Skip to main content

कोंबडा आरवतो -

लेखक विदेश यांनी रविवार, 03/07/2011 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
कोंबडा आरवतो कुकूऽऽच कूऽक ऊठ बाळा आता झोप झाली खूऽप |१| कावळा करतो काव काव काव हास बाळा आता आईला बोलाव |२| चिमणीची चाले चिव चिव चिव सरकत बाळा आता बाबांना शिव |३| मोत्या भुंकतो भो भो भो बाळ आलं रांगत बाजूला हो |४| पोपट बोलतो मिट्टूऽऽमिया दुडुदुडु बाळ चाले बघायला या |५| मनीमाऊ म्हणते म्याऊ म्याऊ बाळाच्या गंमती बघायला जाऊ |६|

रावेरी - सीतामंदीर

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 03/07/2011 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
रावेरी - सीतामंदीर रावेरी, त.राळेगाव जि. यवतमाळ येथे भुमीकन्या सीतामाईचे मंदीर असून हे सीतामाईचे देशातले एकमेव मंदीर आहे. प्रभूरामचंद्राने सीतामाईचा त्याग केल्यानंतर याच दंडकारण्यात सीतामाईचे वास्तव्य होते. लवकुशाचा जन्म होऊन अश्वमेघ यज्ञाचा घोडा अडवेपर्यंत याच रावेरी गावात सीतेचे वास्तव्य होते. अयोध्यास्थित राममंदीरासाठी संपूर्ण देशात रामायण-महाभारत घडत असताना रावेरीचे सीतामाईचे एकमेव मंदीर जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे, याकडे कुणाचे लक्षही नव्हते.

सारं लुगड्यात गमावलं...!

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 03/07/2011 05:55 या दिवशी प्रकाशित केले.
सारं लुगड्यात गमावलं... हे एक भन्नाट गाणं पूर्वी येऊन गेलं. ‘काय राव तुम्ही?’ या प्रश्नानंतर येणारी गंमत या गाण्यात आहे. संबंधित इसमाने धोतर विकण्याचा व्यवसाय (नमनालाच ‘धंदा’ हा शब्द मी वापरणार नाही!) सुरु केलेला असतो. त्यात त्याला खूप यश लाभलेले असते. मात्र एक देखण्या स्त्रीच्या म्हणण्यावरून तो लुगडी विकू लागतो आणि सर्व काही गमावून बसतो असा साधा, सरळ, सोपा आशय या शब्दांत आहे.

आजकालचे ग्रामीण चित्रपट

लेखक आशु जोग यांनी रविवार, 03/07/2011 01:18 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही वर्षापासून मराठीमधे अनेक ग्रामीण चित्रपट येऊ लागले आहेत मराठीतले काही ठराविक कलाकार तर दिवसेंदिवस ग्रामीण चा रतिब घालू लागले आहेत. हे सर्व चित्रपट पाहताना नेहमी प्रश्न पडतो ग्रामीण म्हणजे नेमके काय ? खटकणारी गोष्ट म्हणजे यातील कलाकारांचे ग्रामीण बोलणे जे त्यांना जमत नाही धोतर टोपी घातली किंवा नऊवारी लुगडं नेसलं की जमलं ग्रामीण असा एक भ्रम दिसतो या कलाकारांचा. आणि मग ग्रामीण म्हणून जी भाषा बोलली जाते त्यामधे आत्ता, आत्ता ग बया, कंच, वाइच, व्हय व्हय या शब्दांची नुसती भरमार होत राहते शिवाय ग्रामीण म्हणून एक विचित्र हेल काढून आणि अंमळ ओरडून हे कलाकार बोलतात तो सगळाच प्रकार ता

हानामी (花見) : साकुरा

लेखक सोत्रि यांनी शनिवार, 02/07/2011 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
हानामी (花見) : साकुरा हानामी(花見), जपान मधे साधारण सातव्याशतकापासून चालू झालेली ही परंपरा आजही कसोशीने आणि हौसेने पाळाली जाते. हाना(花)म्हाणजे साकुरा(桜、चेरी)चे फूल आणि मी(見) म्हणजे पहाणॆ. साकुराचा आलेला बहर पहायला जाणे म्हणजे हानामी. ही झाली पुस्तकी व्याख्या, पण जपानी लोक़ांची खरी व्याख्या आहे, हानामी म्हणजे मौज मजा, जत्रा, कुटुंबकबिल्यासोबत - मित्रपरीवारासोबत जिवनाचा आनंद लुटण्याचा काळ. वसंत ऋतुच्या आगमानाची सुरुवात साकुराच्या बहराने होते.

