Skip to main content

पारध

लेखक समीरसूर यांनी शुक्रवार, 03/09/2010 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
"भिंतींवर थुंकणारा माणसाची औलाद नसेल" या खास पुणेरी पद्धतीच्या पाटीने आमचे जंगी स्वागत केल्यावर आम्ही आमचा मोर्चा तिकीटखिडकीकडे वळवला. प्रभातच्या दारावर तिकीट घेणारे आजोबा मी गेल्या १८ वर्षांपासून बघत आलोय. ते अजूनही तसेच दिसतात. पुणेरीपणाची 'सिनेमा बघायचाय तर बघा नाहीतर शनिवारवाडा बघा पण दारातून लवकर टळा' अशी एक खास मिजास चेहर्‍यावर ठेवून ते आत्मीयतेने तिकीटे फाडतात. तिकीटखिडकीवर मी ५०० ची नोट देत "दोन द्या" असे म्हटल्यावर तिथल्या माणसाने चेहर्‍यावरची सुरकुतीही न हलू देता थंडपणे "सुट्टे द्या!" अशी पुणेरी संयत डरकाळी फोडल्यावर मी गुपचूप सुटे काढून दिले.

दुबई ला जाताय..जरा जपून

लेखक अशक्त यांनी शुक्रवार, 03/09/2010 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
काल एक ढकलपत्रातून अस कळल की कोणाच्या तरि मित्राला खसखस बाळगल्या बद्दल दुबई मध्ये २० वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली. लहानपणी आम्ही चार आण्याची खसखस...................फसफस...अस काहितरी गाण म्हणायचो. खसखस अनारश्यात खाल्ल्याचे आठवते. म्हणजे आता दिवाळी ला फराळ करुन प्रवास केला तर तुरुंगाची हवा खावी लागेल. ही बातमी बघा http://www.boddunan.com/forums/11-general-discussions/70531-a-very-very… थोड गुगल करुन पाहील, बातमी मध्ये तथ्य आहे असे वाटते.

मदत हवी आहे

लेखक priya_d यांनी शुक्रवार, 03/09/2010 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! मि मिपावर नवीनच सभासद झाले आहे. येत्या गणेशोत्सवात म्हण्ण्यासाठी (माझ्या ८ वर्षाच्या मुलाला) काही सोपे श्लोक किंवा छोटी गाणी इ. हवे आहे. कोणी मदत करु शकेल का ? लिरिक्स सुध्दा चालेल. प्रिया

स्वार्थी लोकशाहीला कुठेतरी अटकाव घालायलाच हवा. पण कसा ?

लेखक गांधीवादी यांनी शुक्रवार, 03/09/2010 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
माझा महान भारत स्वतंत्र झाल्यापासून जेमतेम ६० वर्षच झालेली असताना त्याच्या एकमेवाद्वितीय महान अश्या लोकशाहीला जी वाळवी(कीड) लागली आहे ती दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. ती वाळवी कमी करण्याचे नानाविविध उपाय जनता सुचवत आहे. त्यातलाच एक उपाय म्हणजे "माहिती अधिकार". ह्याचा वापर जरा कुठे सुरु झाला नाही तोवर हा अधिकार वापरनार्यांवर आणि प्रत्यक्ष त्या अधिकारावर रोज कुऱ्हाड कोसळू लागली आहे. पण कित्येक नागरिक अजूनही हे (माहिती अधिकाराचे) शास्त्र हातात घेऊन आज त्या वाळवीशी प्राणपणाने लढताना दिसतात.

नारळी भात.....

लेखक निवेदिता-ताई यांनी शुक्रवार, 03/09/2010 08:15 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :- २ वाट्या जुने तांदूळ, १ नारळाचा चव (खोवलेला नारळ) , २ वाट्या चिरलेला गुळ(पिवळा), १/२ वाटी साजूक तूप, ५/७ लवंगा, ९/१० बदामाचे केलेले काप,काजूचे तुकडे १०-१२, वेलदोड्याची पुड १/२ चमचा,पाव वाटी बेदाणे. कृती : तांदूळ धुऊन तासभर ठेवावेत. दोन चमचे तूप तापवून त्यात लवंगा टाकाव्या व त्यावर तांदूळ घालून परतावे. नंतर त्यात तांदळाच्या दुप्पट आधणाचे पाणी घालून मोकळा भात करून घ्यावा. शिजलेला भात परातीत पसरून मोकळा करावा नंतर नारळाचे खोवलेले खोबरे व गूळ एकत्र शिजवून घ्यावे व त्यावर वरील भात घालून भात सारखा करावा.

