Skip to main content

अतिरेक्यांचे मित्र

शुक्रवार, 22/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
२१ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे अरुणधती रॉय व त्यांच्या मानवी हक्क जपणा-या मित्रपरीवारांनी (श्री वरावर राव व बाकीचे माओईस्ट मित्र) एक सभा बोलावली होती. ह्या सभेत हुरीयत पुढारी व काश्मीर तोडायला बसलेले श्री सय्यद अली शहा गीलानी हे बोलले. ह्या सभेचा विषय होता– काश्मीरला आझादी – एकच पर्याय. सभा - कमीटी फॉर द रिलीज ऑफ पोलिटीकल प्रिझनर्स ने बोलावली होती.

मराठी असे अमुची मायबोली | जरी तिची आम्हास पर्वा नसे ||

लेखक पारा
शुक्रवार, 22/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
अस मला आजकाल म्हणावसं वाटत आहे. आता तुम्ही विचारलं की का बुआ, असं विशेष काय झालं. नाही म्हणजे प्रत्येक वेळी काहीतरी मनापासून वाटायला काहीतरी घडावाच लागतं असं आहे का ? असो. तसं आहे खरं. आता बघा, मी राहतो पुण्यात. कामानिमित्त. तसा मी मुळचा मुंबईचा, पण पुणं तसं मला नवीन कधीच नव्हतं. बरेच नातेवाईक राहतात माझे इथे. लहानपणापासून येतोय मी इथे. आवडतं ही मला पुणं. विद्येच माहेरघर म्हणतात ह्याला. एकेकाळी इकडच्या सर्व शाळांना आपापला माज होता. एक गर्व, आता तो दुराभिमान कि अभिमान ह्या वादात मी आत्ता जात नाही. पण हा गर्व आज मला कुठे दिसत नाही.

भारतवेडी कमला

शुक्रवार, 22/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
भारतवेडी कमला
आपण ऐकत आलोय स्वामी विवेकानंदांच्या आभावलयामुळे प्रभावित झालेल्या भगिनी निवेदिता किंवा महात्मा गांधींच्या सात्विक व तत्वनिष्ठेने प्रभावित झालेल्या मीराबेनची आत्मसमर्पणाची भावना. देश बंधु-बांधवांना सोडून भारताची आस धरुन आलेल्या त्यागी महिला.

साद सागराची

लेखक योगेश२४
शुक्रवार, 22/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाचा वाढता तडाखा, लोकलचा नको नकोसा वाटणारा प्रवास, उन्हामुळे अंगाची होणारी काहिली!!! काय करावे????? चला तर आज तुम्हाला पुण्या-मुंबईपासुन जवळच असलेल्या समुद्रकिनार्‍याची भटकंती करून आणतो. :) कसला विचार करताय???? चला सुरुवात मुंबईपासुन करूया आणि थेट सिंधुदुर्गापर्यंत जाऊन येऊया.

बेसिंगस्टोक मेळावा २०१०!

लेखक असुर
शुक्रवार, 22/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, दसर्‍यानिमित्त शिवाजी पार्कावर झालेल्या ५० डेसिबलच्या मेळाव्याबद्दल बरीच वर्तमानपत्र, वाहिन्या, मराठी आंतरजालावरील धागाकर्ते वगैरे लोकांनी खूप लिहून बक्कळ चर्चा केली. अर्थातच आम्हालाही मळावे वगैरे गोष्टीत भयंकर इंटरेस्ट! त्यामुळे बेसिंगस्टोकात झालेल्या नवरात्र-नवमी मेळाव्याबद्दल लिहून ऑल इंग्लंड गणेशोत्सव मंडळ, अँग्री इंग्लंड युवा मोर्चा, बेसिंगस्टोक म्हैला मंडळ, आणि 'क्लब बेल्जियम' यांच्याप्रती शुभेच्छा व्यक्त कराव्यात हा मानस आहे! बेसिंगस्टोक म्हैला मंडळाच्या संस्थापिका आणि अध्यक्षा मा.

पुस्तक परीचय: "थ्री कप्स ऑफ टी"

