Skip to main content

धूसर असेल तर ती स्पष्ट केली पाहिजे!

लेखक गुंडोपंत यांनी सोमवार, 11/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
वैधानिक इशारा - धोका पुढे दीर्घ आणि काही लोकांच्या मते वैचारिक प्रश्न मांडणारे लेखन आहे. आपापल्या जबाबदारीवर वाचावे. डोक्याला त्रास झाल्यास गुंडोपंत जबाबदार नाहीत! सध्या मिसळपाव वरील सिद्धहस्त लेखक आणि अभ्यासक धनंजय यांचे लेखन येत का नाही, असा प्रश्न पडला. थत्ते यांच्या कृपेने धनंजयच्या खरडवहीत त्याचे उत्तरही मिळाले. ते पुढील प्रमाणे - सध्या संपादनाबद्दल आचारसंहिता फारच धूसर आहे.

गंधवार्ता

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 11/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
गंधवार्ता दोर गळ्यात लटकवून बाप झुलतोय झाडावर माय निपचित पडलीय हृदय फाटता धरतीवर बाळ खिदळतंय मनीसंगे मिशा तिच्या धरता-धरता नाही जराही त्याला कसलीsssचं गंधवार्ता . . . . . गंगाधर मुटे ...................................
काव्यरस

मैत्रि (एक खोडकर ओलावा)

लेखक कल्पेश इसई यांनी सोमवार, 11/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
कल्पेश इसई.(एप्रिल २०००) शाळेच्या काळातली..... शाळेतल्या एकाच बेन्च्वर बसण्यासाठी भान्डण करणारे... तर.. मधल्या सुटिमध्ये आम्बट लोणच्यालाही गोड चव आणणारेही ..तेच हे मित्र सरान्ना मुद्दामुन नाव सान्गणारे ... तर..मार बसु नये म्हणुन त्यान्च्याच समोर खोटे बोलणारेही ....तेच हे मित्र सरान्नी प्रश्न विचारल्यावर घाबरवणारे.. तर्..परिक्षेच्यावेळी येत नसलेले उत्तर सान्ग्ण्यासाठी इशारे करणारेही ....तेच हे मित्र कधिच विश्वास नाहि ठेवावा असे वाटणारे.. पण..
काव्यरस

कॉर्पोरेट तमाशा १० : पहिली पार्टी

लेखक रन्गराव यांनी रविवार, 10/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
गेले तीन महिने मी आर्किटेक्ट बरोबर काम करत होतो. बाकिच्या टिमचा काम आणि माझ काम आता रेल्वेच्या रूळासारखे समांतर चालले होते. सरांनी मला सांगितल होता -"Your code might not be part of the release now, but i'm sure it will be needed at some point of time." मी-" The convergence is going to be a nightmare. If they were to include my code at later point of time, they cant do it without affecting the design. " सर -" None the less continue your work." बनिया म्हणाला- " लगता है अपना प्रोडक्ट जल्दीही कोड कंप्लीट हो जायेगा.

धक्कादायक विधान करणा-या पुस्तकाबद्दलचे प्रश्न

लेखक शानबा५१२ यांनी रविवार, 10/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार्,नमस्कार, गेली दोन तीन दीवस एक पुस्तक वाचतो आहे.त्यात एका चॅप्टरमधे एका व्यक्तीवर टीका करण्यात आली आहे.टीका म्हणजे साधीसुधी टीका नाही,सर्व मर्यादा ओलांडुन टीका करण्यात आली आहे.लेखकाने त्या व्यक्तीबद्दल जनसामान्यांत असलेल्या अफवांना त्या व्यक्तीच्या स्वभावाशी जोडले आहे.म्हणजे एखादी घटना सांगताना त्या अफवेचा वापर दाखला म्हणुन करण्यात आला आहे.जी अफवा अत्यंत धक्कादायक व त्या व्यक्तीच्या खाजगी आयुष्याशी संबंधीत आहे. त्या व्यक्तीशी लेखकाची झालेली मुलाखत लेखकाने लिहली आहे,त्यात त्या व्यक्तीच्या विचारांपासुन ते उच्चारापर्यंत

मुगाची खिचडी आणि फोडणी

लेखक रतन यांनी रविवार, 10/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम मन्ड्ळी. मिपा वरील हे माझे पहिलेच लेखन. मिपची आणि माझी गाठ आन्तरजालावरती मिसळची पाकक्रुती शोधताना पडली. मिपा वरील अनेक पाकक्रुती पाहून या कट्याच्या प्रेमात पडलो. हिन्दुस्थानात लग्न होइपर्यन्त खाणवळीत पोट भरत होतो लग्न झाल्यावर बायकोच्या हातचे आयते पदार्थ गिळत होतो. साइटनिमित्त देशाच्या बाहेर पडलो आणि खायचे वान्धे झाले. मग बोंबलत आन्तरजालावर पाकक्रुती शोधत हिण्डू लागलो. प्रवास शेवटी मिपा वर येउन थबकला आणि आम्हि इथेच वस्ति करयचे ठरवले. विश्वास ठेवा, मी प्रथम आठवडाभर मिपावर फक्त पाकक्रुतीच आहेत असे समजत होतो.

बंडू आणि मुखपुस्तकातले उरोजकर्क स्थितीसंदेश!

लेखक नगरीनिरंजन यांनी रविवार, 10/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
काही महिन्यांपुर्वीची गोष्ट. शनिवारची सकाळ, म्हणजे तसे दहा वाजून गेलेले, पण तरीही ती सकाळच. शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत ऑफिसात इमर्जन्सी रिलीजवर काम करून, आयटीतला माणूस झोपू शकेल तितपत, ढाराढूर झोपलेला बंडू रस्त्यावरच्या वाहनांच्या कर्कश कलकलाटाने जागा झाला. बिछान्यावर पडल्या पडल्याच त्याने कानोसा घेतला. स्नेहलता आयटीत असल्यामुळे स्वयंपाकघरातून पोहे-उप्पीट वगैरेचा खमंग वास येणे शक्य नाही हे माहिती असूनही उगाचच वेडी आशा लावून त्याने एक खोल श्वास घेतला.

राष्ट्रकुल:-प्रेक्षकांचा पाठिंबा आणि खेळाडू.

लेखक Bhushan Kulkarni यांनी रविवार, 10/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्लीत चाललेल्या राष्ट्रकुल खेळांमधिल भारतीय खेळाडुंचे प्रदर्शन पाहुन संपुर्ण जगाने तोंडात बोटे घातली आहेत.खेळाडुंचे प्रदर्शन आणि भारताने केलेला उद्घाटन समारंभ व खेळांचे आयोजन यामुळे 2020 साली होणार्या ऑलंपिक स्पर्धाँचा प्रबळ दावेदार म्हणुन भारत पुढे आला आहे. भारताची सर्वात जास्त शक्ती ही प्रेक्षकांकडुन मिळणारया पाठिंब्यात आहे.जेव्हा सर्व प्रेक्षक एका सुरात 'जितेगा भाई जितेगा,ईँडीया जितेगा.' आणि 'भारत माता की.....जय!' असे म्हणतात तेव्हा खेळाडू आपली पुर्ण क्षमता पणाला लावतो व त्यातुनच त्याची सर्वश्रेष्ठ कामगिरी होते.राष्ट्रकुल स्पर्धेत आपल्याला या गोष्ठीचा वारंवार अनुभव आला आहे. परंतु काही ख