Skip to main content

‘रानमेवा’ काव्यसंग्रह प्रकाशन

Published on रवीवार, 31/10/2010
‘रानमेवा’ काव्यसंग्रह प्रकाशन नमस्कार मित्रांनो, माझा ‘रानमेवा’ हा पहिलावहिला काव्यसंग्रह बुधवार दिनांक, १० नोव्हेंबर २०१० ला शेगाव (जि.बुलढाणा) येथे मा. शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजीत शेतकरी महामेळाव्यात लाखो शेतकर्‍यांच्या साक्षीने मा.शरद जोशी यांचे शुभहस्ते प्रकाशित होत आहे. आपणही उपस्थित राहून आपले आशिर्वाद द्यावेत, यास्तव हे आग्रहाचे निमंत्रण. ११२ पृष्ठे असलेल्या या कविता संग्रहास शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांची प्रस्तावना लाभली असून श्री वामनराव देशपांडे, श्री डॉ.

रैना बिती जाए..

Published on रवीवार, 31/10/2010
राग तोडी..! हिंदुस्थानी रागसंगीतातला एक दिग्गज राग. ज्याला तोड नाही असा तोडी..! सुरवातीलाच सारंगी.

स्त्रियांना कशा प्रकारचे पुरुष आवडतात? - एक नीरीक्षण

लेखक शुचि
Published on रवीवार, 31/10/2010
पार्श्वभूमी - माधुरी आणि नुपूर या माझ्या सहकारी माझ्याहून १० ते ८ वर्षाने तरी लहान आहेत. परवाचीच गोष्ट आम्ही ६० मैल दूर कॉर्पोरेट ऑफीसला कामानिमित्त जाऊन आलो आणि दुसर्‍या दिवशी रात्री डिप्लॉयमेंट होती म्हणून दोघी माझ्या खोलीवर राहील्या. रात्री डिनरच्या वेळी साहजीकच कॉर्पोरेट ऑफीस , तेथील नवीन सहकारी यांचा विषय निघाला. गाडी या रूळावर आली की कोणते सहकारी कसे वाटले? आणि काही रोचक पण सामाइक मुद्दे समोर आले.

" मनांतले श्लोक - "

लेखक विदेश
Published on रवीवार, 31/10/2010
तुझे रूप साधे किती गोजिरे रे तुला लोचनी साठवू साजिरे रे असावा जसा वाटतो तू तसा रे धनी - निर्धनी दर्शना येती सारे ।१। जिथे जाउ साई तिथे ती असावी सुखी सावली सोबतीला असावी कुठेही कधीही कशीही दिसावी तुझी मूर्ति साधीच नयनी ठसावी ।२। न गर्वात , सर्वात मिसळून राही न जाती , न धर्मात गुंतून राही गरीबात रावात देवास पाही असा देव साईविना कोणि नाही ।३। धना - कांचनाचा भुकेला न साई न लोभास मोहास स्वाधीन होई जयांना कळेना कसा देव साई तयांना कळू दे असा देव साई ।४। ’ सबूरी नि श्रध्दा ’ - शिकवण न स्मरणी मनीं अंधश्रध्दा - फळाची दिवाणी जमेना कुणाला फकीरी रहाणी रुचेना कुणाला सदाचार वाणी ।५। चढाओढ परदेशवारीत कोण
काव्यरस

बाणाची कादंबरी

लेखक अवलिया
Published on रवीवार, 31/10/2010
शुद्रक राजाचा दरबार भरलेला असतो. अनेक दरबाराची कामे चालु असतांनाच एक चांडाळाची मुलगी दरबारात पोपट घेऊन येते. हा पोपट साधासुधा नसतो तर चक्क मानवी वाणीने बोलणारा पोपट असतो. ती चांडालकन्या पोपट राजाला भेट म्हणुन देते. शुद्रकाला पोपटाविषयी खुप कुतुहल वाटुन तो त्याला त्याची हकिगत विचारतो. तेव्हा तो पोपट त्याची दु:खद कहाणी सांगतो. विंध्यारण्यातील एका मोठ्या वृक्षावर तो आणि त्याचे वडील रहात असतात. त्याच झाडावर त्याचे अनेक सगेसोयरे रहात असतात. पोपटाची आई लहानपणीच वारल्याने त्याच्या वडीलांनीच त्याचा संभाळ केलेला असतो.