लेखक मराठे
शुक्रवार, 22/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
हा पुस्तक परिचय आहे. परिक्षण करण्याइतपत अक्कल मला नाही. जे आवडलं ते लोकांना सांगावं हाच फक्त उद्देश. १९९३ मधे, अमेरिकेतल्या मोंटाना राज्यात राहणारा एक धाडसी गिर्यारोहक "ग्रेग मॉर्टेन्सन", के-२ हे जगातलं दुसर्‍या नंबरचं उंच पण अतिशय अवघड असं शिखर सर करण्यात अपयशी ठरतो. पाकिस्तानातल्या (पाक्-व्याप्त काश्मिरमधल्या) ईशान्येला असलेली हिमालयातली काराकोरम पर्वतरांग म्हणजे जगातल्या अत्युच्य अशा साठ पर्वतशिखरांचं माहेरघर, पाकिस्तान व चीन मधे असलेली नैसर्गिक हद्द. शरिराने श्रमलेल्या आणि अयशस्वी चढाईमुळे पूर्णपणे मानसिकरित्या खचलेल्या अवस्थेत ग्रेग मॉर्टेन्सन बेस कॅंपची आणि पर्यायाने बाकिच्या जगाची वाट चुकून कित्येक तास भरकटत एका गावात शिरतो. गावातली लोकं त्याची काळजी घेतात. परतताना मॉर्टेन्सन त्यांना, त्याच्या अवाक्याबाहेरचं, वचन देतो, "मी परत येइन आणि तुमच्या गावात एक शाळा बांधेन". अवक्याबाहेरचं वचन ह्यासाठी की मॉर्टेन्सनकडे त्यावेळी स्वतः राहायला घरही नसतं. अशा उनाड फिरणार्‍या आणि आपल्या गाडीत झोपणार्‍या मॉर्टेन्सनला ह्या प्रंसंगामुळे जगायला नवं कारण मिळतं. जवळ असलेलं नसलेलं सगळं विकून आणि नविन देणगीदारांना गाठून शाळेसाठी पैसे जमा करतो. आणि पुन्हा कोर्फेला परतुन तो आपलं वचन पूर्ण करतो. पण त्याचं कार्य इथेच संपत नाही. उलट इथे त्याच्या कार्याची सुरुवात होते. आज जवळ जवळ एक दशकभर चाललेल्या, तालिबान आणि अल्-कायदा सारखी अत्यंत कट्टरपंथियांचं आश्रयस्थान समजला जाणार्‍या प्रदेशात राहून विशेषतः मुलींसाठी शाळा बांधण्याच्या त्याच्या अथक परिश्रमांची ही गोष्ट आहे. एकिकडे जग दहशतवाद्यांची पाळंमुळं खोदुन काढण्यासाठी युध्द करत आहे.तर हा जगावेगळा शिपाई गरिबी आणि अडाणिपणा ही, दहशतवादामागील मूळ कारणं दूर करतो आहे. मुलं आणि मुलींना एकाच प्रकारे गैर-उग्रवादी (शब्द सुचवा) (nonextremist) शिक्षण देत आहे. हे करताना मॉर्टेन्सन यांना स्वतः अपहरण आणि असंख्य हल्ल्यांना तोंड द्यावं लागलं. भडकलेल्या इमाम व मुल्लांनी त्यांच्या विरुद्ध काढलेले फतवे तसंच अमेरिकेविरुद्ध गद्दार ठरवून त्यांना दिलेल्या धमक्या यांची तर गणतीच करायला नको. असं असूनही त्यांनी "सेंट्रल आशिया इन्स्टिट्युटचं" स्वप्न साकार केलं. ह्या अंतर्गत ५५ शाळा ईशान्य पाकिस्तान व अफगाणिस्तानच्या दुर्गम आणि गरीब भागात बांधल्या आणि त्या व्यवस्थित चालू राहतील याची व्यवस्था केली. मॉर्टेन्सन यांनी इथल्या हजारो मुला-मुलींना शिक्षणाद्वारे नवी दारं उघडून दिली आहेत. स्वतःच्या अथक परिश्रमांनी आज खरोखरच त्यांनी ह्या मुलांचं जग बदललं आहे.

महाराष्ट्राचा विकास कष्टाळू बिहारी लोकांमुळेच : राजपुत्र राहुलजी

गुरुवार, 21/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आजचे राजपुत्र व उद्याचे पंतप्रधान राहुलजी हे भारतीय संस्कृतीच्या गहन अभ्यासाकरता प्रसिद्ध आहेत. पंतप्रधानांसारखे वरिष्ट लोकही त्यांचे विचार ऐकून त्यातून बरेच काही शिकतात. सामान्यांची तर बातच सोडा. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6788805.cms तर ते नुकतेच असे बरळले आय मीन गरजले की महाराष्ट्र व पंजाबसारख्या राज्यांचा जो विकास झालाय तो केवळ कष्टाळू बिहारी लोकांमुळेच. राहुलजींसारखे प्रकांड विद्वान विचार केल्याशिवाय असे म्हणणार नाहीत. पण महाराष्ट्राचा विकास झालाय ही माहिती मला नवीनच आहे.

फूनके

गुरुवार, 21/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
funfeसाहित्य-तुर डाळ १ वाटी मूग डाळ ३/४ वाटी मठ डाळ पाव वाटी कोथींबिर जुडी १ कांदे २ मध्यम आकाराचे आलं १ ईंच लसुण ७-८ पाकळ्या मीठ मिरच्या ६-७ तेल तळण्यासाठी क्रुती- प्रथम तुर डाळ ,मूग डाळ, मठ डाळ पाण्यात ७-८ तास भिजत घालावे. त्यानंतर डाळी उपसुन घेउन मिक्सरवर जाड्सर वाटुन घ्याव्यात .मिक्सरमध्ये घालत असतांनाच त्यात आलं लसुण्,मिरच्या घालाव्यात व फिरवुन घ्यावे म्हनजे ते एकजीव होइल.

शेंगदाण्याची चटणी

गुरुवार, 21/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- २ कांदे मध्यम आकराचे १ टोमॅटो २ चमचे आलं-लसुण पेस्ट कढिपत्ता जीरं मोहोरि तेल हगद धणेपूड लाल तिखट शेंगदाण्याचा कूट कोथिंबीर पाणी क्रुती- कढईत तेल गरम करत ठेवावे त्यात जीरं ,मोहोरि घालावी मोहोरी तडतड्ली कि मग त्यात कढिपत्ता घालावा.त्यानंतर कांदा लालसर परतुन घ्यावा तसेच आलं-लसुण पेस्ट घालवी त्यातच टोमॅटो घालुन परतावे नंतर त्यात धणेपूड ,हळद व लाल तिखट घालावे व परतुन घ्यावे.आता त्यातच शेंगदण्याचा जाड्सर कूट घालुन खमंग परतुन घ्यावे व त्यात गरम पाणी घालावे ,चविनुसार मीठ घालावे व चान्गली १-२ उकळी येउ द्यावी ,शेवटी कोथिंबीरिने सजवावे.