Skip to main content

एक उनाड दिवस-महाबळेश्वरात

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 27/12/2011 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच महाबळेश्वरास जाउन आलो. तिथले काही फोटू येथे डकवत आहे. १. वाईचे काशीविश्वेश्वर मंदिर २. मंदिराचे कळस ३ शेजारीच असलेला गणपती मंदिरातील ढोल्या गणपती ४.

शिदोरी

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 27/12/2011 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
शिदोरी घाटांतून वळणा वळणातून पसरलेली हिरव्या निळ्या मोदकांची ताटे त्यावर पांढरे शुभ्र बर्फ खोवून वाढलेले नागमोडी शेवयांच्या दोर्या गच्च पकडून शक्य तेवढ्या सगळ्या बाजुन्नी हिन्दकळत नशा केल्यासारखी चाललेली बस सृष्टी सौन्दर्य चाखून, पिऊन, ओरबाडून टुन्न झालेली पन्धरा वीस डोकी डोळ्यांत मावत नसलेले, शब्दांत गावत नसलेले भराभरा पळणारे बेहोश क्षण नंतर हवे तेव्हा स्मृतीच्या काळडोहांतून जसे होते तसे बाहेर काढता येणार नाही हे माहित असल्याने कॆमेर्याच्या पटलावर आधाशासारखे कोरून ठेवलेले कधी वाघा सिमेवर सैनिकांच्या संरक्षणात शत्रूकडील बघ्यान्ना डिवचत केलेला मेरे देश की धरती

चालू नको अशी तू

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 27/12/2011 05:07 या दिवशी प्रकाशित केले.
चालू नको अशी तू चालू नको अशी तू तोर्‍यात ग तोर्‍यात केस उडतात भुरूभुरू वार्‍यात केस तुझे मखमली आले गाली ओठांवर तिळ शोभे गाली खळी नको तिरक्या नजरेनं पाहू मीच दिसे तुझ्या डोळ्यात खट्याळ वारा तुझा उडवी पदर उगाच माझी त्यावर गेली नजर पाहून तुझं रूप झाली हुरहुर सावरून घे पदराला हातात सांग तू असा का करते नखरा बघून तुला मी मारतो चकरा जीवाला लावून नको जावू घोर कसं सांगू मी तूला प्रेमात - पाभे
काव्यरस

ब्रेक अप...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी मंगळवार, 27/12/2011 01:19 या दिवशी प्रकाशित केले.
माझी अपेक्षापूर्ती न करणाऱ्या या अनामिक नात्याचा मला भयंकर कंटाळा आलाय बघ. तू म्हणशील पुरुष इथून तिथून सारखेच असतात, मलाही तसंच समज हवं तर. तुझे सारे आरोप अन् आक्षेप मला मान्य आहेत. हो, मीही पुरुष आहे. मीही तुझ्यावर प्रेम करतांना एकच अपेक्षा ठेवली होती. ती सुरुवातीला तू समरसून पूर्ण करीत गेलीस. परंतु आता काळ बदलला, आपण जरा समंजस झालो आहोत. तुला तुझे करियर घडवायचे आहे. तू आता मध्यावर आली आहेस. अजून खूप पल्ला गाठायचा आहे. तू जीव तोडून काम करतेस, प्रसंगी ओव्हर टाईमलाही थांबतेस.

भेट

लेखक santosh waghmare यांनी सोमवार, 26/12/2011 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
ती तरुणी चालली कुणिकड, डोक्यावर घेउनी घागर, पडता कानी बासरीचे ते स्वर, धुंद होऊनी ती चालली बेफिकीर. तहान आणि भुकेचा आता पडला विसर, नाजूक पायी तिच्या ना ठेचाचा असर, त्या स्वरातील हाक आहे ती जाणून, मग बेभान होऊनी ती चालली बेफिकीर. खरच त्या स्वरात आहे खूप माधुर्य, पण तिला तर सख्याची ओढ, ते तर आहे तिच्यासाठी भेटीच माध्यम, मग सख्याच्या ओढीन ती चालली बेफिकीर. आता ना कसल्या थकव्याची जाणीव, नाजूक पद तिचे पडती भर भर, आता त्याच्या भेटीशिवाय तिच्या मनास कसले चैन, मग बैचैन होऊनी ती चालली बेफिकीर. पाण्याच्या बहाण्याने ती सख्यास भेटत, त्रासली ती डोक्यावर घेउनी घागर, पण भेतीसमोर हा त्रास तिला वाटे नगण्य,

तोल हा मनाचा तू जरा सावर रे.

लेखक santosh waghmare यांनी सोमवार, 26/12/2011 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
तोल हा मनाचा तू जरा सावर रे. दिशाहीन वाहणाऱ्या वाऱ्याला तू जरा आवर रे, तोल हा मनाचा तू जरा सावर रे. झालेल्या व्यथा ते उगाचच आठवत, गतकालातून दुख जणू ते पोखरून काढत, सुखलेल्या जाख्मानाही मग फुटे वेदनेच पाझर रे , तोल हा मनाचा तू जरा सावर रे. बाह्य आकर्षणाला ते सतत भुलत, शोभेच्या फुलालाही नाकाशी धरू लागत, पण मृगजळात तहान नाही भागत रे, तोल हा मनाचा तू जरा सावर रे. प्रेत्येक कर्माच फळ त्याला पटकन हव असत, पिउनी हळद त्याला लगेच गोर व्हायचं असत, पण पिकण्या अगोदर आंबा कसा लागणार गोड रे, तोल हा मनाचा तू जरा सावर रे. समोरच्याकडून ते अधिक अपेक्षा करत, जणू लहानश्या झोळीत ते गावभर बाजार भारत, मग छिद्र पड

ती पण माझ्यावर प्रेम करेल का...?

लेखक अन्नू यांनी सोमवार, 26/12/2011 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्या वेड्या हृदयाला, माझे प्रेम कळेल का? मित्रांनो, तुम्हीच सांगा, ती माझ्यावर प्रेम करेल का? पावसाळ्याच्या त्या रात्रीत, ती चिंSS ब भिजली होती; मला आठवते आमची, पहिली भेट तीच होती..! झाडाखाली ऊभी राहून ती, रिक्शाची वाट पाहत होती; अन् माझी वेडी नजर मात्र, तिच्यावरून हटत नव्हती. मनात फक्त एकच विचार..
काव्यरस

बटाटावडा

लेखक स्वाती दिनेश यांनी सोमवार, 26/12/2011 19:11 या दिवशी प्रकाशित केले.
बटाटे वडे आपण सगळेच जण घरीदारी खात आणि करत असतोच, त्यात नवीन असे काहीच नाही. तरीही प्रत्येक ठिकाणची खास चव जिभेवर असतेच, विशेषतः गाडीवरच्या वड्याची.. आणि घरी तस्सा वडा होत नाही असे सगळेच हळहळतात आणि पावलं परत एकदा नाक्यावरच्या गाडीवर नाहीतर टपरीवर वळतात. पण काही वेळा आणि ठिकाणे अशी असतात की तेथे अशा वडापावच्या गाड्या,टपर्‍या नसतात, :( मग वड्याची तल्लफ भागवायला बटाटे उकडत ठेवावे लागतात आणि खाताना परत तेच..