Skip to main content

स्मरण चांदणे५

लेखक नीलकंठ देशमुख यांनी सोमवार, 28/03/2022 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
स्मरण चांदणे ५.     आषाढ महिना सुरू झाला की पावसाची वाट पाहाणे सुरू होई.आषाढातच चातुर्मास सुरूहोई.आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या चार महिन्यात, विशेषत:,बायकांचे वेगवेगळे उपवास,व्रतवैकल्ये सुरू होत.नित्याचे उपवास,वार असत ते वेगळेच.या काळातील ,धार्मिक महत्वाचे दिवस(तिथी)सांगण्यासाठी भटजी घरी येवून पंचांगानुसार तिथ्या,सण इ.ची माहिती सांगत.त्यांना नमस्कार करून,दक्षिणा,धान्य,आणि चहा/ दुध दिले जाई.

तो शहाणा होतोय....

लेखक आजी यांनी सोमवार, 28/03/2022 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
एक जाहिरात आहे एका खाद्यतेलाची. त्यातल्या आईला नृत्याची आवड,पण संसारात अडकलेल्या तिला नृत्य करायला वेळ मिळत नाही. मुलगी खिन्न होते. आईला मदत कोणी करत नाही पण अमुकतमुक खाद्य तेल ती आई वापरते, आणि लगेच.. कढईभर तेलात साबुदाणा वडे तळते.(ते वडे चक्क कच्चे दिसतात.) एकाच जेवणात साबुदाणे वडे, पुलाव आणि पाच इतर पदार्थ भरुन टेबलवर ठेवते. नंतर फडक्याला हात पुसत, मुलीच्या खोलीत जाऊन नृत्याची पोझ घेते.

प्रवास

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 28/03/2022 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
अथांगाचा तळठाव अज्ञेयाचा पैलतीर विराटाची पराकाष्ठा सूक्ष्मातील शून्याभास खुणावती ऐसे सारे क्षणोक्षणी अविरत जरी जटिल तरीही जीवा लावतात ध्यास नादावतो या ध्यासाने ठेचाळतो जागोजाग असे खडतर तरी भूल घाली हा प्रवास
काव्यरस

स्त्री-लैंगिकतेचे गूढ

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 28/03/2022 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
(लैंगिक सुख ही स्त्री-पुरुष जोडप्यांच्या जीवनातील एक कादंबरी असते. या कादंबरीतील महत्त्वाचे प्रकरण म्हणजे संभोगसुख. या प्रकरणातील फक्त स्त्रीच्या कळसबिंदू संबंधीचे शास्त्रीय विवेचन करणे हा या लेखाचा हेतू आहे. सहजीवनातील प्रेम, भावनिक जवळीक, मानसिक स्वास्थ्य, इत्यादी पैलू या लेखाच्या व्याप्ती बाहेरचे आहेत). स्त्री-पुरुष समागमाचे दोन हेतू असतात : वैयक्तिक शरीरसुख आणि पुनरुत्पादन. यापैकी फक्त पहिल्याच हेतूचा या लेखात विचार केलेला आहे - त्यातही प्रामुख्याने स्त्रीच्या दृष्टिकोनातून. संभोगातून स्त्री व पुरुष या दोघांना मिळणारे शरीरसुख हे वेगळ्या पातळीवरचे आहे.

एक भास

लेखक Bhakti यांनी रविवार, 27/03/2022 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
अपूर्वाई कोंदणात​ तुझ्या माझ्या प्रितीत चांदण....लख्ख प्रकाश| सांज रंगी उधळतात आठवणी मोती झेलत निशब्द....मंद श्वास| शोधे जादूई तळ्यात मासोळी नयनांत पाणकळा...तुझं आकाश| मोरपंखात निथळत कृष्ण मुरली सुरांत राधा...एक भास| -भक्ती (हायकू लिहिण्याचा एक प्रयत्न)
काव्यरस

बकध्यान....

