स्मरण चांदणे५
स्मरण चांदणे ५.
आषाढ महिना सुरू झाला की पावसाची वाट पाहाणे सुरू होई.आषाढातच चातुर्मास सुरूहोई.आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या चार महिन्यात,
विशेषत:,बायकांचे वेगवेगळे उपवास,व्रतवैकल्ये सुरू होत.नित्याचे उपवास,वार असत ते वेगळेच.या काळातील ,धार्मिक महत्वाचे दिवस(तिथी)सांगण्यासाठी
भटजी घरी येवून पंचांगानुसार तिथ्या,सण इ.ची माहिती सांगत.त्यांना नमस्कार करून,दक्षिणा,धान्य,आणि चहा/ दुध दिले जाई.
मिसळपाव
शेंदूर दगडांचा उतरला तरीही,
गुलाल भक्तीचा उधळत राही
धुरळ्यात काही उमजत नाही,
पावलांवर पाऊल पडत राही
झापडे काढली डोळ्यांची तरिही
उजेडाला डोळे हे सरावत नाही
रक्त सांडले कळपात तरिही
मेंढरे लांडग्याला ओळखत नाही
पाणी डोळ्यातले रोखले तरिही
लेखणीतून मग ते झरत राही
~ मनिष