टीव्हीतली दुनिया

लेखक प्रास यांनी शनिवार, 02/07/2011 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या लहानपणी, म्हणजे साधारण ऐंशीच्या दशकात कधीतरी टीव्हीवर मला एका नव्या दुनियेचा शोध लागला. टीव्हीतल्या डॉक नावाच्या एका सुतार काकांच्या घरात असलेल्या एका बिळात एक अनोखी दुनिया वसल्याचं मला समजलं जिचं नाव होतं "Fraggle Rock". तिथे राहत होते फ्रॅगल्स. डॉक काकांना फ्रॅगल्सचं अस्तित्त्व माहितच नव्हतं पण त्यांचा पाळीव कुत्रा स्प्रॉकेट सतत त्यांना ते सिद्ध करून दाखवायचा प्रयत्न करायचा. या फ्रॅगल्स पैकी गोबो, मॉकी, रेड, बूबर आणि विम्ब्ली मला आमच्यापैकीच एक वाटायची. ते आनंदात गाणी म्हणायचे, दु:खात गाणी म्हणायचे, गोष्टीत गाणी म्हणायचे आणि शिकताना-शिकवतानाही गाणी म्हणायचे.

ते आहेत ना

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 02/07/2011 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
ते आहेत ना
मंगला ओक आपले अनुभव सांगताना – चंदननगरच्या डोळ्याच्या दवाखान्यात आई औषध घातल्याने डोळे मिटून होती, तेंव्हा मी आईला काही आठवणी सांगायला विनंती केली आणि मग आईच्या आठवणींचा खजिना उघडला. तो शब्दांकित...
ते आहेत ना येकंममरडी गावी कुलकर्णी म्हणून होते. त्यांच्या खेडेगावातील ते लहानसं देऊळ. पण फार जुनं. त्यांच्या पूर्वजांचं दोनशे-तीनशे वर्षांचं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते दत्ताचं जागृत देवस्थान होतं. लहानशीच मूर्ती होती. ते दरवर्षी तेथे दत्तजन्म करत असत. तिथे मी गेले.

कोकणस्थ (चित्तपावन/चित्पावन)

लेखक शरद यांनी शनिवार, 02/07/2011 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
कोकणस्थ (चित्तपावन/चित्पावन) इतिहास : कोकणस्थांचा १४ व्या शतकाच्या आधी कोकणात उल्लेख मिळत नाही. मग हे कोठून आले ? या बद्दल तीन मते आहेत. (१) हे बर्बर देशातून जलमार्गे कोकणांत आले. ह्या प्रदेशाचा उल्लेख जुन्या ग्रंथांत मिळतो. त्यातच यांचा व परशुरामाचा संबंधही सांगितला आहे. परशुरामाला समुद्र किनारी १४ शवे मिळाली. त्याने जिवंत करून त्यांची कोकणात स्थापना केली. शवे सोडा, आसन्नमरण माणसे मिळाली; त्यांची सुश्रुषा करून त्यांना वाचवले. मग त्यांना ब्राह्मणत्व दिले.म्हणून चित्तपावन परशुरामाचे भक्त. या मताप्रमाणे यांचा गोरा रंग,सरळ नाक वगैरेची व्यवस्था लावता येते.

मी असा जुगारी...

लेखक बन्या बापु यांनी शनिवार, 02/07/2011 08:03 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा खेळलो मी डाव तो जुगारी, कसे आवरू मी या मना विकारी ? झगडा तो जीवनाचा संपेल ना कधीही, पंख शोधेल कोण, मारेल कोण भरारी ? आहेत सगळे माझे, परके कोणी ना इथे, वार का त्यांचे लागले जिव्हारी ? श्वास संपले आता, खेळही संपला आता, कसे नाकारू सत्य हे विखारी. फासे फेकलेले, दान ते त्याचे, कसे जिंकेल कोणी जो तो इथे भिकारी ? येईन फिरून मीही एकदा असा कि, डाव सोडून जाईल नियती ही बिचारी..