राजयोग
काशिब, तसे भारताच्या नकाशावरील शोधुनही न सापडणारे गाव. इतर कुठल्याही गावासारखेच शांत आणि सुंदर. निसर्गरम्य. गावातुन वाहणारी नदी, दोन्ही तीरावर विस्तीर्ण शेती. गावकरी गरीब पण खाऊन - पिऊन सुखी. स्वातंत्र्यानंतर जी काही स्थित्यंतर झाली, त्याचे पडसाद गावावर पण पडले. अशातच पाटलचा पोरगा सुर्याजी आधी सरपंच मग आमदार झाला आणि गावाने जणु कातच टाकली. सुर्याजीने आणि त्याच्या पूढच्या पीढीने गावाचा नकाशा पार बदलुन टाकला. घरा घरात वीज आली, पक्के रस्ते झाले. गावा बाहेरच्या जंगलाची साफ-सफाई करुन दोन-तीन कारखाने पण आले. गावात एस.टी तर होतीच, पण आता दोन-चाकी, चार-चाकी पण गावात दिसायला लागल्या.
मिसळपाव
बोईटाची खवले काढून त्याचे पोटाला चिर पाडून पोटातील घाण काढावी, शेपुट व पर काढावेत. मग जर बोईट मोठे असतील तर त्याचा शेपटाकडील भाग , डोके आणि मधला भाग असे तिन भाग करावेत. डोके व शेपटाचा भाग कालवणासाठी वापरावे व मधला भाग तळण्यासाठी वापरावा. जर छोटे असतील तर दोन तुकडे किंवा अख्खेच ठेवावेत.