Skip to main content

अस्पृश्यतेचा कळस

लेखक शानबा५१२ यांनी शनिवार, 25/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यप्रदेशमधे एका राजपुत घराण्यातील कुत्र्याने,ज्याचे नाव शेरु आहे, एका दलित वस्तीत राहणा-या स्त्रीने घातलेली भाकरी खाल्ली.त्यानंतर घडलेल्या काही घटना : १.

स्मृतिभ्रंश!

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 25/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
बातमी खूप वाईट आहे. गांभीर्यानं दखल घेण्याजोगी आहे. चिंता करायला लावणारी आहे. खचवून टाकणारी आहे. माझ्या मोबाईलमधल्या "सॉफ्टवेअर'चं काल दि. 23 रोजी निधन झालं. अनंत चतुर्दशीनंतरच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे आज त्याचं "विसर्जन' करायला मला भाग पडलं. सॉफ्टवेअर बदलून घेणं किंवा त्यासाठी आलेला अडीचशे रुपये खर्च, हे दुःखाचं कारण नसून, माझ्या खात्यातील सर्व संपर्कही सॉफ्टवेअरसोबत गंगेला मिळाले, हे आहे! काल रात्री काम करताना वरिष्ठांचे धपाधप पाच-सहा एसएमएस आले. बहुधा त्याचा ताण सहन न झाल्यामुळे की काय कुणास ठाऊक, मोबाईलनं अचानक मान टाकली. सुरूच होईना. थोडासा "डिस्प्ले' येऊन गायब होत होता.

पहावे अंतर्यामी

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 25/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
कोण म्हणे देव भक्ताचा भुकेला वारकरी मेला वारीतच विश्वात्मक ऐसे इथे काही नाही तुच तुला पाही आत मध्ये तुझ्या अस्तित्वाचा एकच पुरावा मी पणा पहावा अंतर्यामी अंतर्यामी घ्यावा शोध ज्याचा त्याने विचार स्पंदने निरिक्षावी सांडे अहंकार वासना विकार जेव्हा निर्विकार पाहसी तू...!!
काव्यरस

प्रश्न..

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 25/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
फार पूर्वी पासून मी जेव्हा स्वतःला बघत आलो.. तेव्हा मला जाणवलं की मी आजिबात बदल्लेलो नाही.. ..आणि बदल होणं हे जीवंतपणाचं लक्षण असेल तर मी जीवंत कसा..? असाही मला प्रश्न पडतो मला असही वाटतं की मी जीवंत नसतो तर या प्रश्नानीही मला सतावलं नसतं कारण मढ्याला पडत नाहीत प्रश्न आणि स्वप्नही...! मला तर दोन्ही ही पडतात...!!
काव्यरस

"जगी सर्व क्रूर असा कोण आहे" ?

लेखक गांधीवादी यांनी शनिवार, 25/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
हि धरती आपल्याला आंदन म्हणून दिल्यासारखी मानवाची वागणूक आहे. ह्या धरतीवर केवळ आणि केवळ मानवाचाच हक्क असल्यागत मानवाची इतर प्राण्यांबाबत क्रूर वागणूक असते. हि क्रूर वागणूक दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. स्वतःच्या सुखासाठी, चवीसाठी, सौंदर्यासाठी मानव हा इतर प्राण्यांचा बळी देताना जराही मागे पुढे पाहत नाही. मुख्यत्वे मांस, दंत, आणि कातडी यासाठी मानव स्वताच्या हव्यासासाठी त्याची हत्या करतो.

निसर्गाची भाषा

लेखक शुचि यांनी शनिवार, 25/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आई फक्त माणूसच बोलू शकतो का? नाही बाळा, सारी सृष्टी बोलते आपल्याशी ऐक जरा. फक्त भाषा भिन्न असते. ____ चंद्राची भाषा चांदणे, सूर्याची भाषा रवीकिरणे वार्‍याची भाषा झुळकेची, समुद्राची अलवार गाजेची ||१|| पिंपळवृक्षाची सळसळ, नदीनाल्यांची खळखळ सार्‍यांचे मन उमगेल तुला, स्तब्ध शांत करशील मना||२|| कमळ बोलतसे उमलण्यामधुनी, मधमाशी ती कष्टांमधुनी पहाड बोले अचलपणांतुनी, नभ ते त्याच्या पोकळीतुनी||३|| मौन होउनी संवाद साध बघ, आकळेल निसर्ग तुला सार्‍यांचे मन उमगेल तुला, स्तब्ध शांत करशील मना||४||
काव्यरस