गण: माझ्या गणाला गणपती आले

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 03/09/2010 08:07 या दिवशी प्रकाशित केले.
गण: आमच्या गणाला गणपती आले
आमच्या गणाला गणपती आले वंदन करूनी मस्तक झुकले ||धृ|| रिद्धीसिद्धीचा स्वामी तू गणपती शरण आलो आम्ही अल्पमती कार्यारंभी दावूनी उपस्थीती दयाबुद्धीने आम्हा पाहीले आमच्या गणाला गणपती आले ||१|| कलाकारां होवोनी स्पुर्ती जगावेगळी मिळण्या किर्ती कला आगळी सादर करण्या कलाकार सारे एकच झाले आमच्या गणाला गणपती आले ||२|| सारी विघ्न
काव्यरस

माझे रिकामपणाचे उद्योग--पेपर क्विलिंग!!!!

लेखक मस्त कलंदर यांनी शुक्रवार, 03/09/2010 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे आधीचे रिकामपणाचे उद्योगः १. ग्लासपेंटिग २. बुकमार्क्स सुबक ठेंगणी जपानहून आली. यायच्या आधीच तिने माझ्यासाठी विणलेला एक छानसा रूमाल घेतलाय म्हणून सांगितले होते. पण भेटली, तेव्हा तिने नुसता एकच रूमाल न देता एक आख्खी पेपर बॅगच दिली. आणि मी आतल्या भेटवस्तू पाहायचं सोडून बॅगकडेच पाहात राहिले. कागदाच्या पातळ पट्ट्या नीट्सपणे कापलेल्या. आणि त्या पट्ट्यांची सुंदरशी पिवळी-तांबडी, पिवळी-निळसर फुले, हिरवीगार पाने अशी मस्त नक्षी. प्रत्येक फूल दिमाखात...

शाहीन..!

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 02/09/2010 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
"लौकरच तुझ्यावर मी एक लेख लिहिणार आहे. तुझ्या फोटोसकट. तुझी परवानगी आहे का?" -- मी. "माझं आयुष्य म्हणजे एक ओपन कार्ड आहे तात्या.. माझी फुल्ल परवानगी आहे" - शाहीन. दिलिपअन्ना शेट्टी. मुलुंडच्या शास्त्री मार्गावर उमापॅलेस नावाचा एक डान्स बार आहे, त्याचा चालक-मालक. त्या सा-या शेट्टी फॅमिलीचा मी आयुर्विमा दलाल. त्याची बायको, दोन मुली - सा-यांच्या आयुर्विमा पॉलिसीज उतरवण्याचे काम माझ्याकडे. माणूस मालदार आहे त्यामुळे सतत कुठल्या ना कुठल्या पॉलिसीज माझ्याकडून घेत असतो. असाच एके दिवशी मी पॉलिसीजच्याच काही कामानिमित्त त्याच्याकडे गेलो होतो. शेट्टी बिझी होता.

क्रिकेट वेळ वाया घालवून बघण्याचा खेळ आता उरला आहे का?

लेखक सुनिल पाटकर यांनी गुरुवार, 02/09/2010 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
दिवसेंदिवस क्रिकेट खेळात होत असलेला गोंधळ ,रडीचा डाव ,मँच फिक्सिंग,भ्रष्टाचार यामुळे क्रिकेट वेळ वाया घालवून बघण्याचा खेळ आता उरला आहे का?

धिस टाईम फॉर आफ्रिका. - चित्रसफर.

लेखक अर्धवट यांनी गुरुवार, 02/09/2010 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
थांबा... शिर्षक वाचुन घाबरू नका, अजुन एक भाग पाणी घालून वाढवत नाहिये. पण प्रवासातल्या गडबडीमुळे शेवटच्या काही भागात फोटो टाकायला जमलं नव्हतं. भरपाई म्हणुन या भागात केवळ फोटोच टाकतोय.