असता आम्हाला या मिसळेच्या हाटेलाचा पत्ता सापडला. बरेच दिवस हाटेलाबाहेर उभं राहुन आम्हि आत यावं का हा विचार केला. इथे कसली तालेवार मंडळी आहेत. कोणि संगीत कोळुन प्यालय तर कोणि सहित्य. कोणाला राजकारण आवडतय तर कोणाला समाजकारण.

प्रवीण महाजन यांचे निधन

लेखक बाबुराव यांनी बुधवार, 03/03/2010 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
प्रमोद महाजन यांची हत्या करणारे त्यायचं भाऊ प्रवीण महाजन यायचं आज ठाण्याच्या ज्युपीटर हॉस्पीटलात निधन झालं. त्यायला भावाच्या हत्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षाबी झाली व्हती. प्रमोद महाजनाचा खून करुन त्यायच्या आयुष्यात सुख मातर काय आलं नाय. सारं इथंच भोगावं लागतं म्हणत्यात ते काय खोटं नव्हं राहूल महाजन यायचं लग्न सहा मार्चला व्हणार हाये ते रद्द व्हईन का. कटूता कायम राहती का ? प्रवीण महाजन यायलाबी श्रद्धांजली.

' जाळीदार पान '

लेखक साईली यांनी बुधवार, 03/03/2010 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
हळुवार ज्योत पेटावी तश्या आठवणी हळुवार उजळू लागतात. आणि या उजळणाय्रा आठवणीत लाकडाचे शांतपणे पहुडलेले बाक उभे राहतात. सगळे कसे शिस्तंबद्ध लयीत मांडलेले असतात. आणि अचानक ते भरून जातात चिवचिवाट करणाय्रा पिल्लांनी. मग गोंगाटावर नियंत्रण करायला एक पट्टी वर्गात येते. साहजीकच ही पट्टी एकटी नसते. सर कींवा बाईरुपी माणसाच्या हातात ही पट्टी असते. या शिस्तीचा तेव्हा राग येत असे. पण शिस्तीला जिवनात फार महत्त्व आहे हे फार उशीरा ध्यानात येत. पद्धत चुकिची असेल कदाचित पण हेतू मात्र एकच शिस्तिचा. जन गण मन आणि भारत माझा देश आहे हे आपल्याशी तेव्हाच जुळले जातात.

अहो जरा पेन देता का...

लेखक साईली यांनी बुधवार, 03/03/2010 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
काय करावे . पेन मागायला काहिना काहिच वाट्त नाहि. शिक्षिताला पेनाचे मह्त्त्त्व आहे.एक तर माझे पेन ह्ररवतो. त्या चा मला इतक काहि वाट्त नाहि. जितक कोनाला पेन दिल्यानन्तर परत नाहि मिळाल्ञावर् होतो.मि कितेक वेळा असे पाहिले आहे, महागडे सुट्बुट , टाय घातलेले माणसे मऴके कपडे असणार्याना पेन मागतात , गरज नसति तर बोलणे देखिल त्याना आवडत नाहि.तो पेन मागताना ' साहेब जरा पेन देता का ' असे म्हणतो .

कारण ती माझी चांगली मैत्रीण होती.........

लेखक मंगेशपावसकर यांनी बुधवार, 03/03/2010 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
कारण ती माझी चांगली मैत्रीण होती......... साधी सोज्वळ निरागस होती पण जगाचे भान मित्रत्वाची सान चांगलेच ओळखून होती कारण ती माझी चांगली मैत्रीण होती ती होती तेव्हा बोलायचो खूप एकमेकांशी हातात हात नसेल कदाचित पण डोळ्यानेच मला समजून घेत होती कारण ती माझी चांगली मैत्रीण होती विचारात घेता ते आकर्षण मुळीच नव्हते फक्त तिच्या डोळ्यांनी मी प्रभावित होतो ती हि कधी हा विचार करत होती कारण ती माझी चांगली मैत्रीण होती घरी येणे जाणे नसेल एकमेकांचा कॉलेज मध्ये क्लास मध्ये एकत्रच जात होतो माझ्या साठी वाट पाहत गेट बाहेर उभी होती कारण ती माझी चांगली मैत्रीण होती कधी कधी वाटायचे हि माझी प्रेयसी

जय भवानी ............. जय शिवाजी.........

लेखक विनोदबाण़खेले यांनी बुधवार, 03/03/2010 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
जय भवानी जय शिवाजी........................ निश्चयाचा महा मेरु , बहुत जनांसी आधारु, अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी......... यशवंत,कीर्तिवंत, सामर्थ्यवंत,वरदवंत, पुण्यवंत,नीतिवंत, जाणता राजा

भुर्जपत्र ते वेबपेज

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी बुधवार, 03/03/2010 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
भुर्जपत्र ते वेबपेज हा साहित्यप्रवास उलगडणारा कार्यक्रम नुकताच पुण्यात संमेलन पुर्व संमेलनात झाला. किरण ठाकुर यांनी प्रास्ताविक केले. डॊ सतिश देसाई यांनी एकुण कार्यक्रमाची रुपरेषा व संकल्पना सांगितली. परिसंवादाला प्रसिद्ध लेखक अनिल अवचट, मराठी अंकाचे ई संपादक व कवि महेश घाटपांडे, साहित्यक व समन्वयक मिलिंद जोशी, पत्रकारिता क्षेत्रातील माजी संपादिका साप्ताहिक सकाळ श्रीमती संध्या टांकसाळे, वृत्तपत्र विद्या विभागाच्या प्रमुख उज्वला बर्वे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मराठी ब्लॊगर व स्टार माझाचे सहा. निर्माते प्रसन्न जोशी यांनी केले. अनिल अवचटांनी आपला संगणक प्रवास सांगितला.

राजमाची

लेखक प्रचेतस यांनी बुधवार, 03/03/2010 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारी २७ ला रात्री राजमाचीला जायचे ठरले व आम्ही चौघे रात्री १०.३० च्या लोकल ट्रेनने ११.४५ ला लोनावळ्यात उतरलो. तिथून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर आलो. पुण्याच्या दिशेने काही अंतर पुढेच एक पेट्रोल पंप लागतो. तिथून डावीकडे वळून गुरुकुल मागे टाकून आम्ही तुंगार्ली गावात आलो. तिथून पुढे दृतगती महामार्गाच्या खालून जात आम्ही डोंगराच्या पायथ्याला पोहोचलो. साधारण ४० मिनिटात रेल्वे स्टेशनपासून इथवर येता येते. डोंगर चढून आम्ही तुंगार्ली धरणाची भिंत उजवीकडे ठेवत पांगोळली गावात पोहोचलो. गाव संपताच एक घळ सुरु व्हायची. तो उतार संपला की थेट राजमाचीच मुख्य रस्ता लागायचा.