लेखक कर्नलतपस्वी यांनी रविवार, 27/03/2022 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/50007/backlinks श्रीमान बाजीगर यांनी मांडलेल्या विषयाची दुसरी बाजू..... रिकामटेकडा मी खरडतो चार ओळी नका शोधू यात जोडगोळी कुणाची पहिलेच सागंतो मी ही तर कसरत अक्षरांची नाहीतर उगा द्याल मज शिवीगाळी फुकाची शोधिसी दानवा गुपीते कुणा कुणाची का तोडू पहातो घरटी कुणाकुणाची लागेल हाय तुला माझ्या रवळनाथची (पैचान कौन) दिला हात गरिबांना त्यांच्या अडी नडीला फेडले त्यांनी पांग देऊन बिडी काडीला बाधंली ही माडी जोडून पै...
काव्यरस

रिसाँर्ट

लेखक बाजीगर यांनी शनिवार, 26/03/2022 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
रिसाॅर्ट बेकायदा हा तोडा सोमय्या घेवून गेले हातोडा एसटी प्रकरणी बेफिकीर अनिल परब चिंताग्रस्त झाले त्यांना सोमय्यांची जरब फोनवर घेतात आदेश दापोली पोलीस ते तर बिचारे माफियासेनेचे ओलीस होऊ शकते हत्या, हो सोमय्या दिला पोलीसठाण्यापुढे ठिय्या दापोली जनता अस्वस्थपणे दंड थोपटती पितापुत्र राणे पडद्यामागे रहातोय अजाणता राजा घडामोडी पहातोय मोटाभाई ताज्या. दोन सांडांची टक्कर पहाते दापोली मिडीया भाजतय आपली पोळी.

कोकण ट्रिप

लेखक विदर्भनिवासी यांनी शनिवार, 26/03/2022 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार , एप्रिल मध्ये सहकुटुंब कोकण ट्रिप करायचा विचार सुरु आहे .. कोकणात कधीही गेलेलो नसल्याने आणि मुलांनी पण समुद्र पाहीला नसल्याने साधारण कोल्हापूर वरून दर्शन घेऊन पूर्ण चार दिवस कोकण मध्ये फिरायचा प्लॅन आहे .. एप्रिल मध्ये साधारण वातावरण कसे असते आणि सर्वात चांगले बीच कोणते आहे परत येताना गणपतीपुळे वरून पुणे किंवा अहमदनर वरून शिर्डी करून परत विदर्भात येणार आहे तरी राहण्याची ठिकाण .. खरेदी.. हापूस कुठे मिळतील . चांगले रोड आणि काय खबरदारी घ्यावी याचे मार्गदर्शन करावे. धन्यवाद

तरीही…

लेखक मनिष यांनी शनिवार, 26/03/2022 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
Gulal शेंदूर दगडांचा उतरला तरीही, गुलाल भक्तीचा उधळत राही धुरळ्यात काही उमजत नाही, पावलांवर पाऊल पडत राही झापडे काढली डोळ्यांची तरिही उजेडाला डोळे हे सरावत नाही रक्त सांडले कळपात तरिही मेंढरे लांडग्याला ओळखत नाही पाणी डोळ्यातले रोखले तरिही लेखणीतून मग ते झरत राही ~ मनिष

राजधानीची सफर

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 26/03/2022 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात मात्र अचानक दिल्लीला जायचं ठरलं, तेही अगदी एकाच दिवसात. आता इतक्या ऐनवेळी राजधानी, दुरोंतोशिवाय अन्य गाड्यांची आरक्षणं मिळण्याची शक्यता नव्हती. म्हणून मिळताहेत, तोवर लगेच मुंबईहून राजधानीचं आरक्षण करून टाकलं. मुंबईहून छत्रपती शिवाजी महाराज (ट) (CSMT) वरून सुटणारी आणि मुंबई सेंट्रलवरून सुटणारी ऑगस्ट क्रांती तेजस राजधानी यांची आरक्षणं शिल्लक होती. 22221 राजधानी ही भारतामधली सर्वात नवी म्हणजे सर्वात अलीकडे सुरू झालेली राजधानी एक्सप्रेस आहे. त्याचबरोबर “ढकल-ओढ” म्हणजेच Push-Pull तंत्रज्ञानावर चालणारी ही एकमेव राजधानी एक्सप्रेस आहे. दुपारी तीन वाजता गाडी फलाटावर लावली गेली.