शाळा रे शाळा
'अगं बायांनो तुमच्या एकेकीच्या एका वर्षाच्या फीत माझं बालवाडीपासून ते बी.डी.एस. पर्यंतचं पूर्ण शिक्षण झालंय ग'.अस्मादिकांच्या दोन कन्यारत्नांच्या दर शालेय वर्षाच्या सुरुवातीस त्या बिचार्या दोघींना माझ्याकडून न चुकता हे ऐकून घ्यावं लागतं. खेरीज वर्षभरातही अनेकदा त्याची पुनरावृत्ती प्रसंगोपात होत असते ती न्यारीच.तरी ही फी मोठ्या शहरातील शाळांच्या तुलनेत कितीतरी कमी आहे.
मिसळपाव