Skip to main content

कुठे गेली सगळी माणसे

लेखक निनाव यांनी बुधवार, 16/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
कुठे गेली सगळी माणसे नाहिच कसे कुणी मज दिसेना? तो पान वाला पण दिसत नाहिये आज ज्याच्या दुकाना च्या बाहेर उभे राहुन विविध आकॄत्यांमधे ...धुर उडायचे ओठांचे चंबु मग शुन्यात बसायचे बाजार ही रिकामेच दिसते आहे आज कुणास ठाउक का? न ते आवाज न ते गोंगाट सगळे संपले कि..विकले गेले आज? तिथं त्या कडु-लिंबाच्या बाजुला असायचा एक -बस-थांबा तो ही दिसत नाहिये मला प्रवासी गेले आहेत निघुन कि संपले आहे प्रवास? डोंबारीच दिसत आहेत फक्त आज ओसाड रस्त्यांवर मला तोल सांभाळतांना हसत आहेत का त्या दोरी चीच आहे कास? मारुन पाहिल्या हाका त्यांना पण कुणी काही बाहेर येईना जात नसेल का माझा आवाज कि यायचेच नसेल त्यांना? कुठ

पुर्वांचल - उपेक्षीत आणि अपिरीचीत भाग. (भाग- १)

लेखक चिंतामणी यांनी बुधवार, 16/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
ईशान्य भारतातील जनजातींचे पुनरुत्थान ही विश्वास कल्याणकर यांचा धागा वाचल्यावर मला मागच्या वर्षी महाराष्ट्र टाइम्स मधे आलेली लेखमाला आणि लोकप्रभामधील एका लेखाची आठवण झाली. हे लेख मी संकलीत करून ऑर्कुटवर एका समुहावर ठेवले होते.

हुताशनी ( शिमगा )

लेखक स्वप्निल रत्नाकर भायदे. यांनी मंगळवार, 15/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदू पंचागा प्रमाणे फाल्गुन हा वर्षाचा शेवटचा महिना या महिन्यामधील मुख्य एकच सण शिमगा होय. साधारण पणे फल्गुन शुक्ल पंचमी पासून पौर्णिमेपर्यत हा उत्सव स्थळ कालपरत्वे थोड्या फार फरकाने भारतात सर्वत्र साजरा करण्यात येतो.अशा उत्सवात सामिल होऊन व आपल्या मनावरचा भार हलका करीत व प्रसन्न मनाने आपल्या कर्तव्यकर्मा कडे नव्या उत्साहाने वळूया व हा सण योग्य मर्यादा सांभाळून आनंदाने साजरा करूया. हिंदू पंचागा प्रमाणे फाल्गुन हा वर्षाचा शेवटचा महिना या महिन्यामधील मुख्य एकच सण शिमगा होय.

problem loading page.

लेखक निवेदिता-ताई यांनी मंगळवार, 15/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळपासून काय झाले होते, इथे येताच आले नाही- problem loading page. असे येत होते

त्सुनामी

लेखक वर्षा म्हसकर-नायर यांनी मंगळवार, 15/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा पुन्हा तू येतोस तुझा मीट्ट अंधार, गडद काळोख घेउन पुन्हा पुन्हा ते पाशवी, ऋद्र, आक्राळ -विक्राळ विद्रुप क्षण होऊन पुन्हा मी लढते, जीव तोडुन सत्याची अखंड तेवणारी ज्योत घेऊन, स्वत:तील सत्व जपत तू घोंघावत येतोस सुनामी सारखा आपल्या आक्राळ विक्राळ, विद्रुप विनाशकारी लाटेत मला संपवून टाकायला पण मी जिवाच्या आकांताने लढते स्वत:च्या आत्म्यात तेवणा-या सत्याच्या ज्योतीच्या आधाराने लढते लढते लढते त्या आक्राळ विक्राळ विनाशकारी सुनामीला पुन्हा एकदा परतवून लावते माझा मेंदु पुन्हा थोडा मरतो पण मी जिवंत रहाते मी पुन्हा त्या जिवनरुपी वेताळाला अन्गावर घेवुन पुढच्या प्रवासाला निघते
काव्यरस

आयुष्याची दोरी

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 15/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याची दोरी हे सजीवसंख्येचे नियमन करणार्‍या मृत्यो, कधीही, कुठेही आणि कसेही आयुष्याची दोरी कापून टाकण्याचे तुझे अधिकार मान्य आहेत मला पण सन्मानाने मरण्याचे अधिकार मलाही असावेत की नाही? हे “जीवन” तुझे असले तरी “मी” तर “माझा” आहे ना? तुझ्यामुळे आयुष्य सरणार असले तरी मी मात्र उरणारच आहे.

यावे तरी तु का समोर

लेखक निनाव यांनी सोमवार, 14/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
यावे तरी तु का समोर जवळ मज नसतांना तहानले मन माझे नयन हे भिजतांना अजुनच कमी होते अंतर तु लांब जातांना आठवेस तु अधिकच मी तुज विसरतांना शब्द अबोल करणारे वियोगात मी लिहितांना कंठी दाटून येतात ह्रदयातुनी उतरतांना का असावी अशी ही वेदना न दिसे कुणास दुखतांना श्वासही करते परके मला तु जवळ नसतांना!
काव्यरस

गावोगावची गंमतीशीर ठिकाणे सांगा...

लेखक योगप्रभू यांनी सोमवार, 14/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
पु. लं नी पूर्वरंग या प्रवास वर्णनात थायलंडमधील जागोजागच्या बुद्धमूर्ती बघून एक टिप्पणी केलीय, की थायलंडमधल्या बुद्धदेवांना आमच्या पुण्यातल्या देवांइतकी लडिवाळ नावे ठेवलेली नाहीत. हे निरीक्षण खरोखर मजेशीर आहे. पुण्यात माती गणपती, मोदी गणपती, हत्ती गणपती, गुपचूप गणपती, भांग्या मारुती, पत्र्या मारुती, डुल्या मारुती, तांबडी जोगेश्वरी, पासोड्या विठोबा, निवडुंग्या विठोबा, खुन्या मुरलीधर अशी मजेशीर नावे आहेत. अशीच काही मजेशीर नावे गावोगावी आढळतात. नाशिकला दुतोंड्या मारुती आहे. नवशा गणपती आहे. बरं हे देवांपुरतेच मर्यादित नाही.